शनिवार, २४ मार्च, २०१२

कशाचं काय

त्या दिवशी रात्री आरे मधून येताना , पोलिसांची गाडी कडेला थांबली होती, मी स्कूटर वर होतो म्हणून जरा स्कूटर हळू करून बघितलं तर झाडा मागून एका जोडप्याला बाहेर काढून दटावत होते आणि त्यांच्या व्यान मध्ये बस म्हणत होते.

आता आरे मध्ये बरीच लोक येता जाता थांबतात शू करतात थुंकतात त्यांना पोलिसांनी हटकलेल  मला तरी कधी दिसलं नाहीये आता पोलिसांना झाडा मागे जाऊन का बर अस करावा अस वाटत असेल, वास्तविक त्या जोडप्याचा कुणाला त्रास होत न्हवता मला कुणाला दिसले पण नसते , पण पोलिसांना बरोबर माहित होत.

अश्लील पणा आपण सिद्ध कसा करणार ? म्हणजे  मी काय फार modern आहे अस नाहीये , खूप revealing  कपडे  घालून मुलींनी सगळीकडे फिरू  नये असे मला वाटत , आता भिकार्यान पुढे मी मुद्दामून खात नाही किव्हा माझ्या किश्यातल्या पैशे हातात घेऊन फिरत नाही, घराला गाडीला lock करतो , तेच logic .

जेव्हा मी गाडीतून (train ) जायचो तेव्हा बोरीवली स्टेशन वर जी माणस ट्रेन अक्सिडेंत मध्ये मरायची त्यांना (मेलेली माणसाचं प्रेत ) ठेवायचे , तर लोक काय आवडीने ते बघायचे.  सांगायचा
मुददा  असा कि आपण खूप विकृत आहोत, रस्त्यात घाण केली कि  आवडत पण प्रेमाने मिठी मारली कि नाही आवडत.

पण आपल्याकडे एक प्रोब्लेम आहे लोक गैर फायदा  जास्त घेतात,  मिठी allow  केली तर लोक फार पुढे जातील. बंधन घालाव पण खूप घातल कि मग आपण ते तोडायला बघतो, म्हणून झाडा पाठी काही होत असेल तर त्याच्या कडे दुर्लक्ष करायला हरकत नाही.

आपण खूप छोट्या गोष्टीन कडे खूप जास्त लक्ष देतो म्हणून आपण मतदान पण नाही करत पण काही झाल कि मेणबत्या लावायला मात्र जातो, कशाला किती महत्व द्यायचं हेच कळत  नाही आपल्याकडे.

 
आपल्या basic मध्ये राडा आहे, कुणी राष्ट्र गीताला उभ नाही राहिला तर आपण रागावतो पण नियम मोडला कि लाच मात्र बिनदिक्कत देतो, खर देश प्रेम कशात आहे तेच नाही कळत (मला सुद्धा). तर सांगायचा मुद्दा असा कि आपण उगाच बाऊ करतो फालतू गोष्टींचा आणि मग महत्वाच्या गोष्टीन कडे दुर्लक्ष करतो. लग्नाचा बाऊ करतो आणि मग?  नंतर सगळ granted घेतो. रोहितला मी लग्न का कराव आणि का करू नये हे दोन्ही सांगून convince केल होत, तर एक दिवस त्याने सांगितल माझा साखरपुडा झाला :).   

आमच्या ऑफिसात एक मुलगी होती हेमाली ती म्हणाली होती, कि मी जैन आहे आणि मला दारू न पिणारा शाकाहारी, सिगारेट न ओढणारा हुशार वगेरे नवरा हवाय  , मी तिला अभिषेक दाखवला, तिचा खास मित्र, खूप छान मुलगा आहे, पण दारू पितो, शाकाहारी नाही, पण खूप सभ्य आहे, तिला मग आणखी एक लंपट माणूस दाखवला, मुली त्याला थोड्या जपून असतात पण तो एकदम शाकाहारी, दारू वगेरे नाही, हुशार, श्रीमंत. तिला म्हंटल कोण चालेल नवरा म्हणून? हसायला लागली, पटलं तिला, म्हणजे लग्न करायला कशाला महत्व द्यायचं? हे नको का कळायला?

साला आपल्या basic मधेच राडा आहे .