रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

आवडता शिक्षक


आमच्या (जिमच्या)परुळेकर सरांना मी गुरुजी म्हणतो :) मस्त माणूस आहे, व्यायामाचं ज्ञान देतोच पण त्या बरोबर आयुष्य, जीवन आणी इतर बरच काही, म्हणजे शिकायला जातोय का आणि हा माणूस मला शिकवतोय काय? मी शिकलो अश्या बऱ्याच लोकांन  कडून आणि अजूनशिकतोय.  त्या दिवशी जिम मधून बाहेर पडताना माझा मनात आलं कि ह्या सगळ्यांनी ज्यांनी मला शिकवल त्यात माझा सगळ्यात आवडता शिक्षक कोण ?

 .....हाच प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर? तर साधारण पणे शाळेतले किव्हा कॉलेजातले सर किव्हा बाई असं म्हणाल , फार तर शिकवणीचे एखादे मास्तर,  एखाद अगदीच गुणी मुल, "माझे पहिले वाहिले शिक्षक माझे बाबा व माझी आई!" असं हि म्हणेल (म्हणूं दे हो माझा काही विरोध नाही),  माझी बायको अस म्हणणारा प्रामाणिक वर्ग ही असेल.  

पण माझं काय? मला  शाळेतल्या किव्हा कॉलेजातल्या शिक्षकांनी काय शिकवलं? अभ्यास?  पण मला अभ्यास कधीच आवडला नाही.   मी शाळेतल्या,  कॉलेजातल्या वर्गात काहीच शिकलो नाही (नाही म्हणायला लिहायला वाचायला शिकलो हे काय कमी नाही). साक्षर झालो शिक्षित नाही, पण असा आवडता शिक्षक? सांगण फार कठीण. माझ्या  अनाहूत पणे मी शिकत गेलो, बसवून कुणी शिक, असं म्हंटल तर मी तसा शिकणाऱ्यान पैकी नाहीये, त्या मुळे नकळत खूप शिकता आल.

.

आमच्या चीनाय कॉलेजच्या  बाहेर पानाच्या  गादीवर तिवारी बसायचा, एकदा इकॉनॉमिक्स वर चरचा चालू असताना हा सटासट मार्क्स वगैरे बोलून गेला,  पाना ऐवजी पाय दे म्हणालो. त्याला विचारल रे बाबा तुला एवढं कस माहित, मला आत बसून येत नाही तुला पानाच्या गादीवर बसून कस येत? तो म्हणाला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी चा MA आहे मी Economics मध्ये केल. माझा तो पण एक शिक्षक होता आणी खूप चांगला. MA करून क्या मिळाल त्याला काय ठाऊक? शेवटी विड्याच विकायचा.  पण ते एकॉनमिकस त्याला धंद्यात किती कामाला येतंय ते ठाऊक नाही, त्याच्या ह्या ज्ञाना  मुळे कायम मुलांच्या (आणी त्याच्या गिराहीकाच्या ) घोळक्यात असायचा. 

लहान पणी आम्ही साठ्यांच्या कयऱ्या तोडायचो म्हणजे कयऱ्या होत्या अंब्याच्याच पण त्या साठ्यांच्या  वाडीत होत्या, आम्ही त्या वाडीच्या बाजूच्या बिल्डिंग मधून तोडायचो दगड मारून, मग ते साठे आमच्या मागे धावायचे, आम्ही धूम ठोकायचो, वास्तविक कयऱ्यान मध्ये न आम्हाला रस होता ना त्यांना, सगळी मजा दगड मारून पळण्यात होती, त्यांना आमचं घर ठाऊक होत म्हणजे ते कधीही घरी येऊ शकले असते, पण त्यांनी तस केल नाही कधीच, (दत्तपाड्यात साठ्यांच्या कैऱ्या न तोडलेला माणूस तुम्हाला मिळण अशक्य. म्हणजे त्या काळी आता तिथे इमारत आहे मोठी).   पण त्यातून खूप शिकायला मिळाल मला तेव्हा  मझ्या एका मित्रा कडून, तो आत उडी मारून आणायचा  कैरी, पण साठे कधी पाठी पळतील आणि कधी नुसती हूल देतील ते त्याला कळायचं तो गुण मला अजून उपयोगी पडतो कोण नुसती हूल देतोय आणी कोण कधी अंगावर येतोय हे कळायला सोप जात. चुकतो अंदाज कधी कधी, पण बहुतेक बरोबर असतो. तो मुलगा चाळीत राहणारा त्याला सवय असेल अस करायची आणी पळायची, त्याने बरच उद्योग केले असतील पण माझा तेव्हा तो आवडता शिक्षक होता, काय पण विनोद आहे बघा :).

