शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

बदलापूर

बदलापूर

चांगला सिनेमा तो असतो जो आपण आपल्या बरोबर सिनेमा घराच्या बाहेर घेऊन येतो आणि मी बदलापूर, दारातून बाहेर घेऊन आलो, स्कूटर वर येताना माझ्या समोर एक रिक्षा वाला थुंकला तरी मी दुर्लक्ष केल कारण  माझ्या मनात सिनेमाचा Climax घोळत होता . Paradigm Shift च मला एक उत्तम उधारण आशिष नी दिल   होतं .

"एकदा तो ट्रेन ने मुंबईला परत येत होता आणि त्याच्या शेजारी एक माणूस आणि त्याचा एक तीन चार वर्षांचा मुलगा होता तो सारखा टाहो फोडत होता, मधेच आई पाहिजे अस ओरडायचा , तो माणूस त्या मुलाला समजावत  न्हवता कि अरे आपण जाऊ थोड्या तासांने भेटेल आई, हे चोकलेट  घे , कि आणि काही , अगदी निर्विकार होता. लोक आपापसात बोलत होती काय लहान मुलाला एकट पाठवला आणि बाप असा . शेवटी न राहून एका काकूंनी विचारलं कि अरे समजाव त्याला जाऊ आईकडे आणि कशाला पाठवलं तुमच्या बरोबर तुम्हाला नाही सांभाळता येत ते? तो म्हणाला बाइको चार दिवसी पूर्वी वारली माझी, मुलाला परत घरी घेऊन चाललोय माहेरी होती ती … काय समजाऊ मुलाला?  सगळ Compartment सुन्न झाल, म्हणजे हा Paradigm Shift." आधी त्या माणसाला काय माणूस आहे? अस म्हणणारे अरेरे काय माणूस आहे अस झाल 

म्हणजे प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला Villain आणि त्या त्या वेळेला Hero असतो . दिग्दर्शकाला आख्खा  चित्रपट तोंडपाठ होता पुढे काय होणार माहित होत , त्या मुळे एक गती होती. थोडा लांबला, अजून छोटा असता तर आणखी परिणामकारक झाला असता. अभिनय उत्तम, म्हणजे अगदी हवालदारने पण उत्तम अभिनय, नावाझुद्दिन बद्दल काय बोलणार त्याला साजेशी भूमिका सहज अभिनय त्याचा राग येतो हसू येत कीव येते चीड येते. वरुण खूप  शिकला असेल , प्रगती आहे, जे सांगितलय ते केलंय, विनय पाठक  गुणी आहेच, हुम  खुरेशी ला rating  ४ पैकी ५ कारण ती येउन तिच  नुस्त काम करून जाऊ शकली  असती पण  तिने ते आणखी चांगल केलय, विनय पाठक  च्या बाईकोच काम अप्रतिम झाल आहे. 

पावसाचा उपयोग गूढ पणा वाढवायला उत्तम केलाय (आपण Romance करता कमी करतो उपयोग पावसाचा ), कारण खूप पाउस रात्री भयाण वाटतो. ज्या माणसाचा आयुष्य एका क्षणात उध्वस्त झाल  असत तो उरलेलं आयुष्य फक्त एकाच ध्यासान फिरत राहतो. पण मग बदला घेतल्यावर काय? सस्पेन्स वगेरे नाही अजिबात, पहिल्याच  पाच मिनटात कुणी खून केलाय का केला ते समजत आता वरुण काय करणार हे माहित असत, पण मग अचानक त्याने काय कराव ह्याचा विचार आपण करतो बरोबर का चूक हा वाद आपण आपल्याशीच घालतो, एक वाक्य  जे  नावाझुदिन म्हणतो ते खूप सांगून जातो तो म्हणतो मी खून केला कारण मी चिडलो होतो घाबरलो होतो दोन मिंट होती, पण तुझ्या कडे पंधरा वर्ष होती  मग असा का वागलास? आणि मग ते जो करतो त्याला आपण  कसा react करायचं ते कळतच नाही , अगदी अनपेक्षित. सूड , बदला म्हणजे काय? कश्यासाठी हे विचार करायला लावतो. Mind Games म्हणजे काय हे उत्तम दाखवल आहे नक्की माणूस काय विचार करत असतो हे आपल्याला कळू शकत नाही हे फार छान दाखवल आहे 

