शनिवार, ९ जून, २०१२

मी एक पंच्याहत्तर टक्के !!!!

मी एक पंच्याहत्तर टक्के !!!!

मी कायम ह्या अश्या चौकटीत अडकलो "पंच्याहत्तर टक्के", म्हणजे माझ्या मागे खूप मुल होती पण पुढे पण थोडी होती, त्यांना मी मागे नाही टाकू शकलो, नाही म्हणायला एकदा एका प्रोग्राम मध्ये पहिला आलो होतो पण ते तेवढंच. कधी तरी एखादी क्रिकेटची म्याच झिन्कून दिली असेल नाहीतर नाटकात केलेल्या कामच कौतुक, म्हणजे सगळ्यात छान तूच अस म्हणायचे प्रसंग तसे तुरळकच. मला वाटत नंतर नंतर मी स्पर्धे मध्ये भाग घेणाच बंद केल, म्हणजे मनाने, सारख काय हरायचं? पण का हो माझ्या सारखी मांस असतीलच न? मी कधी खूप सिगरेट  नाही  की कधी खूप दारू   नाई ढोसली.

पूर्ण विराम पर्यंत मी गोष्टी नाई  नेल्या, सगळच अर्धवट. म्याराथोन धावलो तरी तेच, म्हणजे ठीक ठाक तक्रार नाही, पण शाबासकी पण नाई. नोकरीत पण तेच, काम छान पण अप्रतिम नाई, संसार ठीक अगदी वाईट नाई पण अगदी आदर्श पण नाई, दिसायला पण चार चोघांसारखा (जरा बरा), पण खूप देखणा नाई. सगळच पंच्याहत्तर टक्के. मी रोज धावतो ते पण तसच, चार लोकांपेक्षा जास्त धावतो पण एक दोघ माझ्या पेक्षा जास्त वेळ आणि जास्त जोरात धाऊ शकतात. स्वयपाक छान करतो पण बोट चाटत राहण्या सारख नाई आणि टाकाऊ पण नाई. गाडी आहे चांगली आहे, मला उपयोगी आहे, पण चार लोक वळून बघतील अशी नाई.


पण जर माझ्या सारखी माणस नातील तर? हुशार आणि ढ मुलांच्या मधली दरी भरून कुणी काढली असती?

 
मला अस वाटत न, कि मी खूप पुढे नाई जाऊ शकणार, म्हणजे माझ्या कुवती पेक्षा शिक्षणा पेक्षा नक्कीच जाईन पण वर पर्यंत नाही जाणार , काम पण तसच..... चांगल मेहनत खूप सारी पण निकाल पुन्हा
पंच्यात्तर टक्के
पण हे जग चालत माझ्या सारख्यान मुळेच, सगळेच १०० टक्के कशे चालतील ते कुणाला काम देतील? कुणाला शिकवतील? कुणाला ओरडतील? कुणा कडून काम करून घेतील आणि सुधारतील?
 
म्हणून मी खुश असतो जग माझ्या मुळेच चालत .....


शुक्रवार, ८ जून, २०१२

जात पात

जात पात 

मला लोक नेहमी विचारतात कुलकर्णी म्हणजे? "CKP" सारस्वत का ब्राह्मण? मी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण सांगतो (कारण येजुर्वेदी  पण असतात देशस्थान मध्ये), मला खूप अभिमान आहे मी ब्राह्मण असल्याचा जसा मी मराठी असल्याचा आहे मी भारतीय असल्याचा आहे तस.  मला तर माझ्या मोठ्या नाकाचा, एक रूम किचन घराचा, माझ्या साध्या शाळेचा, मी केलेल्या प्रेमाचा सगळ्याचाच अभिमान आहे.ला
मला  न खूप सारी वर्ष  माहित  सुधा न्हवत  कि ब्राह्मण म्हणजे काय महार म्हणजे   काय  ते? कळल ते "मंडळ" आणल तेव्हा मी कॉमर्स वाला त्या मुळे आरक्षण चा फटका मला न्हवता लागला, पण प्रचंड नीच पणा आहे ते समजल, पण तरी मी कधी कुणाचा द्वेष नाही केला, अजून नाही करत अजून मी कुणाला तुझी जात काय अस नाही विचारात?
हल्ली फार झालंय हो जात पात, प्रेम करताना बघत नाहीत, पण लग्न करताना पाहतात, छळ करतात, तेव्हा मला प्रचंड राग येतो, काहीच अर्थ नाही ह्याला. माणूस महत्वाचा न? मला तर कितेक वर्षाने माझ्या मित्रांची जात समजली, एक मित्र होता (होता....), एकदा तो कॉलेज मधून तीनशे रुपये घेऊन आला. मलाच कळलंच नाही, मला म्हणाला कि तो SC  ST  आहे तेव्हा कळल कि तू SC का ST  आहे ते समजल, त्याला रिफंड मिळाला होता, गरीब मुल बिचारी सगळे पैशे भरायचे आणि हा श्रीमंत मुलगा (कारण त्या काळी १९८७ साली बाईक आणायचा आणि गळ्यात सोन्याची चैन घालायचा)  सगळी फी घेऊन मजा मारायचा, बापाला कुठे माहिती होत? तो कस्टम मध्ये लोडर होता एवढा पैसा कसा  हे मला माहित नाही :). 
 
साठ टक्क्याला मेडीकल ला admission  आणि आम्हाला नौवाद टाक्याला नाही ....आमच्या ओळखीची एक मुलगी आहे तिला बारावीत नौवाद च्या पुढे टक्के होते आणि तिला medical ला जाईची इच्छा होती तिला नाही जात आल ओं तिच्या मैत्रीणाला सत्तर टाक्याला मिळाली , तुटली मैत्री ...

हे सगळ परत आणलं वी पी सिंघ ह्याने , आता मेलेल्या माणसांबद्दल काही बोलू नये म्हणा पण मला नाही पटत ..... आधी अन्याय झाला म्हणून परत अन्याय आणि तास पण साठ वर्ष झाली तरी किती टक्के लोकांची प्रगती झाली ह्या मुळे? शहरात नाही हे सगळं मी मित्रान पैकी कुणाच ही उष्ट खातो मला काय जाती माहित आहे सगळ्यांच्या? आई ने पण कधी कुणाची जात नाही विचारली शिवा शिवी नाही पाळली, म्हणून मला हल्ली ऐकलं अस काही की प्रचंड नवल आणि भयानक राग येतो , ह्या मुळेच नंतर सगळ होत आणि गावात तर हे अगदी चालत, पण ह्या वर इलाज असा नाही न? फुकट मिळाल न सगळ कि किंमत नाही राहत कमावल कि राहत.