तसा मी एकदा वर्गात पण शिकलोय . Baan मध्ये असताना "Presentation skills" अश्या एका कोर्स साठी मला पाठवल होत, ३ दिवस residential होता कोर्स , तिथे मला अरविंद नाडकर्णी नावाच एक संथान भेटलं , त्यांनी ३ दिवस आम्हाला कस presentation द्यायचं ?हेच नुसतं शिकवल नाही तर एकूण आयुष्या कडे कस पहावं ?माणूस कसा ओळखावा ? तुम्ही जीवन कस जगावं? हे शिकवलं . म्हणजे त्यांनी फक्त PPT कशी चांगली बनवायची हेच खर तर सांगितलं , पण त्यात कस उभं राहायचं ?तुमचा प्रेक्षक कसा ओळखायचा? content काय हव? शब्दानं पेक्षा हाव भाव , आवाज , उच्चार हेच कसे जासत महत्वाचे ते सांगितलं . जगात चांगल किव्हा वाईट काहीच नसत फक्त परिणाम असतात . There is nothing good or bad, only consequences. हे मी शिकलो, लोक तुम्ही बोलताना मुद्दाम तुम्हाला त्रास देतील, पण आपण आपला focus कायम ठेवायचा, नन्हाचा पाढा गिरवायचा नाही.........  अजून सगळ वळत नाहीये, पण खूपदा त्यांची शिकवण कामाला येते . त्या ३ दिवसात मीच सगळ्यात जास्त शिकलो , PPT फक्त एक १०% होत ९०% बाकी सगळ , नाही म्हणायला मी पहिला आलो सगळ्यान  मध्ये  कारण बहुदा ते  नकळत शिकवत गेले तेच शिकत गेलो आणि PPT आपोआप येत गेली . शेवटी त्यांनी जे शिकवलं ते आयुषयात जास्त उपयोगी आहे,  लोक ओळखणं , कुणाला काय आवडत ते देण , हाव भाव, हालचाली, positive  राहणं आणि अस बरच काही , साधा, सरळ आणि सोप 

गुरगावला असताना मला Financeच बाळकडू एका सायकल वर विड्या काड्या विकणाऱ्या माणसाने दिल होत. मी जीथे Finance च  ट्रेनिंग दयायला गेलो होतो तिथे, सायकल घेऊन उभा असायचा. त्याला विचारल मी कि किती  धंदा करतोस? 100 - 200 चा माल विकतोस का? किती वेळ काम करतोस ? मला म्हणाला "साहब  रोज का 500 का मुनाफा हो इतना भेचता हूं सायकल है आप का लंच टाइम हो जायेगा उसके बाद ओह कॉल सेंटर वाले है फिर ओह शाम को ओह फॅक्टरी चुटती है  फिर रात मे  कॉल सेंटर. अगर जल्दी हो गया तो शाम मे घर नही तो रात को मॉल के बाहर". हे उलट calculation मला शिकायला कित्येक वर्ष गेली आणी हा माणूस ज्याला साधा sms पण वाचता येत न्हवता त्याला..  हे उपजात होत? का तो धंदा करता करता शिकला? हे तुम्हाला कुणीच कधीच शिकवत नाही, हे तुम्हीच स्वतः शिकता.

