बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

जय हिंद .

15 ऑगस्ट 2012

आज सुट्टी आहे , हल्ली स्वातंत्र्य  दिन म्हणजे एक सुट्टी म्हणूनच बघतो मी पण. 

 facebook  वर सगळ्यांनी भारतीय असल्याचा अभिमान वगेरे लिहिलंय , गम्मत वाटली,  सारख सांगाव लागत , हल्लि mothers day ला सख्या आईला मला "तू खूप आवडते " "I  Love You " अस लोकांना सांगत फिरायचं , मी आज पर्यंत चाळीस वर्षात एकदा पण आई ला अस नाही सांगीतल , म्हणजे मी वाईट मुलगा आहे का?

तसच मला हल्ली जाणवत , सगळा खोटे पणा . परवा त्या दंगे खोरांनी अख्या मुंबईस दोन तास वेठीस धरल , काहीही होऊ शकल असत त्या मध्ये चार  कसाब असते तर? असतील ही वेळ आली कि कळेल . किती नुकसान केल आणि ह्याची भरपाई मी आणि तुम्हीच करणार न? पण काही होत नाही, कसाब  जिवंत आहे विलासराव गेले ....सोश्लीस्त लोक गप्प , शबाना , महेश भट , तिस्ता आणि अशे बरेच बुद्धी किवी , कीव कारवाई अशी बुद्धी आहे ह्यांची ...

परदेशी राहणाऱ्या आणि स्थाईक झालेल्यांनी मला भारत किती आवडतो अस आवर्जून लिहिलंय आज...आणि मी काय बोलणार , हा खोटेपणा आहे न? हल्ली जगच खोट्याचं आहे ...निस्वार्थ काही नाही.. प्रेम हि नाही, म्हणून सख्या आईला सारख सांगाव लागत ....मला तू आवडते म्हणून ....आणि देशाला पण कि मला अभिमान आहे तुझा ...

आपण त्या पेक्षा एक संकल्प सोडूया की ह्या दिवशी देश करता काही तरी एक गोष्ट करूया, मग ती दिवस भर traffic signal पाळण असो की रस्त्यात कचरा न टाकण असो, हे फुटकळ वाक्य नकोतच. नुसता झेंडा लाऊन कुणी देश भक्त नाही होत शरीरा भोवती गुंडाळून चितेवर जाईला  हव ....तो झेंड्याचा मान ...

65 वर्ष झाली तरी आपण अजून गुलामीत जगतो , इंग्रजीची तर प्रचंड गुलामी , खाण्याची गुलामी, विचारांची गुलामी सगळीच  गुलामी आणि तरी आपण त्याच काहीच करत नाही. आपण पुढाऱ्यांच कौतुक करतो सैनिकांचं नाही करत, कारण आपल्या पुस्तकात सैनिकांचं कमी आणि पुढाऱ्यांच जास्त लिहिलेलं आहे.. 

आपण खरच स्वतंत्र आहोत का ? सहा पदक मिळाली म्हणून खूप खुश झालो, अरे पण लोक संख्या किती? पदक किती? जी मिळाली ती पण त्या सार्यांच्या स्व कष्टाने सरकारच काही अनुदान नाही कि मदत नाही, तरी आपल्या कडे दिव्या खाली बसून अभ्यास करण्याची प्रथा आहेसच तीच लोक खूप पुढे गेलीत.

चीन म्हणे लहान मुलांना प्रशिक्षण देत त्रास देत म्हणून त्यांना इतकी पदक अरे मी म्हणतो आपल्याकडे काय कमी गरीब लोक आहेत त्यांना  उचला आणि शिकवा दोन वेळ खाईला द्या मिळवा पदक, भिकारी होऊन मारण्या पेक्षा, किमान खाईला तरी मिळेल त्यांना ...

शेवटी काय तर एक दिवस सुट्टी मिळाल्याचा आनंद घायचा T V पहायचा आणि मस्त झोप काढायची देश काय माझ्या वर अवलंबून नाही.. 

जय हिंद .





शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२

आशा....

हल्ली सगळच बदलेल आहे, चांगली माणसं असतात न? ती बावळट आणि बदमाश माणस successful   असा नियम. माझी boss (खवीस आहे, का हडळ?) म्हणते लोकांना झाप, ओरड दम भर, म्हणजे लोक काम करतील. मला जमत नाही, मी माणूस शोधतो हो, साफ चुकतो, तीच (माझी boss)बरोबर आहे लोक चांगली माणस ह्यांना उल्लू समजतात, म्हणजे मी लोकांना समजून घेतो, सगळे मला फसवायला बघतात. मी नाही बदलणार एक दिवस (आत्ता नाही तर १०० वर्ष नंतर तरी?) मी बरोबर आहे हे कुणाला तरी पटेल.
काल दही हंडी होती, आधी दुपारी सगळं समपुन जाईच हल्ली  दुपारी सगळ सुरु होत. आमच्या दत्तापाड्याला तीन हंड्या लागायच्या दुपारी साधारण दोन अडीच पर्यंत सगळ संपायच आणि काल मी साडेसात ला परत आलो (रात्री)तरी लोक जमा होती  आणि कुणी तरी गाण म्हणत होत दही हंडी तशीच (आंबट झाल असेल दही) लटकत होती, सगळं नंगा नाच चाईला. मोठे बंनेर्स मोठी नाव आणि काय हवंय? मला परवा थोडा रस्ता नीट दिसला, काल समजल दही हंडी बांधली तिथे रस्त्यावर डांबर टाकल होत, मला किळस आली. ह्या लोकांना रात्री झोप लागत असेल?
मला तर हल्ली सण आले कि धडकी भरते, गणपती म्हणजे काय विचारूच नका, नवरात्र तर सगळी गम्मत. अरे ह्यात देव कुठे संस्कार कुठे? लोक काय पण करतात, सिधीविनायाकाला चालत शिर्डीला चालत, त्याने काय होणार? सगळे साले स्वार्थी... आज तर कहर झाला एका माणसाने रस्त्यात मधेच गाडी थांबून गप्पा मारल्या कुणाशी तरी मागे traffic आहे हे न जुमानता एक दहा सेकंदात त्याच्या समोर एक माणूस थांबला तर ह्या माणसाने होर्न मारून त्याला हैराण केल, भांडला, किती स्वार्थी पणा, म्हणजे कळतंय , कळतंय बर का पण वळून नाही घ्यायचं.
फाशीच द्या प्रत्येक गुन्ह्य करता द्या एक तरी फाशी लोक घाबरतील, मी मूर्ख आहे चांगुल पणा वगेरे काही नसत, सगळे स्वार्थी. हल्ली तर खोट बोलण्याची fashion  आहे, म्हणजे उगाच खोट बोलायचं, अरे का कशाला ? मी बोलतो खोट चूक आहे पण नेहमी नाही, हे म्हणजे कुणाला तरी आपण हॉटेल मध्ये  भेटलो आणि तो म्हणाला कि अरे पुस्तक बदलायला आलो होतो... गम्मत आहे, सगळी नाती विस्कटली आहेत, प्रेमाचा, धर्माचा गैर वापर ...
कधी कधी येत नैराश्य, मग मुलगीच माझी काही तरी निष्पाप पणे बोलून जाते...तिला टोकाव वाटत, मग वाटत राहूदेत तीच घडवणार न पुढला भारत ?  अजून आशा आहे खोटी का होईना? आहे आशा....