सिनेमा मध्ये गाण  नाही कारण गरज नाहीये, रोमान्स नाही, violent  आहे पिक्चर पण वेगळा, डार्क सिनेमा म्हणले लोक, असेल, पण मनाला इजा करतो म्हणून violent. दोन चार गोष्टी नाही पटत ते ठीक आहे. पण बघण्यासारखा आहे, अती क्रूरता दुष्टपणा सहन करू शकला तर, गम्मत म्हणून बघण्य सारखा नाही हा सिनेमा. 

एक सांगायचं म्हणजे अगदी climax ला पाठी एका गुजराती माणसा ला फोन आला आणि तो आणि त्याची बाइको हसून बोलले पाच मिंट, पण तरीही मी पाठी वळून त्यांना काही नाही बोललो … बिचारे वाया गेले पैशे त्यांचे उगीच आले होते.  




















शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

AIB

मी  आज AIB चा कार्यक्रम you tube वर पाहिला …. हसायला येतच जर तुमची शिव्या  
ऐकायची हरकत नसेल आणि तुम्हाला अश्लील विनोद आवडत असतील तर बघाच  मला आवडला … म्हणजे मी स्वतः  जाऊन काही तिथे भाग घेऊ शकणार नाही (मला कशाला कुणी बोलवेल?).  अक्षरशः आई बहिण …. म्हणजे आ   ई    ब     ही   ण काढली  आहे सगळ्यांनी सगळ्यांची …… म्हणजे तुम्हाला एक तर प्रसिद्ध असावा लागेल आणि तिथे भाग घेण्याची हिम्मत. खर म्हणजे  अगदी खर बोलले आहेत आणि बरचस आपल्या मनातलं (शिव्यान सकट), करण जोहर बद्दल त्याच्या समोर आणि   त्याने सुधा स्वतःवर विनोद केलाय आणि हस्लाय … खूप जास्त अश्लील आहे मान्य आहे पण तस  आधी सांगितल आहे … हव तर घ्या नाहीतर द्या सोडून … उगीच रस्त्या वर पडलेली काडी कानात (किव्हा तुम्हाला हवी तिथे ) घालायची आणि कान दुखतो म्हणून ओरडत बसायचं , त्यातला प्रकार आहे 

हा विनोद भारतीय स्वरूपाचा नाहीच , आपण मित्रान मध्ये आई बहिणी काढतो पण चार चौघात नाही , पण आता जग बदलत  आहे जस आपण बर्गर स्वीकारला तस  हे हरकत नाहीये (इलाजही नाहीये)…. मला कुणी बर्गर खा अशी जबरदस्ती करत नाही न? तशी मला कुणी AIB बघ अशी जबरदस्ती करत नसेल तर मला त्यात गैर वाटत नाही …. अस असेल तर आधी "होणार सून मी ह्या घरची बंद करा" (हे फक्त एक  उधारण होत , सगळ्याच बंद करायला हव्यात खर तर ) काय पण दाखवतात आम्हाला उल्लू समजतात आमच्या अकलेचे आई बहिण काढतात , इथे तर लोक स्वतः  स्वखुशीने जातायेत आणि तीन एक हझार  रुपये देऊन (एका तिकिटाचे). मग एस्सेल वर्ल्ड बंद करा तिथे लोकांना तुम्ही वरून खाली टाकता  गोल फिरवता घाबरवता आणी  रग्गड पैसे  घेता , त्याला तुमची ना नाही न? तर मग ह्याला का? लोकांनी कृपा करून इतरांनी कश्यावर हसायचं आणि हसू नये हे ठरवू नये … आणि भारतीय संस्कृती बद्दल तर अजिबातच बोलायचं काम नाही …  

आपण  हल्ली खूप impatient   झालोय, पण विनोद बुद्धी पण विसरलोय का ?  तिथे  सर्व अपमान स्व खुशीने होतोय रग्गड पैसा मिळतोय सगळ्यांना आणि ते सुधा त्यांना सांगून त्यांच्या मर्जीने (its scripted रे ),  मग हे का? कशाला? जर एवढ बबाल झाल नसत तर मी हे पाहिलं पण नसत. किव्हा  त्यांचाच हाच  हेतू  नसेल न?  बघितल माझ्या मनात पण शंका आली आता …  जाऊदे यार मजा करा जरा लोकांना हसू द्या स्वतःवर  आणि  इतरांवर आणि त्यांच्या संमतीने …… 





बेशिस्त

मी परवा बडोद्याला गाडी घेऊन गेलो होतो … NH8, छान आहे रस्ता , फक्त एके ठिकाणी  भारुच्ला वाईटट  (ट ला ट) अडकलो आणि म्हणून थोडक्यात ज्या करता गेलो ते नाही झाल . वडीलांची मावशी वारली वय वर्ष ९४ - ९५ . बातमी आल्यावर तातडीने निघालो, पण तिथे स्मशान आठाला  बंद म्हणे, त्या मुळे  शेवटच दर्शन हुक्ल. पण हा नियम समजला नाही मला, एरवी अतिशय बेशिश्त लोक, हे असले फाजील नियम का घालतात आणि पाळतात कुणास ठाऊक, आता वेळ सांगून येते का? 

तीथे  गेल्यावर मला कुणी विचारल गुजरातचे रस्ते कशे आहेत आमच्या? मी म्हणालो महाराष्ट्रात जास्त चांगलाय आणि  लवकर येता येत गुजरात आल कि सगळा गोंधळ, लोक उलट काय येतात , पहिल्या लेन मध्ये काय हळू हळू काय  चालवतात , म्हणजे सगळे नियम अगदी धाब्यावर , कुणाला पडलीच नसते कुणाची स्वार्थी सगळे …  आणि हे लक्षात सुधा येत नाही कुणाच्या की त्यांच्या मुळे सगळ्यांना हळू जावं  लागत. एक तर आपल्या राज्याला देशाला दुसऱ्या कुणी बोललं कि मला नाही चालत, ते आमच आम्ही पाहू आणि मुंबईत आपण थोडे जास्त शिस्तीने वाहन चालवतो (पूर्वीची मुंबई नाही हो राहिली आता ), चाईला मला काय विचारता रस्त्याबद्द्दल शिस्ती  बद्दल . माकडा कडे चांगला पेन दिल म्हणजे तो काय छान  चित्र काढेल का? मुळात अंगात असेल तर दिसेल , हो  कि नाही ? 

पण मला आता गुजरात च्या यशा बद्दलच शंका वाटू लागली आहे, कारण सारख नियम मोडून  आणि मोडीत काढणारी ही जमात इतकी कशी पुढे जाऊ शकते आणि प्रगती करू शकते? आम्ही येताना सुरत ला गेलो तेव्हा येताना एक छोटस रेल्वे च फाटक लागल, तर ही शूर वीर माणस अख्ख फाटक अडून उभे होते म्हणजे अर्धा भाग जाईला  आणि अर्धा यायला असा हवा न? तर दोन्ही बाजूला लोक फाटकाला चिकटून उभे ,  गाडी गेली फाटक उघडल तरी कुणीच पुढे जाऊ शकत न्हवत ,  सामोरा समोर लोक उभी ठाकलेली, एकाच जागी पाउण  तास …. कठीण आहे सगळ.  म्हणजे शिस्ती पेक्षा बेशिस्त फायद्याची आहे का?