ही अशी अनेक माणस मला भेटली ज्यांच्या कडून मी शिकत गेलो,  काय शिकवायचं होत त्यांना आणि मी काय शिकलो. तुम्ही  पण आठवून बघा असे बरेच शिक्षक तुम्हाला आठवतील . 

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

Demonetisation

Finally, I had to do what was being procrastinated from the 8th of November. There was no need for me to do this, but my kamwali bai has no bank account (is the P.M. listening?) and the watchman needed payment for the car washing services. All my other payments get done by 7th (smart move actually to demonetise on the 8th), this two have a different due dates and hence the problem. So finally after a period of 10 days, I found myself  in a line outside my bank at 8:30, the bank opens at 9:30 I am told. One hour to check my whatsapp and catch on my phone, its too boring to see  all  messages convincing me that Modi is great  and it's OK to suffer a little. 

Hell I am sold on the move, hence the delay in withdrawing, but give me a break.Let us do some constructive help (I just said a big "good morning" and thanked the cashier and the  deputy bank manager for their efforts),   but there is a lot of stuff that we can do, like educate the maids  and drivers and  watchmen and the small time vegetable vendors and rickshawalas. Install apps  like paytm to make life easier for all. Stop forwarding messages for and against the step taken Secondly avoid withdrawing lot of money from banks to keep   at home, I have seen people withdrawing 50000 (48000 to be precise from two accounts)for keeps sake. Why would you need so much money when you have debit/credit card? The weekly expenses in cash cannot be much. Do keep some cash for others, don't be greedy. 100% people in the line were convinced that this will teach a lesson who have black money and how it is not possible to get away with hoarding money from now on. 

It may take months to get to normalcy, so don't lose patience now. After a  cancer surgery when a patient is undergoing  the chemo therapy, he loses appetite and his hair also, so do we stop it midway? No. It has to be complete, corruption is a cancer, you cannot expect it to go away by a paracetamol.  The patient needs utmost support of the family and his morale needs to be high. Medicine is given and is approved by all the experts and expectedly, we have some realtives who are more of a foe and wants the family to do a  abracadabra thing to wish away the black money, so they are safe and it helps them that the patient remains sick. I still wonder what is dereck o'Brien doing in TMC and shouting alongside Mamta ? He seemed a good host in Bournvita quiz contest.

And let us not put some body on a pedestal and make a god out of him nor kill some one by branding him a  devil (well "आप" को कुछ exception allowed है), we all are humans and all are equal (though we treat some people more equal than others)so get on with life and help fellow citizens instead of just opposing, swearing or praising and praising and praising.....India is rising let us rise together.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

वेडा

दत्तपाड्याला आमच्या शेजारच्या बिल्डिंग चा नाव होत चंद्रतेज आमची जय हरी आणी  आमच्या बाजूला कृष्णकमळ. चंद्रतेज मध्ये ग्राउंड फ्लोर ला अनेक फ्लॅट्स होते, पाठी दोन होते, पुढे एक अर्धाच असा होता थोडं विचित्र होते ते, लहान लहान दोन, एक सिंगल रूम चा होता. त्या ठिकाणी खूप लोक येऊन गेली, काही घरात बघा लोक नाही टिकत सारखी बदलतात, तसेच होते ते रूम्स, सारख्या बदलायच्या फॅमिलीस. 

एकदा तिकडे एक माणूस आला त्याची बायको आणी एक मुलगा होता वाटतं ; चांगला होता माणूस, शांत वयस्कर थोडा, पण समोर आला कि हसायचा. शाळेत असेन मी, मुलगा अगदीच लहान होता. तो माणूस सकाळी जाऊन संध्याकाळी यायचा परत. खूप एक महीन्यानी  का वर्षांनी तो घरीच दिसायचा. फॅक्टरी मध्ये स्ट्राईक वगैरे झाला अस कळलं आमहाला, मला आधी स्ट्राईक वगैरे म्हणजे माहीतच न्हवत  तेव्हाची गोष्ट आहे,(गिरणगावची वाताहत झाली ते नंतर समजल)थोडे महिने झाले तरी हा घरीच दिसायचा, त्यांच्या कडे पैसे नाहीत अस कळलं मला, त्यांच्याच बिल्डिंग मधल्या मुलानं कडून. शाळेत बघा आपण आपण मित्र जमा होतो आणी काही गप्पा मारतो म्हणजे काही पण आपण घरून ऐकून येतो आणी बडबडतो, त्यातच एकदा  मला कुणीतरी सांगितलं   अस सहज बोलता बोलता आम्ही नुसतं ह्म्म्म.... अच्छा असं केल. त्या  वयात पैसा म्हणजे काय ?त्याच महत्व काय? स्ट्राईक वगैरे गोष्टींच महत्वच कळत  न्हवत . मोठेपणी कळत आपल्याला, कष्ट म्हणजे काय? त्याच काय आणि किती महत्व असत ? असो तेव्हा नीटस कळलं नाही पैसा  नाही वगैरे म्हणजे. 

मग काही दिवसाने त्याची बायको जाईची सकाळी कामावर, कुठे जाईची कोण जाणे, कंपनीत वगैरे असेल ,ती पण संध्याकाळी घरी यायची सकाळी जाऊन. मग घरच काम हा माणूसच करायचा. संध्याकाळी बायकोची वाट बघत उभा राहायचा गेट वर, ते गेट चे दोन गज पकडून, आम्हाला मैदानात खेळताना बघत बसायचा , लांबून दिसली बायको,  कि छान हसायचा. आता आठवल कि वाटत  कि करुणहसायचा ,   खूप तोंड भर हसायचा  पण डोळ्यात काही तरी दिसायच त्याच्या, माझ्या बालमनाला उमगण्या पलीकडे होत ते. 

शांत माणूस, कधी भांडण नाही काही नाही कुणाच्या अज्ञात  ना मद्यात, मुलाचे लाड करायचा, आमच्या कडे बघून पण हसायचा , प्रेमळ हसायचा बोलायचा नाही अजीबात,मुलाशी पण अगदी हळू आवाजात बोलायचा. ती लोक कधी फिरायला जाताना पण नाही पहिली मी.   

मग काही वर्ष गेली आणी तो गायब झाला. अचानक. कुठे गेला कळलंच नाही, बायको पण ते घर सोडून गेली मुलाला घेऊन.  त्याच्या बिल्डिंगची लोक   म्हणायचे की वेड लागल त्याला, मला काहीखर नाही वाटल  ते   खूप साधा सरळ होता , पण एके दिवशी आमच्या समोरच्या ग्राउंड मध्ये तो बसला होता , दाढी वगैरे वाढली होती,फाटके कपडे, एक पोत  होत हातात .  मी कॉलेज ला जात असेन तेव्हा, पण खर  सांगतो तुम्हाला, एकदम सुन्न झाल डोकं.  सण कन अस काहीस झाल  मला. नेहमी यायचा तो माणूस, तिकडेच बसायचा मैदानात  बिल्डिंग कडे बघत त्या गेट कडे बघत, नेहमी सारखाच हसायचा नुसता, आजूबाजूच्या बिल्डिंग मधली लहान मूल पण त्याच्या कडे बघून स्माईल दयायची, हा पण हलकेच हसायचा, एक दोघ  लहान मुल जवळ पण जायची, तो नुसता त्यांना शेक हॅन्ड वगैरे करायचा, पण वेड्या सारखं काही नाही मारामारी नाही आरडा ओरडा पण नाही करायचा, लहान मुलांना बघा कधी कधी आपल्याला वाटली तरी त्याना नाही वाटत भीती , त्यांच काहीतरी वेगळच असत sixth sense का काय ते. 

मग तो माणूस पण यायचा बंद झाला.   काय होत त्या फॅमिलीच माहीत नाही मला. स्ट्राईक झाला कंपनीत म्हणून वेड लागलं का आणखी काही होत ? कळलंच नाही. माझ्या मनात मात्र राहील होत  कित्येक वर्ष पण तो माणूस अजून लक्षात आहे माझ्या. 

कुणाला कधी आणी का वेड लागेल ते सांगता येत नाही.....  










शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

बैल गाडी

बैल गाडी 

गाव कुठलं रे तुझं? लहान पणी हा प्रश्न अगदी common होता (आता चायला राज्य कोणतं असं असत)मग मी मुंबई हे उत्तर द्यायचो ..... अरे तस नाही गाव अस विचारल मी, मला काहीच कळायचं नाही लोकांना खर बोललं कि पटत नाही खोट अगदी लगेच पटत (कोर्टात खरं सिद्ध करायला २० वर्ष लागतात), मग मी गिरगाव अस सांगायचो, मग चेष्टा होईची, अरे  मुंबईच्या बाहेर काही आहे कि नाही गाव ? एक तर लोकांना काय करायचंय? नसेल ह्याला गाव हे पटायला काय हरकत आहे?

आम्ही सुट्टीत कधीच कुठे नाही गेलो, अतुल दर वर्षी त्याच्या गावाला जाईचा कोकणात (येताना खोबऱ्याची वडी वगैरे आणायचा माझ्या साठी नाही असं नाही)   आणी मग काय काय सांगायचा गावा बद्दल त्या घरा बद्दल नारळाची झाड  आंबे, मस्त वाटायचं ऐकायला. 

पण आम्हाला गावाचं नाही त्याला मी तरी काय करणार?    नंतर नंतर (आणी आत्त्ता सुद्धा)मी सांगायला लागलो, माझं गाव वारुड भुसावळ जवळ, खान्देशी आहे मी , वडील आठ वर्षांचे असताना आजोबा आणि एक बहीण वारली म्हणून आजी त्यांना आणि आत्याला घेऊन बडोद्याला गेली  (खर तर खूप ठिकाणी, पण जे लोकांना पटकन कळत ते सांगायला शिकलो, मग धींनोज, महिसाणा, आवाखाल हे सांगितलं तर गाडी भलतीकडेच जायची), वडील  सुद्धा  फक्त एकदाच गेले तिथे कूळ कायद्यात जमीन गेली तेव्हा सह्या करायला आणि ७/१२ आणायला (हे ७/१२, कूळ कायदा एकदम भारी होत, मग लोक थोडे बॅक फूट वर जातात ), बर बर म्हणतात कारण त्यातल्या निम्याहून अधिक लोकांना ७/१२ म्हणजे काय? ते माहित नसत  आणी बऱ्याच लोकांची समजूत कूळकायदा म्हणजे कुलकर्ण्यांचा काही तरी कायदा असेल अस वाटत (तरी मी कुल आहे कूळ नाही हे विसरतात). माझी लगेच बाजू सर आणी आणखी काही विचारल  तर हा सागर हा कुळून काढेल म्हणून गप्प बसतात. 

वडिलांचं असं तर आई गिरगावातली म्हणजे १००% मुंबईकर, तस तिची  आजी राहायची जोगोडीला, म्हणजे पुण्याहून जेजुरीला (हल्ली फार फार्मात आहेत राव म्हणून हा reference दिला, तर तिथेच वाटेत)   जाताना लागत, बिनाताई एकदा गेली होती (तिच्या) लहान पणी, आता जमीन गेली तिथली , म्हणजे विकली (आम्हाला मातीच मिळाली) आत्ता तिथेच कुणी नसत आणि खूप वर्ष कुणिच न्हवत. म्हणजे दोन्ही कडून गाव नाहीच. तर सांगायचा मुद्दा असा कि मी मला गाव नाही, किव्हा मुंबईच माझं गाव.    

तर गाव आम्ही नुसतं मित्रांकडून म्हणा चित्रात (आणि चित्रपटात) पाहील होत, कधी तरी पुण्याला जायचो (आत्ता काय तेव्हा सुद्धा गाव म्हंटलं असत तर मुळा मध्ये बुडवला असत आम्हाला, तेव्हा असायचं बाबा पाणी मुळा नदी मध्ये) आणी अक्का (आईची आई ) राहायची  पर्वतीच्या पायथ्याशी  म्हणजे मेन पुण्यात नाही (त्या वेळच्या) ते थोडं गाव बाहेर होत म्हणजे गावच्या बाहेर होता अक्काचं घर म्हणून सदाशिव पेठ हे गाव  अस म्हणायचं, पण पुण्याला गाव नाही म्हणायचं? कारण ते शहर आहे (किचकटच लोक सगळी) . म्हणजे सुट्टीत चुकून आम्ही गेलो कधी बाहेर तर ते पुण्याला आणि ते गाव  न्हवत. 

गावात शिकायला खूप मिळत असं माझं मत आहे कारण सगळं नैसर्गिक असत आपल्या इथे सगळंच कृत्रिम आहे एकदम रेडी मेड, नंतर नंतर मी बऱ्यापैकी फिरलो आणी ऑडिट ला तर फॅक्टऱ्या गावात असायच्या, गवत शेत, झाड प्राणी सगळीच वेगळी असतात तिथे. 

मला एक खूप मोठा धडा मिळाला होता ते एका गावात, नाव हि आठवत नाही मला आता आणी त्या शिक्षकाचे तर मी  नाव सुद्धा न्हवत विचारलं. कारण मला त्यातला अर्थ किव्हा बोध का काय ते २० एक वर्षांनी उमगला (म्हणून कृष्ण लागतो अर्जुनाला) .  

मी एका शुगर फॅक्टरीच्या ऑडिट साठी वगैरे साठी गेलो होतो तर तिथे खूप सारा ऊस घेऊन शेतकरी यायचे कारण साखर बनवायला ऊस लागतो (म्हणजे ऊसच लागतो)तो ऊस  शेतकरी लोकजवळ असेल तर  बैल गाडीतून आणायची (आता ट्रॅक्टर वर पण नेतात) आणी ती  गाडी अगदी ओतप्रत भरायची. बैल बिचारी वजनाने वाक वाक वाकायची, ओझ्याने वाकण म्हणजे काय हे मी अगदी पाहिलंय. काही काही बैल खूप उमदे, उंच गोरे रुबाबदार  असतात  (काही लोक बघा अशी रुबाबदार असतात पण अगदी बैलोबा आहे असं म्हणतो आपण?)काही मध्यम असतात, कधी कधी काटकुळे बैल पण बांधतो एखादा माणूस गाडीला आणि तोंडातून फेस येतो त्या बैलाच्या, म्हणजे तोंडातून फेस येतो म्हणजे काय हे पण मी पाहिलंय   (सगळं गाव कडे).

मी असाच एकदा त्या गावातल्या एका रस्त्या वरून चालत असताना समोरून एक बैल गाडी येत होती, दोन्ही बैल  एकदम उमदे होते उंच, पण तो बैल गाडी वाला स्वतः बैल होता, गाडी हाकताना त्याच्याच तोंडातून फेस येत होता. मी म्हंटल, अरे हे बैल इतके मस्त आहेत पण गाडी अशी काय हळू हळू आणि वाकडी तिकडी येतेय ? बाजूला एक गाय चारणारे (गाईला घेऊन फिरणारे )आजोबा होते, ते म्हणले की बैल जोडी न घेता ह्याने वेगळी बैल  लावली हायेत एकत्र  ..... complete confusion ...  अरे पोरा  दोन्ही बी बैल उत्तम असून  न्हाई चालत ती जोडी उत्तम हवी .... एक बैल दुसऱ्या पेक्षा ताकतवर असला तर तो दुसऱ्याला खेचणार  आणी मग दुसराची फरफट मग ह्यो त्याला रोखणार, झाली ना गडबड? गाडी जाईची कशी ती पुढ?अन जर दोग बी ताकतवर असली अन त्यांच  पटत नसल की बैल गाडी दोग बी इरुद्ध दिशेला खेचनार . एक घाबरत असला तर दुसरा त्याला चेपनार आणि तो मग लवकर मरनार कारण सगळा भार तोच पेलनार अन दोघे बी सारखीच हवी स्वभावानं.......... अन वळू न्हाई बांधत गाडीला, समजलं काय? 

कुनी एकाला कमी न्हाई चालत खायला दिल तर, एकाला पौष्टिक अन एकाला साधा चारा न्हाई चालत दोगांना बी तेवढच काम अन तेवढाच आराम.  मंग सोपं असतंय होय? बैल गाडी म्हंजी घेतले बैल अन बांधले कि न्हाई व्हत, प्रानी हाई मोटार न्हाई  नीट बघून गाडी बांधून आणि मंग काळजी घ्यावी लागते तव्हा कुठं नीट चालतंय     

आता ह्यो मानूस, ह्याने ह्यो  ऊस काढून झाला कि दोघांना बी येगळं न्ह्यायला हवं ही जोडी कधी बी चालायची न्हाई त्यात बैल गाडीवाला बी खपनार ... ..... 

हे लॉजिक कळायला मला य वर्ष गेली कारण  मी फक्त बैल जोडी बघत होतो , पण ही गोष्ट  सगळ्याच जोड्यांना लागू होते, टेनिस मध्ये बघा बॅडमिंटन, क्रिकेट बघा two bowlers always hunt in pairs  म्हणतात, opening batsman पण दोघे एकमेकांना किती complementary हे जास्त महत्वाचं. नुसतेच best असून नाही चालत आपला जोडीदार सगळ्यात best असण्या पेक्षा माझ्या करता best आहे का? हे बघायला हवं.  किती तरी उधाहरणं आहेत. आपले पेस आणी सानिया बघा डबल्स मध्ये खूप चमकले, पण सींगल्स नाहीत. पण ती दोघे एकत्र खेळली तेव्हा नाही चमकली. भूपती तर फक्त पेस असतानाच चमकला.  म्हणजे compatibility महत्वाची.      

लग्न झालेल्या जोड्या बघा, कधी कधी किव्हा बहुतेकदा एकच माणूस ओढतो गाडी संसाराची, ओझ्या खाली दबणं, काम करून तोंडातून फेस येणं हे सगळंच आपण बघतो (अनुभवतो) कारण  आपण दोन उत्तम माणसं जोडण्याचा प्रयत्न करतो आणी कधी विस्कटलच तर आश्चर्यचकित होतो, खूप जोडपी असच खेचतात आयुष्य कुणीच सुखी नाही आणि ते जो संसार वाहतात त्याची वाताहत होत असते आणी त्यात त्या कुटुंबाची सुद्धा. संसार आला कि हे होतच असं म्हणतो. 

पण जोड्याच जर निट लावल्या तर? ते बैल गाडी सारखच same logic  लावल तर? संसाराचा गाडा दोघांनी खेचायचा असतो नाहीतर वर  त्या आजोबांनी सांगितल्या  सारखं होत आणी  बाहेरच्या लोकांना ज्यांना  दिसतंय कि संसारत नुसती ओढाताण होतेय तर ती लोक बैल वेगळी का नाही काढत? एका बैलाची गाडी सुद्धा असतेच ना? लागली जोडी तर लागली, नाहीतर नाही, आयुष्य तरी वाढेल बैलाचं (म्हणजे बैलीच सुद्धा) ....