OTT वर रविवारी दशावतार पहिला, बरं झालं ....
बरं झालं कि मी सिनेमा हॉल मध्ये जाऊन नाही पहिला ते. हा पिक्चर इतका का चालला तेच कळत नाही , अप्रतिम कलाकार पण बाकी? कांतारा सारखं काही तरी करायचं , कशाला? एक तर सुरवातीलाच टायटल च्या आधी त्या डायरेक्टर चा शाहरुख च्या पोस मधला फोटो आणि त्याच्या बद्दल चे गौरव उदगार पाहून मला थोडा अंदाज आला होता पण कलाकारांसाठी मी रेटला ... नाही हो नाही. अजून काही लिहिवत पण नाही. काहीच पटत नाही असा सिनेमा. सगळंच एकाच पिक्चर मध्ये दाखवायचं आहे ... प्रभावळकर , मांजरेकर , जाधव , तावडे , झालंच तर केंकरे, उत्तम नट पण हे काय करून ठेवलं कोण जाणे?
तुम्हाला जर खरंच दशावतारावर एक उत्तम सिनेमा पाहायचा असेल तर जाऊन पिकासो बघा , प्रसाद ओक नि सुंदर काम केलंय आणि सगळ्याच कलाकारांनी , स्त्री पार्टी तर अप्रतिम आहे. कोकण, त्याचं सौंदर्य , कलाकारांच्या खऱ्या व्यथा , इतक्या छान दाखवल्यात कि आपण खरंच त्यात जातो. कुठे हि भडक किव्हा भम्पक नाही, शो शा नाही, सगळं वास्तव, म्हणजे कले साठी लोकं काय करतात ते उत्तम दाखवलं आहे. गाणी नाही उगाच रोमान्स नाही खोटे खोटे व्हिलन तर नाहीच नाही. नक्की बघा आणि मला कळवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा