रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

आवडता शिक्षक


आमच्या (जिमच्या)परुळेकर सरांना मी गुरुजी म्हणतो :) मस्त माणूस आहे, व्यायामाचं ज्ञान देतोच पण त्या बरोबर आयुष्य, जीवन आणी इतर बरच काही, म्हणजे शिकायला जातोय का आणि हा माणूस मला शिकवतोय काय? मी शिकलो अश्या बऱ्याच लोकांन  कडून आणि अजूनशिकतोय.  त्या दिवशी जिम मधून बाहेर पडताना माझा मनात आलं कि ह्या सगळ्यांनी ज्यांनी मला शिकवल त्यात माझा सगळ्यात आवडता शिक्षक कोण ?

 .....हाच प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर? तर साधारण पणे शाळेतले किव्हा कॉलेजातले सर किव्हा बाई असं म्हणाल , फार तर शिकवणीचे एखादे मास्तर,  एखाद अगदीच गुणी मुल, "माझे पहिले वाहिले शिक्षक माझे बाबा व माझी आई!" असं हि म्हणेल (म्हणूं दे हो माझा काही विरोध नाही),  माझी बायको अस म्हणणारा प्रामाणिक वर्ग ही असेल.  

पण माझं काय? मला  शाळेतल्या किव्हा कॉलेजातल्या शिक्षकांनी काय शिकवलं? अभ्यास?  पण मला अभ्यास कधीच आवडला नाही.   मी शाळेतल्या,  कॉलेजातल्या वर्गात काहीच शिकलो नाही (नाही म्हणायला लिहायला वाचायला शिकलो हे काय कमी नाही). साक्षर झालो शिक्षित नाही, पण असा आवडता शिक्षक? सांगण फार कठीण. माझ्या  अनाहूत पणे मी शिकत गेलो, बसवून कुणी शिक, असं म्हंटल तर मी तसा शिकणाऱ्यान पैकी नाहीये, त्या मुळे नकळत खूप शिकता आल.

.

आमच्या चीनाय कॉलेजच्या  बाहेर पानाच्या  गादीवर तिवारी बसायचा, एकदा इकॉनॉमिक्स वर चरचा चालू असताना हा सटासट मार्क्स वगैरे बोलून गेला,  पाना ऐवजी पाय दे म्हणालो. त्याला विचारल रे बाबा तुला एवढं कस माहित, मला आत बसून येत नाही तुला पानाच्या गादीवर बसून कस येत? तो म्हणाला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी चा MA आहे मी Economics मध्ये केल. माझा तो पण एक शिक्षक होता आणी खूप चांगला. MA करून क्या मिळाल त्याला काय ठाऊक? शेवटी विड्याच विकायचा.  पण ते एकॉनमिकस त्याला धंद्यात किती कामाला येतंय ते ठाऊक नाही, त्याच्या ह्या ज्ञाना  मुळे कायम मुलांच्या (आणी त्याच्या गिराहीकाच्या ) घोळक्यात असायचा. 

लहान पणी आम्ही साठ्यांच्या कयऱ्या तोडायचो म्हणजे कयऱ्या होत्या अंब्याच्याच पण त्या साठ्यांच्या  वाडीत होत्या, आम्ही त्या वाडीच्या बाजूच्या बिल्डिंग मधून तोडायचो दगड मारून, मग ते साठे आमच्या मागे धावायचे, आम्ही धूम ठोकायचो, वास्तविक कयऱ्यान मध्ये न आम्हाला रस होता ना त्यांना, सगळी मजा दगड मारून पळण्यात होती, त्यांना आमचं घर ठाऊक होत म्हणजे ते कधीही घरी येऊ शकले असते, पण त्यांनी तस केल नाही कधीच, (दत्तपाड्यात साठ्यांच्या कैऱ्या न तोडलेला माणूस तुम्हाला मिळण अशक्य. म्हणजे त्या काळी आता तिथे इमारत आहे मोठी).   पण त्यातून खूप शिकायला मिळाल मला तेव्हा  मझ्या एका मित्रा कडून, तो आत उडी मारून आणायचा  कैरी, पण साठे कधी पाठी पळतील आणि कधी नुसती हूल देतील ते त्याला कळायचं तो गुण मला अजून उपयोगी पडतो कोण नुसती हूल देतोय आणी कोण कधी अंगावर येतोय हे कळायला सोप जात. चुकतो अंदाज कधी कधी, पण बहुतेक बरोबर असतो. तो मुलगा चाळीत राहणारा त्याला सवय असेल अस करायची आणी पळायची, त्याने बरच उद्योग केले असतील पण माझा तेव्हा तो आवडता शिक्षक होता, काय पण विनोद आहे बघा :).

तसा मी एकदा वर्गात पण शिकलोय . Baan मध्ये असताना "Presentation skills" अश्या एका कोर्स साठी मला पाठवल होत, ३ दिवस residential होता कोर्स , तिथे मला अरविंद नाडकर्णी नावाच एक संथान भेटलं , त्यांनी ३ दिवस आम्हाला कस presentation द्यायचं ?हेच नुसतं शिकवल नाही तर एकूण आयुष्या कडे कस पहावं ?माणूस कसा ओळखावा ? तुम्ही जीवन कस जगावं? हे शिकवलं . म्हणजे त्यांनी फक्त PPT कशी चांगली बनवायची हेच खर तर सांगितलं , पण त्यात कस उभं राहायचं ?तुमचा प्रेक्षक कसा ओळखायचा? content काय हव? शब्दानं पेक्षा हाव भाव , आवाज , उच्चार हेच कसे जासत महत्वाचे ते सांगितलं . जगात चांगल किव्हा वाईट काहीच नसत फक्त परिणाम असतात . There is nothing good or bad, only consequences. हे मी शिकलो, लोक तुम्ही बोलताना मुद्दाम तुम्हाला त्रास देतील, पण आपण आपला focus कायम ठेवायचा, नन्हाचा पाढा गिरवायचा नाही.........  अजून सगळ वळत नाहीये, पण खूपदा त्यांची शिकवण कामाला येते . त्या ३ दिवसात मीच सगळ्यात जास्त शिकलो , PPT फक्त एक १०% होत ९०% बाकी सगळ , नाही म्हणायला मी पहिला आलो सगळ्यान  मध्ये  कारण बहुदा ते  नकळत शिकवत गेले तेच शिकत गेलो आणि PPT आपोआप येत गेली . शेवटी त्यांनी जे शिकवलं ते आयुषयात जास्त उपयोगी आहे,  लोक ओळखणं , कुणाला काय आवडत ते देण , हाव भाव, हालचाली, positive  राहणं आणि अस बरच काही , साधा, सरळ आणि सोप 

गुरगावला असताना मला Financeच बाळकडू एका सायकल वर विड्या काड्या विकणाऱ्या माणसाने दिल होत. मी जीथे Finance च  ट्रेनिंग दयायला गेलो होतो तिथे, सायकल घेऊन उभा असायचा. त्याला विचारल मी कि किती  धंदा करतोस? 100 - 200 चा माल विकतोस का? किती वेळ काम करतोस ? मला म्हणाला "साहब  रोज का 500 का मुनाफा हो इतना भेचता हूं सायकल है आप का लंच टाइम हो जायेगा उसके बाद ओह कॉल सेंटर वाले है फिर ओह शाम को ओह फॅक्टरी चुटती है  फिर रात मे  कॉल सेंटर. अगर जल्दी हो गया तो शाम मे घर नही तो रात को मॉल के बाहर". हे उलट calculation मला शिकायला कित्येक वर्ष गेली आणी हा माणूस ज्याला साधा sms पण वाचता येत न्हवता त्याला..  हे उपजात होत? का तो धंदा करता करता शिकला? हे तुम्हाला कुणीच कधीच शिकवत नाही, हे तुम्हीच स्वतः शिकता.

ही अशी अनेक माणस मला भेटली ज्यांच्या कडून मी शिकत गेलो,  काय शिकवायचं होत त्यांना आणि मी काय शिकलो. तुम्ही  पण आठवून बघा असे बरेच शिक्षक तुम्हाला आठवतील . 

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

Demonetisation

Finally, I had to do what was being procrastinated from the 8th of November. There was no need for me to do this, but my kamwali bai has no bank account (is the P.M. listening?) and the watchman needed payment for the car washing services. All my other payments get done by 7th (smart move actually to demonetise on the 8th), this two have a different due dates and hence the problem. So finally after a period of 10 days, I found myself  in a line outside my bank at 8:30, the bank opens at 9:30 I am told. One hour to check my whatsapp and catch on my phone, its too boring to see  all  messages convincing me that Modi is great  and it's OK to suffer a little. 

Hell I am sold on the move, hence the delay in withdrawing, but give me a break.Let us do some constructive help (I just said a big "good morning" and thanked the cashier and the  deputy bank manager for their efforts),   but there is a lot of stuff that we can do, like educate the maids  and drivers and  watchmen and the small time vegetable vendors and rickshawalas. Install apps  like paytm to make life easier for all. Stop forwarding messages for and against the step taken Secondly avoid withdrawing lot of money from banks to keep   at home, I have seen people withdrawing 50000 (48000 to be precise from two accounts)for keeps sake. Why would you need so much money when you have debit/credit card? The weekly expenses in cash cannot be much. Do keep some cash for others, don't be greedy. 100% people in the line were convinced that this will teach a lesson who have black money and how it is not possible to get away with hoarding money from now on. 

It may take months to get to normalcy, so don't lose patience now. After a  cancer surgery when a patient is undergoing  the chemo therapy, he loses appetite and his hair also, so do we stop it midway? No. It has to be complete, corruption is a cancer, you cannot expect it to go away by a paracetamol.  The patient needs utmost support of the family and his morale needs to be high. Medicine is given and is approved by all the experts and expectedly, we have some realtives who are more of a foe and wants the family to do a  abracadabra thing to wish away the black money, so they are safe and it helps them that the patient remains sick. I still wonder what is dereck o'Brien doing in TMC and shouting alongside Mamta ? He seemed a good host in Bournvita quiz contest.

And let us not put some body on a pedestal and make a god out of him nor kill some one by branding him a  devil (well "आप" को कुछ exception allowed है), we all are humans and all are equal (though we treat some people more equal than others)so get on with life and help fellow citizens instead of just opposing, swearing or praising and praising and praising.....India is rising let us rise together.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

वेडा

दत्तपाड्याला आमच्या शेजारच्या बिल्डिंग चा नाव होत चंद्रतेज आमची जय हरी आणी  आमच्या बाजूला कृष्णकमळ. चंद्रतेज मध्ये ग्राउंड फ्लोर ला अनेक फ्लॅट्स होते, पाठी दोन होते, पुढे एक अर्धाच असा होता थोडं विचित्र होते ते, लहान लहान दोन, एक सिंगल रूम चा होता. त्या ठिकाणी खूप लोक येऊन गेली, काही घरात बघा लोक नाही टिकत सारखी बदलतात, तसेच होते ते रूम्स, सारख्या बदलायच्या फॅमिलीस. 

एकदा तिकडे एक माणूस आला त्याची बायको आणी एक मुलगा होता वाटतं ; चांगला होता माणूस, शांत वयस्कर थोडा, पण समोर आला कि हसायचा. शाळेत असेन मी, मुलगा अगदीच लहान होता. तो माणूस सकाळी जाऊन संध्याकाळी यायचा परत. खूप एक महीन्यानी  का वर्षांनी तो घरीच दिसायचा. फॅक्टरी मध्ये स्ट्राईक वगैरे झाला अस कळलं आमहाला, मला आधी स्ट्राईक वगैरे म्हणजे माहीतच न्हवत  तेव्हाची गोष्ट आहे,(गिरणगावची वाताहत झाली ते नंतर समजल)थोडे महिने झाले तरी हा घरीच दिसायचा, त्यांच्या कडे पैसे नाहीत अस कळलं मला, त्यांच्याच बिल्डिंग मधल्या मुलानं कडून. शाळेत बघा आपण आपण मित्र जमा होतो आणी काही गप्पा मारतो म्हणजे काही पण आपण घरून ऐकून येतो आणी बडबडतो, त्यातच एकदा  मला कुणीतरी सांगितलं   अस सहज बोलता बोलता आम्ही नुसतं ह्म्म्म.... अच्छा असं केल. त्या  वयात पैसा म्हणजे काय ?त्याच महत्व काय? स्ट्राईक वगैरे गोष्टींच महत्वच कळत  न्हवत . मोठेपणी कळत आपल्याला, कष्ट म्हणजे काय? त्याच काय आणि किती महत्व असत ? असो तेव्हा नीटस कळलं नाही पैसा  नाही वगैरे म्हणजे. 

मग काही दिवसाने त्याची बायको जाईची सकाळी कामावर, कुठे जाईची कोण जाणे, कंपनीत वगैरे असेल ,ती पण संध्याकाळी घरी यायची सकाळी जाऊन. मग घरच काम हा माणूसच करायचा. संध्याकाळी बायकोची वाट बघत उभा राहायचा गेट वर, ते गेट चे दोन गज पकडून, आम्हाला मैदानात खेळताना बघत बसायचा , लांबून दिसली बायको,  कि छान हसायचा. आता आठवल कि वाटत  कि करुणहसायचा ,   खूप तोंड भर हसायचा  पण डोळ्यात काही तरी दिसायच त्याच्या, माझ्या बालमनाला उमगण्या पलीकडे होत ते. 

शांत माणूस, कधी भांडण नाही काही नाही कुणाच्या अज्ञात  ना मद्यात, मुलाचे लाड करायचा, आमच्या कडे बघून पण हसायचा , प्रेमळ हसायचा बोलायचा नाही अजीबात,मुलाशी पण अगदी हळू आवाजात बोलायचा. ती लोक कधी फिरायला जाताना पण नाही पहिली मी.   

मग काही वर्ष गेली आणी तो गायब झाला. अचानक. कुठे गेला कळलंच नाही, बायको पण ते घर सोडून गेली मुलाला घेऊन.  त्याच्या बिल्डिंगची लोक   म्हणायचे की वेड लागल त्याला, मला काहीखर नाही वाटल  ते   खूप साधा सरळ होता , पण एके दिवशी आमच्या समोरच्या ग्राउंड मध्ये तो बसला होता , दाढी वगैरे वाढली होती,फाटके कपडे, एक पोत  होत हातात .  मी कॉलेज ला जात असेन तेव्हा, पण खर  सांगतो तुम्हाला, एकदम सुन्न झाल डोकं.  सण कन अस काहीस झाल  मला. नेहमी यायचा तो माणूस, तिकडेच बसायचा मैदानात  बिल्डिंग कडे बघत त्या गेट कडे बघत, नेहमी सारखाच हसायचा नुसता, आजूबाजूच्या बिल्डिंग मधली लहान मूल पण त्याच्या कडे बघून स्माईल दयायची, हा पण हलकेच हसायचा, एक दोघ  लहान मुल जवळ पण जायची, तो नुसता त्यांना शेक हॅन्ड वगैरे करायचा, पण वेड्या सारखं काही नाही मारामारी नाही आरडा ओरडा पण नाही करायचा, लहान मुलांना बघा कधी कधी आपल्याला वाटली तरी त्याना नाही वाटत भीती , त्यांच काहीतरी वेगळच असत sixth sense का काय ते. 

मग तो माणूस पण यायचा बंद झाला.   काय होत त्या फॅमिलीच माहीत नाही मला. स्ट्राईक झाला कंपनीत म्हणून वेड लागलं का आणखी काही होत ? कळलंच नाही. माझ्या मनात मात्र राहील होत  कित्येक वर्ष पण तो माणूस अजून लक्षात आहे माझ्या. 

कुणाला कधी आणी का वेड लागेल ते सांगता येत नाही.....  










शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

बैल गाडी

बैल गाडी 

गाव कुठलं रे तुझं? लहान पणी हा प्रश्न अगदी common होता (आता चायला राज्य कोणतं असं असत)मग मी मुंबई हे उत्तर द्यायचो ..... अरे तस नाही गाव अस विचारल मी, मला काहीच कळायचं नाही लोकांना खर बोललं कि पटत नाही खोट अगदी लगेच पटत (कोर्टात खरं सिद्ध करायला २० वर्ष लागतात), मग मी गिरगाव अस सांगायचो, मग चेष्टा होईची, अरे  मुंबईच्या बाहेर काही आहे कि नाही गाव ? एक तर लोकांना काय करायचंय? नसेल ह्याला गाव हे पटायला काय हरकत आहे?

आम्ही सुट्टीत कधीच कुठे नाही गेलो, अतुल दर वर्षी त्याच्या गावाला जाईचा कोकणात (येताना खोबऱ्याची वडी वगैरे आणायचा माझ्या साठी नाही असं नाही)   आणी मग काय काय सांगायचा गावा बद्दल त्या घरा बद्दल नारळाची झाड  आंबे, मस्त वाटायचं ऐकायला. 

पण आम्हाला गावाचं नाही त्याला मी तरी काय करणार?    नंतर नंतर (आणी आत्त्ता सुद्धा)मी सांगायला लागलो, माझं गाव वारुड भुसावळ जवळ, खान्देशी आहे मी , वडील आठ वर्षांचे असताना आजोबा आणि एक बहीण वारली म्हणून आजी त्यांना आणि आत्याला घेऊन बडोद्याला गेली  (खर तर खूप ठिकाणी, पण जे लोकांना पटकन कळत ते सांगायला शिकलो, मग धींनोज, महिसाणा, आवाखाल हे सांगितलं तर गाडी भलतीकडेच जायची), वडील  सुद्धा  फक्त एकदाच गेले तिथे कूळ कायद्यात जमीन गेली तेव्हा सह्या करायला आणि ७/१२ आणायला (हे ७/१२, कूळ कायदा एकदम भारी होत, मग लोक थोडे बॅक फूट वर जातात ), बर बर म्हणतात कारण त्यातल्या निम्याहून अधिक लोकांना ७/१२ म्हणजे काय? ते माहित नसत  आणी बऱ्याच लोकांची समजूत कूळकायदा म्हणजे कुलकर्ण्यांचा काही तरी कायदा असेल अस वाटत (तरी मी कुल आहे कूळ नाही हे विसरतात). माझी लगेच बाजू सर आणी आणखी काही विचारल  तर हा सागर हा कुळून काढेल म्हणून गप्प बसतात. 

वडिलांचं असं तर आई गिरगावातली म्हणजे १००% मुंबईकर, तस तिची  आजी राहायची जोगोडीला, म्हणजे पुण्याहून जेजुरीला (हल्ली फार फार्मात आहेत राव म्हणून हा reference दिला, तर तिथेच वाटेत)   जाताना लागत, बिनाताई एकदा गेली होती (तिच्या) लहान पणी, आता जमीन गेली तिथली , म्हणजे विकली (आम्हाला मातीच मिळाली) आत्ता तिथेच कुणी नसत आणि खूप वर्ष कुणिच न्हवत. म्हणजे दोन्ही कडून गाव नाहीच. तर सांगायचा मुद्दा असा कि मी मला गाव नाही, किव्हा मुंबईच माझं गाव.    

तर गाव आम्ही नुसतं मित्रांकडून म्हणा चित्रात (आणि चित्रपटात) पाहील होत, कधी तरी पुण्याला जायचो (आत्ता काय तेव्हा सुद्धा गाव म्हंटलं असत तर मुळा मध्ये बुडवला असत आम्हाला, तेव्हा असायचं बाबा पाणी मुळा नदी मध्ये) आणी अक्का (आईची आई ) राहायची  पर्वतीच्या पायथ्याशी  म्हणजे मेन पुण्यात नाही (त्या वेळच्या) ते थोडं गाव बाहेर होत म्हणजे गावच्या बाहेर होता अक्काचं घर म्हणून सदाशिव पेठ हे गाव  अस म्हणायचं, पण पुण्याला गाव नाही म्हणायचं? कारण ते शहर आहे (किचकटच लोक सगळी) . म्हणजे सुट्टीत चुकून आम्ही गेलो कधी बाहेर तर ते पुण्याला आणि ते गाव  न्हवत. 

गावात शिकायला खूप मिळत असं माझं मत आहे कारण सगळं नैसर्गिक असत आपल्या इथे सगळंच कृत्रिम आहे एकदम रेडी मेड, नंतर नंतर मी बऱ्यापैकी फिरलो आणी ऑडिट ला तर फॅक्टऱ्या गावात असायच्या, गवत शेत, झाड प्राणी सगळीच वेगळी असतात तिथे. 

मला एक खूप मोठा धडा मिळाला होता ते एका गावात, नाव हि आठवत नाही मला आता आणी त्या शिक्षकाचे तर मी  नाव सुद्धा न्हवत विचारलं. कारण मला त्यातला अर्थ किव्हा बोध का काय ते २० एक वर्षांनी उमगला (म्हणून कृष्ण लागतो अर्जुनाला) .  

मी एका शुगर फॅक्टरीच्या ऑडिट साठी वगैरे साठी गेलो होतो तर तिथे खूप सारा ऊस घेऊन शेतकरी यायचे कारण साखर बनवायला ऊस लागतो (म्हणजे ऊसच लागतो)तो ऊस  शेतकरी लोकजवळ असेल तर  बैल गाडीतून आणायची (आता ट्रॅक्टर वर पण नेतात) आणी ती  गाडी अगदी ओतप्रत भरायची. बैल बिचारी वजनाने वाक वाक वाकायची, ओझ्याने वाकण म्हणजे काय हे मी अगदी पाहिलंय. काही काही बैल खूप उमदे, उंच गोरे रुबाबदार  असतात  (काही लोक बघा अशी रुबाबदार असतात पण अगदी बैलोबा आहे असं म्हणतो आपण?)काही मध्यम असतात, कधी कधी काटकुळे बैल पण बांधतो एखादा माणूस गाडीला आणि तोंडातून फेस येतो त्या बैलाच्या, म्हणजे तोंडातून फेस येतो म्हणजे काय हे पण मी पाहिलंय   (सगळं गाव कडे).

मी असाच एकदा त्या गावातल्या एका रस्त्या वरून चालत असताना समोरून एक बैल गाडी येत होती, दोन्ही बैल  एकदम उमदे होते उंच, पण तो बैल गाडी वाला स्वतः बैल होता, गाडी हाकताना त्याच्याच तोंडातून फेस येत होता. मी म्हंटल, अरे हे बैल इतके मस्त आहेत पण गाडी अशी काय हळू हळू आणि वाकडी तिकडी येतेय ? बाजूला एक गाय चारणारे (गाईला घेऊन फिरणारे )आजोबा होते, ते म्हणले की बैल जोडी न घेता ह्याने वेगळी बैल  लावली हायेत एकत्र  ..... complete confusion ...  अरे पोरा  दोन्ही बी बैल उत्तम असून  न्हाई चालत ती जोडी उत्तम हवी .... एक बैल दुसऱ्या पेक्षा ताकतवर असला तर तो दुसऱ्याला खेचणार  आणी मग दुसराची फरफट मग ह्यो त्याला रोखणार, झाली ना गडबड? गाडी जाईची कशी ती पुढ?अन जर दोग बी ताकतवर असली अन त्यांच  पटत नसल की बैल गाडी दोग बी इरुद्ध दिशेला खेचनार . एक घाबरत असला तर दुसरा त्याला चेपनार आणि तो मग लवकर मरनार कारण सगळा भार तोच पेलनार अन दोघे बी सारखीच हवी स्वभावानं.......... अन वळू न्हाई बांधत गाडीला, समजलं काय? 

कुनी एकाला कमी न्हाई चालत खायला दिल तर, एकाला पौष्टिक अन एकाला साधा चारा न्हाई चालत दोगांना बी तेवढच काम अन तेवढाच आराम.  मंग सोपं असतंय होय? बैल गाडी म्हंजी घेतले बैल अन बांधले कि न्हाई व्हत, प्रानी हाई मोटार न्हाई  नीट बघून गाडी बांधून आणि मंग काळजी घ्यावी लागते तव्हा कुठं नीट चालतंय     

आता ह्यो मानूस, ह्याने ह्यो  ऊस काढून झाला कि दोघांना बी येगळं न्ह्यायला हवं ही जोडी कधी बी चालायची न्हाई त्यात बैल गाडीवाला बी खपनार ... ..... 

हे लॉजिक कळायला मला य वर्ष गेली कारण  मी फक्त बैल जोडी बघत होतो , पण ही गोष्ट  सगळ्याच जोड्यांना लागू होते, टेनिस मध्ये बघा बॅडमिंटन, क्रिकेट बघा two bowlers always hunt in pairs  म्हणतात, opening batsman पण दोघे एकमेकांना किती complementary हे जास्त महत्वाचं. नुसतेच best असून नाही चालत आपला जोडीदार सगळ्यात best असण्या पेक्षा माझ्या करता best आहे का? हे बघायला हवं.  किती तरी उधाहरणं आहेत. आपले पेस आणी सानिया बघा डबल्स मध्ये खूप चमकले, पण सींगल्स नाहीत. पण ती दोघे एकत्र खेळली तेव्हा नाही चमकली. भूपती तर फक्त पेस असतानाच चमकला.  म्हणजे compatibility महत्वाची.      

लग्न झालेल्या जोड्या बघा, कधी कधी किव्हा बहुतेकदा एकच माणूस ओढतो गाडी संसाराची, ओझ्या खाली दबणं, काम करून तोंडातून फेस येणं हे सगळंच आपण बघतो (अनुभवतो) कारण  आपण दोन उत्तम माणसं जोडण्याचा प्रयत्न करतो आणी कधी विस्कटलच तर आश्चर्यचकित होतो, खूप जोडपी असच खेचतात आयुष्य कुणीच सुखी नाही आणि ते जो संसार वाहतात त्याची वाताहत होत असते आणी त्यात त्या कुटुंबाची सुद्धा. संसार आला कि हे होतच असं म्हणतो. 

पण जोड्याच जर निट लावल्या तर? ते बैल गाडी सारखच same logic  लावल तर? संसाराचा गाडा दोघांनी खेचायचा असतो नाहीतर वर  त्या आजोबांनी सांगितल्या  सारखं होत आणी  बाहेरच्या लोकांना ज्यांना  दिसतंय कि संसारत नुसती ओढाताण होतेय तर ती लोक बैल वेगळी का नाही काढत? एका बैलाची गाडी सुद्धा असतेच ना? लागली जोडी तर लागली, नाहीतर नाही, आयुष्य तरी वाढेल बैलाचं (म्हणजे बैलीच सुद्धा) ....   

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

ADHM

मी करण जोहर चित्रपटाला बंदी घाला किव्हा त्या पाकिस्तानी माणसाला घेतलय म्हणून मी अजिबात बघणार नाही हे काही करणार नाही, करण जोहरचे पिच्चर मला  अजिबात आवडत नाहीत म्हणून मी काय तो जाऊन बघणार नाही . उद्या तुम्ही गेल्यावर्षी चा वर्ल्ड कप ला झालेली भारत पाकिस्तानची मॅच बघू नका म्हणाल, आता त्या फवाद ला घेऊन नवीन पिच्चर काढू नका ह्याला माझा पाठिंबा आहे अजिबात पाकिस्तानशी खेळू नका हे पण मी सांगेन (मी कशाला गावस्कर, गांगुली , गंभीर सगळेच म्हणतात). मला काय त्या फवाद चा पुळका नाहीये आणि त्या कारण चा तर   अजिबात नाही, पण एकदम बंदी घाला बघू नका म्हणून त्याला फुकट पब्लिसिटी तर मी नाहीच देणार आणी  हल्ली लोक मूर्ख नाहीयेत उगाच ५०० रुपये देऊन फालतू गोष्ट पाहायला  जाणार नाहीत.  फार बाऊ नका करू जो तो त्याच्या कर्माने मारतो आणी त्या पिक्चर मुळे करण जोहर च अजिबात नुकसान होणार नाही, त्याला मिळाले रिटर्न्स.  झालंच तर त्या कामगारांचं होईल जी लोक पोस्टर्स लावतात वरची काम करतात स्पॉट बॉईझ ना पगार थोपवेल तो जोहर.   सिनेमा हॉल्स वाल्यांचे हाल, तो फवाद पैशे घेऊन गेला सुद्धा आपण का उगाच भांडायचं? गप्प बसा आणी फराळ करा दिवाळी चा 

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

काळी पॅन्ट

काळी पॅन्ट 

माझ्या कडे फार कपडे न्हवते कॉलेज मध्ये, अजून बाकींच्याच्या मानाने कमीच आहेत . एक जीन  ची होती बस्स.  मग आर्टिकल शिप करताना एक दोन घेतल्या होत्या, व्ह्याच काय कि मी जो हाताला लागेल तो शर्ट आणी त्याच दोन पॅन्ट घालायचो खूप दा रंग संगती जरा विसंगत व्ह्याची . त्या काळी नवीन कपडे फक्त दिवाळीतच घायचो आणि मला तसा पगार पण न्हवता नव नवे कपडे घ्यायला सारखे सारखे, तर त्या वर्षी मी एक काळी पॅन्ट पहिल्यांदा विकत घेतली, म्हणजे तीच दिसली मला आणि मी फार चिकित्सक नाहीये पण मला जामआवडली, मला तरी   म्हणले लोक अरे काळी पॅन्ट काय घेतोस? वेगळा रंग वगैरे घे उठून दिसेल... मी   थोडा हट्टी आहेच  आणि मला फार लोकांच्या बोलण्याने फरक नाही  पडत मी तीच घेतली . 

छान होती कॉटन ची आणि मग मला लक्षात आलं कि ती पॅन्ट कशावर ही चालते, म्हणजे त्या    पॅन्ट  वर काहीही उठून दिसत (माझंच मी काय कौतुक करायचं म्हणा ) अगदी निळ्या शर्ट पासून ते पांढऱ्या ते ग्रे  झालंच तर tshirt  वर (का खाली ?) पण चालायची. मी  एकदम खुश, खूप जास्तच खूष,   छोट्या गोष्टी किती आनंद देतात हे सांगणं कठीण आहे, पण मग मी तीच पॅन्ट   सारखीच  घालायचो एक तर ती फार मळ्याची नाही म्हणजे कुणाला कळायचं नाही , ही casual म्हणून चालायची   formal म्हणून तर अगदीच सरस. 

मला मग जाणवलं कि ह्या आधी माझं कपाट कस अपूर्ण  होत आणी मी तयार व्ह्यचो तरी कसा? आयत्या वेळेची पॅन्ट ही होती आणी  छान तयार होऊन जायला  पण हीच, म्हणजे मी  अर्धवट होतो का मला माझी गरज माहित न्हवती. जाम जीव होता आणि आहे माझा काळया  पॅण्ट   वर माझ्या, अचानक मला मिळालेल्या पॅन्ट वर संपूर्ण पणे  अवलंबून   झालो  होतो, एक तरी काळी  पॅन्ट  सगळ्यांकडे कडे हवीच.  

तू माझी काळी पॅन्ट आहेस :) 


सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

जय भवानी जय शिवाजी!!!

पर्वा नवी मुंबई काल कोल्हापूर आज ठाणे अरे अरे अरे ...स्वतःच्या हातावरच्या तागदि   वरचा विश्वास संपला ..... आता पसरा ... शोक कश्याचा  करायचा? तलवार म्यान केली ह्याचा ? का लढल्या वाचून फुकट मिळतं हा साकशातकार झाला  ह्याचा ?

जय भवानी जय शिवाजी!!! माफ करा महाराज तुम्ही आमच्या करता व्यर्थ लढलात , त्या पेक्षा दिलेले किल्ले साम्भाळायचेत .....
का दिलीत आम्हाला आस,
कि  आमच्या मनगटात आहे ताकद ह्याचा विश्वास,
पसरले असतेत हात, बसल्या बसल्या मिळाला असता ना थाट?

अजून तरी आणि ह्या पुढे मला कुणीहि  आरक्षित म्हणणार नाही  :)  हर हर महादेव !!!!

फडणवीस  देऊन टाका.

मागणाऱ्या पेक्षा देणारा मोठा असतो... मी  कधीच मागणार नाही, शिवाजी माझा आदर्श आहे, आडनाव भोसले नसले तरीही ....  


रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

सात्विक

सात्विक
जोशी काकू खूप सात्विक आहेत आणि त्यांच्या खूप ठाम कलपना आहेत. अमुक म्हणजेच सात्विक तमुक म्हणजे वाह्यात वगैरे. कुणी जरा तोकडे कपडे घातलेत की त्या एखाद्याला साफ नालायक आहे असं ठरवून टाकतात, कुणी मुलगी जरा मुलांशी बोलताना दिसली की लगेच कशे संस्कार नाहीत वगैरे, चार लोकात मुलांनी कस वागावं ? ह्या बद्द्दल एकदम clear आहेत. मुलांनी मुलींशी  बोलूच नये असं मताच्या , देव धर्म करावा वगैरे वगैरे , पण पर्वा त्यांनी त्यांच्या मुलीचे डोहाळे जेवण अगदी थाटात केले  , हा मोठा विनोद, अगदी त्या मुलीला सजवून झोपाळ्यावर बसवून छान  फोटो वगैरे, त्यांना विचारू का जाऊन? काय हो काकू कशी झाली ही गरोदर?  

उगाच डोक्याला त्रास

माझा मित्र संदीप मला जाम आवडतो (मला माझे सगळेच मित्र फार आवडतात ) एकदम प्रामाणिक आणि बेसिक ला धरून असतो , खूप लोकांना तो जंगली वाटतो raw वाटतो पण म्हणून तो मला आवडतो. मला त्या दिवशी म्हणाला "पुनर जन्म असतो रे,मला  आलाय अनुभाव " चायला माझे  आणि ह्याचे विचार कधी कधी   जुळतात, पण हे म्हणजे फारच होत ,   का रे का वाटत तुला अस? "अरे ते जन्मो जन्मो का नातं असं  म्हणतात   न?  मला आला रे अनुभव? गेल्या तीन जन्मातल्या माझ्या बायका, म्हणजे wife  मला भेटल्या?" भेटल्या ?  मेल्या तुझं लग्न झालच नाहीये म्हणजे तू केलस नाहीस ह्या बायका कोण? "अरे गेल्या तीन जन्मी च्या, दोन  वर्षात तीन भेटल्या, एकदम काय तरी झालं"  कुणाला? "दोघांना" आणि असं तीन दा झालं? "हो, सात जन्म असतात ना" अरे हो पण मग? "मग काय नाही, आम्ही भेटलो"  नवरा बाईको सारखे? "हो रे, मागल्या जन्मात गेल्या सारखं वाटलं रे " "  सात जन्म तरी असतात न रे, अजून चार तरी भेटतील ?"

कधी कधी मला ह्याचा राग येतो आणू मत्सर सुद्धा वाटतो, तो त्याच्या भावना कधीच लपवत नाही, एक झेपेनाशी होते आणि हा पठ्ठा अजून चार बायका  शोधतोय आणि हे सार  त्याच्या मैत्रिणी सांभाळून .

सुनामीच्या वेळी त्याचा फोन, "मी महिना भर नाहीये, जरा घराकडे बघ" कुठे निघालास? "नक्की नाही, मद्रास ला जाईन तिथून ठरवेन, खूप वाताहत झाली आहे रे, मी सडाफटिंग, माझी मदत होईल का ते विचारतो, मला चिखलाची  घाण वाटत नाही कि प्रेतांची भीती, मी काहीही खातो, त्या मुळे  बघू काही जमेल ते करू "     हे टोक.

काय करायचं ह्याच? गेल्या जन्मीची बायको सापडली म्हणून  संबंध ठेवतो सुनामीत वाताहत झाली  म्ह्णून सगळं सोडून तिथे जातो लोकांन साठी . ह्याला खूप लोक असभ्य, चालू म्हणतात , पण हा स्वतःहून कुणाच्या अंगचाटी जात नाही लंपट पण नाही, एकच लक्ष्य , साधा सरळ आयुष्य, भूक लागली कि भागवतो, मग ती कोणतीही   असेल .

जोशी  काकूंना हा संदीप फार रुचत नाही, मला जोशी काकू , मी त्यांना आवडतो आणि मला संदीप , सगळाच लोचा .












  

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेखाला उत्तर

बरेच दिवस झाले एक ब्लॉग सारखा मला येत होता , शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेख . मला अभिनेता म्हणून नितांत आदर  आहे, टिव्ही असो नाटक असो गुणी कलाकार, पण तो लेख मला झेपला नाही. नशिबाने  माझ्या बहिणीशी बोलताना लक्षात आलं कि तिला हि माझ्या सारखच वाटलं, म्हणजे काही लोकांना खटकलं असेलच ना? म्हणून माझं हे मत मांडतो आहे. 

म्हणजे मला थूनकू नको सांगतोस? अंघोळ कर म्हणतोस? अंगण साफ ठेव सांगतोस ? नाही करत जा आधी माझ्या बाजूवाल्याला सांग तो पण अंघोळ नाही करत दाढी पण नाही करत कचरा पण नाही काढत. आहे हिम्मत त्याला सांगायची ? मग ? चूप बस मी घाण करणार आवाज करणार ..... हे एकदम असं . म्हणजे नक्की म्हणणं काय आहे पोंक्षे ह्यांचं? आपण आवाज करत राहायचं? झाड कपात राहायची? पाणी दूषित करत राहायचं? पर्यावरणाची वाट लावत राहायची? कुणी बकरा कापतो म्ह्णून आपण झाड कापायचं? तलावात plaster of paris चा गाळ करायचा? तो वेडा म्हणून आपण सात वेडे होऊन दाखवायचं? त्यानं काय होईल? तुम्ही शहाणे आहात ना? मग वेड होईच हट्ट का? आणि कश्यासाठी?

बकरा मारणं आणि हरण (का काळवीट?) मारणं ह्यात  फरक नाही? बकरे खाण्यासाठी पाळतात तो अजून तरी extinct घोषित केला नाहीये आणि बोकड आपण पण मारतोच कि (अगदि सर्रास) आणी खातो सुद्धा आणी  हे म्हणजे जैन लोकान सारखय ह्या दिवसात कुणी अमुक खाऊ नका तमुक खाऊ नका, उद्या कांदा वर्ज करतील, चक्कर येऊन पडला माणूस तर त्याला काय भेंडी लावायची नाकाला?  हा सगळाच अतिरेक. त्यांने केला न?मग  मी पण करणार  हा हट्ट मला विचित्र वाटतो. 

तेव्हा पण बकरा कापायचे आता पण तोच कापतात आणि तुमच्या घरी आणून तरी कापत नाहीत ना  अजून तरी? आता पोंक्षे वाचन वगैरे करत असतील, म्हणजे करतात असं वाटत .  टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव साजरा करायचा ठरवल त्या काळी आणि हल्ली  जो घाट घालतात त्यात फरक त्यांना जाणवत नाही का? शाडू ची मूर्ती वापरा  गोंगाट करू नका हे सांगणं गैर ते कस? मिरवणुकीत दारू पिऊन झीनघाट घालणं हे सांस्कृतिक कस?  सैराट होऊन धिंगाणा घालणं धार्मिक कस? त्याचा धर्म वाईट म्हणून माझा चांगला, हे logic मला पचायला जड आहे (एक वेळ बकरा पचेल).

हल्ली माझा धर्म कसा पहिला येईल ह्या स्पर्धेत का असतो आपण? त्या पेक्षा olympic मध्ये पाहिलं यायला झटा न. आपल्याला ठाऊक आहे न कि आपला धर्म स्तुतनीय वंदनीय आदरणीय आणि पालनीय आहे , अरे पण ठीक आहे.  लोकांना का टाहो फोडून सांगायचं कि तुम्ही अस करता? बघा मी कस  करतो ते, म्हणून माझा  धर्म  जास्त मोठा आणि चांगला मला नका शहाणं पण शिकवू .

आमच्या कॉलेजात एकदा एका मुलाला काही तरी चोरी करताना पकडलं, त्याला मग दम  देऊन सोडल, त्याच्या मित्रान पैकी कुणीतरी सांगायला गेलं त्याच्या आईला कि काकू अस  झालं म्हणुन, तर त्या बाई ह्या मुलांनाच ओरडायला लागल्या, तुम्ही कस बंक करता पिक्चर बघता आणी तो तुमचा मित्र सिगारेट ओढतो!  वाह सांगू का तुमच्या घरी, चालते व्हा .आत्ता 20 वर्ष नंतर  तो मुलगा काय करतोय हे सांगायला नकोय. पोंक्ष्याचा असं काही तरी होतंय असं वाटतंय मला.  म्हणजे मला नका सांगू मी काय करायचं ते तुम्ही बकरा कापायचं थांबवा (अरे तुम्ही नको खाऊ  आम्ही खातोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?) . फार तर पहाटे बांग  नका मारू हे ठीक आहे .  आपल्याला त्रास होत असेल तर बोला 

थोड  हास्यास्पद वाटतंय ते म्हणजे वाघ आणी  बकरा ह्यांची  तुलना केली आहे, त्यांनी चक्क  असं लिहिलंय कि वाघ मारू नका अस म्हणताय ना? मग बकरा मारू नका अस म्हणा. हे थोडं अति आहे. 

मी पोंक्षे  ह्यांच्याशी अजिबात सहमत नाहीये, हिंदू धर्मा बद्दल लिहिण्याची ही वेळ नाही आणि दाभोळकर ह्यांच्या संस्थे विषयी सुद्धा नाही, मी नक्की लिहीन, पण तो खूप विशयनंतर होईल सध्या मला फक्त एवढच म्हणायचं आहे कि धर्म  ह्या नावाखाली जो बाजार आपण हिंदूंनी  मांडलाय तो आपणच थांबवू शकतो 40 फूट मूर्ती आणली म्हणजे काय तो माझ्या पेक्षा  उंच कोटींचा हिंदू होत नाही, खूप गोंगाट करून आणि 100 स्पीकर्स लावून मिरवणूक काढली म्हणजे माझा धर्म  जास्त मोठा होत नाही, दही हंडीच्या उंचीवरून  माझी श्रद्धा खुजी होत नाही. धर्माचं  पाश्चती करण जे चालवलं आहे ते थांबवा, कोणत्या ग्रंथा मध्ये असं गणपतीच्या मूर्ती ची उंची म्हणा कि  आवाज म्हणा  असे तपशील असतील तर मला कृपा करून  दाखवा मी सुद्धा पुढच्या वर्षी एक मोठा स्पीकर चा खर्च स्पॉन्सर करेन ....

तो वर कृपा करून शांतता राखा               

सागर कुलकर्णी 






मंगळवार, ७ जून, २०१६

माननीय मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, विषय : वाढते अपघात



प्रती,                                                                                                                      07-जून-2016

माननीय मुख्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य,

            विषय : वाढते अपघात  

माननीय श्री देवेंद्र फडणवीस स न वी वी ,

पत्र लिहिण्यास कारण  हल्ली होत असलेले अपघात (सध्या वाहनान विषयी). ह्याच आठवड्यात मुंबई - पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामुळे परत एकदा खूप मोठ्या संखेत जीवित हानी झाली आणी त्यात ताहने जीव गेले ह्याच अतिशय दुखः झाल. पण ह्याचा कारण माझ्या मते अती वेग किव्हा दारू किव्हा निष्काळजी पणा नसून बेशिस्ती हे आहे.

मी गेली 25 वर्ष गाडी आणी स्कूटर  चालवतो आहे आणी अलीकडे मुंबईत होणारी बेशिस्त बघून प्रचंड राग येतो. आधी मुंबईच नाव शिस्तीशी जोडलं जाइच, लोक  सिग्नल ला थांबायची वेडी वाकडी गाडी चालवायचे नाहीत. पण हल्ली लोक सर्रास  सिग्नल मोडतात, उलटे रस्त्या वर येतात, बिनदिक्कत मधेच गाडी उभी करतात. पार्किंग तर विचारू नका. मी ठाकूर संकुलात राहतो आणी 90 फीट  रस्त्यावर वेड्या वाकड्या  गाड्या उभ्या असतात त्यांना हात न लावता कोपर्यात उभी असलेली दुचाकी उचलली जाते.

माझ्या  मते लोकांना मुंबईत शिस्त लावली  तर लोक आपोआप  महामार्गावर गाडी नीट  चालवतील आणि अपघात  टाळता  येतील. तुम्ही महामार्गावर काय ते नियम लावाच पण त्या हि पेक्षा लोकांना मुंबईतच शिस्त लावा म्हणजे, आपण घरीच नीट  वळण लावल कि मुल बाहेर गेल तरी नीटच वागणार नुस्त पाहुणे आले कि  डोळे वटारून काय उपयोग? लोकांना सीट बेल्ट आणी   हेल्मेट ची सक्ती करू शकल न शासन? मग हे  पण  जमेल आणि ह्यात तर इतर लोकांचे जीव वाचतील. 

ह्या करता एक जालीम  उपाय म्हणजे मोठा  दंड, सिग्नल  मोडला कि किमान 5000/-  त्यातले 1800/-  रुपये  एक पोलीसान साठीच्या फंडात  टाका, त्यांच्या "welfare" साठी  वापरा  200/ रुपये त्या पोलिसाला द्या म्हणजे लाच द्यायचा प्रश्न येणार नाही (त्यांना ही फायदा/प्रोत्साहन) सरकार ला 3000/- .   हळू हळू लोकांनाआपो आप सवय होईल आणि  मग शिस्त लागेल.

कृपा करून लवकरात लवकर काहीतरी करा ही नम्र विनंती. एक नागरिक  म्हणून मी काही  मदत करू शकलो तर मला जरूर कळवा .

आपला कृपाभिलाषी ,

सागर कुलकर्णी
मुंबई  

गुरुवार, १९ मे, २०१६

झी चे कार्यक्रम....

एरवी कस होयचं न कि एखादीच मालिका बरी असायची, आता इतकी पातळी घसरली आहे न  कि पुसता सोय  नाही. तरीही सगळ्या मालिका  जोरात चालल्या आहेत.  म्हणजे उद्या सूर्य पश्चिमे कडूनउगवताना दाखवतील आणी  लोक चवीने ते पाहतील.

मी फक्त झी पाहतो (तेच लावतात घरी, काय करू?), म्हणून फक्त त्याच वहिनीच्या कार्यक्रमान बद्दल , एक म्हणजे ह्या सगळ्या शो च्या आधी एक disclaimer हवा, की हा कार्यक्रम निर्बुद्ध लोकांनी निर्बुद्ध लोकां  करता खूप पैशे मिळतात म्हणून केला आहे, तर त्या नुसार काय तो बोध घ्यावा.

जय मल्हार 
जय मल्हार नावाचा पहिला कार्यक्रम असतो  सातला,  आता आपण पण त्या  ISIS सारख असल्या  मुळे देवा बद्द्दल मी काय बोलणार? पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून ....एक म्हणजे ही काल्पनिक गोष्ट आहे त्यामुळे उगीच संदर्भ शोधत बसू नका आणि मी फक्त आणि फक्त मालिके बद्दल बोलत आहे, मला शंकरा बद्दल काही एक बोलायचं नाहीये मला सगळे देव आवडतात, ह्याची कृपा करून नोंद घायवी.

आता रामानंद सागर नी रामायणात फॉल  बिडिंग वाली साडी, मशीन ने शिवलेला ब्लाउज , तसेच दागीने  , टिकली वगेरे गोष्टी दाखव्ल्या होत्या त्या मुळे , ह्या गोष्टीन कडे  मी पाहत नाही  आणी  मुळात हा इतिहास  नाहीये त्या मुळे ते काहीही दाखू शकतात. आता लीला च्या मुलाने लीलया लोकांच्या गळ्यात मजनू म्हणून बाजीराव उतरवलाय (दुखः त्याला अवार्ड दिल  ह्याचय ) तर ह्या लोकांनी उद्या काहीही दाखवल तरी मला गैर वाटणार नाही.  सेट वगेरे बरे आहेत, बजेट च्या मानाने उत्तम. फक्त  कधी कधी जे हिमालय किव्हा जेजुरी  गड  दाखवण्याचा फाजील प्रयत्न केलाय तो त्रास दायक आहे हल्ली technically इतक advanced आहे कि हिमालय किव्हा मान सरोवर नीट दाखवण काही जड नाही. अभिनय म्हणाल तर नारद चांगला उभा केलाय , आवाज चांगलाय आणि सुरात गातो  माणूस, लक्ष्मी विष्णू छान  दिसतात , शांत चेहरा हवा तसा आणि तेव्हढाच  अभिनय, बानू न जरा बाळसं धरलय, (वाड्यात आल्या पासून कामाला बाइका  असतील बहुतेक ), म्हाळसा चा पर्सनल काही वाद असेल, ती तो  अभिनयात आणते, सारखच  कावते त्या  मोठ्या  देहावर आणि तो देह केवढा आहे , मल्हार म्हणजे शंकराच रूप (अस दाखवले आहे)  म्हणून तो प्रचंड माणूस घेतलाय, अरे पण मग जर इनर वेर  घालावेत  एवढ शरीर दाखवत हिंडू  नये सारख सारख, बर  दिसता  का ते? मी एक सहा महिन्यात एकदा बघतो, तेच हाव भाव करत तो मल्हारी मार्तानाडाचा आवेश आणून काही बाही करत असतो  (कधी कधी K.N.Singh सारखे चेहरे करतो ), म्हणजे फार कष्ट घेत नसावा अभिनय सुधारण्या  साठी, जेवढे कष्ट शरीर बनवण्यात घालवतोय  त्याच्या   अर्धा वेळ तरी त्याने अभिनय शिकायला द्यायला हरकत नाहीये, पण सांगायचं तात्पर्य म्हणजे गोष्ट इंचदेखील पुढे सरकली नाहीये  गेल्या सहा वर्षात (चार तरी असतीलच). तर सगळ्यांना माहित असलेली स्टोरी आहे, मस्त देव राक्षस मारा मारी  वगेरे  एक दोन चार महिन्याने डोकावून  बघायला ठीके.



नांदा सौख्य भरे:

कायद्याने जर बंदी आणता  आली असती तर मी कोर्टात गेलो असतो , म्हणजे संपदा जोगळेकर मला बरी सुद्न्य वाटली होती, साफच गेलीय, इतका टुकार लेखन, म्हणजे तमाम प्रेक्षक हे  मंद आहेत किव्हा ठार मूर्ख आहेत (असतील म्हणा)    अस गृहीत धरून लिहायला घेतलेली मालिका, बांदेकर च ठीके त्यांना पैशे कमवायचे आहेत (तरी भौजींना सामाजिक जवाबदारी हवी ) चार दिवस सासूचे  नावाची होती अशी  अघोरी मालिका संपता संपे ना शेवटी ई च्यानेल बंद पडलं  पण मालिका  नाही पडली बंद आता झी पडेल बंद पण ही मालिका काही बंद होणे नाही. आहो म्हणजे काहीतरी पटेल अस दाखवा उद्या अम्पायारला स्टंप च्या मागे दाखवाल आणि विकेट कीपर ला पुढे  आणि मग अपील करणार अम्पायर आणी निर्णय घेणार विकेट कीपर, पटल? हरकत काय आहे? अरे उगीच कारण नसताना दुष्ट पणा  करायचा आणि तोंडावर पाटी  लाऊन ठेवायची आणी ही पाटी मुलगा आणि सून सोडून सगळ्यांना दिसते आणि ते पण हवी तेव्हा. काम सासू करत नाही पैशे कमवत नाही आणि शेखचिली पणा मुलाला देशोधडीला लावायचं आणि काम करणाऱ्या, पैसे अणाऱ्या  सुनेला त्रास देऊन हाकलून लावायचं  का? तर तिला सत्ता आणि पैशे हवेत. अगदी नशिबाने ह्यांनाच वाईट लोक भेटतात ती हुशार असतात चांगली लोक मंद असतात.  लोक पण रोज चवीने तेच कस  पाहू शकतात? टिपरे होती प्रभावलकारांचीछान होती डोक्याला त्रास नाही, कधी तरी कंटाळा यायचा पण उगाच क्रूर पणा नाही, एखाद दिवस मी जाउन सैराट पाहीन रोज मुडदे पाडताना कशाला पाहीन? पण लोक बघतात, चवीने बघतात. अगदी भारी नको पण फील गुड नको का?    माणूस TV का पाहतो विरंगुळा म्हणून न? अरे पण मग हे अस? आता काही बायका भाजी निवडताना बघतात काही बाईका डोक्याच भज करून घ्यायला मालिका बघतात, म्हणजे सगळ फक्त पैशे कमवायलाच करतात न चानेल वाले ? मग डान्स बार का बंद ती लोक आम्ही पैशे कमवायला हे करतो, creativity दाखवायला वगेरे करतो अशी सोंग तरी आणत नाही.    म्हणजे एकीकडे मराठी सिनेमा इतका  पुढे गेलाय आणि मालिकांची अधोगती का? आणि झी वर? त्यांचेच आहेत न हल्लीचे सगळे चित्रपट ? निखिल साने ना   आणा इथे, हुशार आहे माणूस . 

म्हणजे न लोक काहीही बघतात  TV वर,  कारण फुकट असत ते आणी स्टार कडे बघता फार काही competetion नाही सध्या तरी, पण काही सांगू शकत नाही जर स्टार  चे दिवस उजळले तर त्रास होईल झी ला. थोडी जवाबदारी दाखवायला हरकत नाही.
पण स्टोरी नाही काही खास एक कजाक  सासू जी तोंडावरून हडळ दिसते आणि विचित्र चेहरे करते पण तरी काही मूर्ख लोकांना (मुलगा, सून ) ती देव वाटत्ते, मग ती कारस्थान करते आणि झिन्क्ते आणि सगळे दुखी होतात आणि त्या  चांगल्या मुलीला त्रास देतात सगळ वाईट होत मग खूप वाईट होत आणि ती खूप वाईट वागते आणि खूप वाईट हस्ते (आपण डोक्याला हात मारतो).  जेव्हा नवीन मालिका यायची असेल तेव्हा दोन एपिसोड सगळ नीटहोताना दाखवतील , तो पर्यंत दुष्काळात तेरावा  महिना ......



पसंत आहे मुलगी 

मला ती मुलगी खूप आवडते , गोड आहे आणि एकदम confident, मुंबईची नाहीये, भाषा छान  आहे आणि smart आहे, खूप देखणी वगेरे काही नाही पण पटकन आवडण्या सारखी आहे. हिरो पण चांगलाय, मला सुनील बर्वे टाईप वाटतो, शुद्ध बोलतो म्हणजे मठ वाले शोभतो . तर हा मुलगा एका कर्मठ घरचा,  प्रेमात पडतो आणि घरच्या परवानगी शिवाय  लग्न करतो आणि त्याच  लग्न ठरल असताना.
 सगळ्यांच्या reactions perfect दाखवल्या आहेत, त्यात नंदिनी सध्या वाईट दाखवली आहे पण एकदम freud ला आवडेल अस, तिची आई लहान पाणी गेलीये वडील वारले आहेत लग्न मोडलेल म्हणून ती तिच स्थान किव्हा security करता सगळा डाव टाकतेय उद्यानीट झाल तर चांगली पण वागेल (अस काही दाखवणार नाहीत ते ), situational आहे, ती खविस आत्या एकदमसही उभी केली आहे उज्वला  जोग ने , तिला फक्त त्या  मुली पासून सुटका , म्हणजे जवाबदारी पासून, मोठी सून, तिला काहीच स्थान नाही , थोडी लोभी,  अशी वाईट नाही, पण एकदम narrow  minded,  लांबचा विचारच नाही, दागिन्यांची हौस ऐपत नाही नवरा विरक्त,  त्यामुळे अमिषाला बळी पडणारी, दादा एकदम कर्मठ, परंपरा,  देव हे नुस्त आंधळ्या पणे  पाळत जायचं, विचार नाही. माई प्रेमळ, नवरा हेच सर्वस्व पण नवीन विचार पण पटणारी, रूढी आहेत त्या बदलता येत नाही हे जाणवणारी.  त्या उर्मी चा बाप एकदम तत्व वादि, छान  मोकळ वातावरण असणार घर आणि जिथे मोकळ्या पणाने  विचार मांडता येतात अस वातावरण म्हणेज बाबा ला ए  बाबा म्हणणारी, सुस्वभावी ,   तिथून एकदम कर्मठ घरातलं वातावरण, concept चांगलाय आता त्याला रंगवणार का चिखल करणार हे बघायचं .

ह्यात ती देव देव करणारी मुलगी सरास खोटी शपथ घेते आणि देव न मानणारी मुलगी खर बोलते, तिला लपायला लपवायला देवाचा आधार नाही लागत.... ह्या लोकांनी balance अजून तरी ठेवलाय पण जर लोकांना मठः समजून जर पुढे नेणार असले तर संपलच ....          

थोडं थोड पाहायला हरकत नाहीये, पण रोज अर्धा तास नको वाटेल  
       



सौभ्ग्यावती 


एक म्हणजे वैभव मांग्लेचा उत्तम अभिनय , बस संपल बाकी सगळ भंपक . ठीके अजून थोड, अभिनय सगळ्यानीच उत्तम केलाय,  पक्याची कॉमेडी किव्हा वैभव ची बाइको सासरे आई वडील सासू मित्र सगळेच सही आहेत. पण मुळात स्टोरीत दमच  नाही म्हणजे फार तर दोन अंकी नाटक  किव्हा सिनेमा पण मालिका?दोन वर्ष (कमीत कमी ) चालणारी?  जरा  जड जाइल, म्हणजे आपल्याला त्यांना काही नाही जड. म्हणजे एक माणूस स्त्री वेशात जातो हे  ठीके, पण हिरोईन म्हणून काम करतो? अरे दिसतो रे तो पुरुष  अस  नका करू, वाटल्यास पटकन नाही समजणार पण रोज दिवस रात्र एकत्र काम करताना स्पर्श करताना एका पुरुषाला ...पुरुष  आणि बाई ह्यातला फरक नको कळायला? हे म्हणेज अगदीच लोकांना येड समजल्या सारख, म्हणजे artist lok तंद्रीअसतील पण एवढे मंद? रमेश भाटकर ला लंपट दाखवलाय (फार अभिनय कौशल्य नसेल लागल तसाच आहे चेहरा ) त्याला नको कळायला? एका झटक्यात समजेल आणि एक दोन दिवस ठीके पण महिनोन महिने? आणि प्रेक्षक? ते पण येडे काय?  अगदी नका रे अस करू? ते बालगंधर्व बिचारे बेचैन असतील स्वर्गात.

पण कधी पण पहा आणि कुठून पण पहा स्टोरी पुढे  सरकत नाही प्रेक्षक वर्ग  हा मूर्ख आहे हे गृहीत धरूनच सगळ्या मालिका केलेल्या आहेत

काहे दिया परदेस 


म्हणजे आता पर प्रांतीय मराठी मालिकेत  घुसायला लागले आहेत  आणी ते सुद्धा direct हिरो म्हणून, काही खर नाहीये . तो नट चांगलाय, नटीला अजून जमायचं आहे, पण मोहन जोशी ने बापच बाप केलंय म्हणजे अगदी चपखल बसलाय त्या भूमिकेत, बाकीचे कलाकार सुद्धा उत्तम आहेत. एक परदेसी परदेसी मुलगा शेजारी  येतो आणि मग ते सगळ normal love story सारख, ती सून उगीच चेटकीण आणि भांडखोर लोभी दाखवली आहे, म्हणजे असतील  अश्या बाईका, पण नीट सालस दाखवायला काही हरकत नाही . एक अतिशय भामटा मुलगा दाखवायला आहे तो पण मराठी आणि तो पण कपाळावर चोर  आहे अशी पाटी  फिरलाय  फसतात. आता नेहमी सारख ती मुलगी आणि तो मुलगा भांडतील आणि प्रेमात वगेरे पडतील  मग ती  पण जाइल बनारस ला बघू घडतंय ......

रोज बघायची गरज नाही आठवड्यातून एकदा दहा मिंट चालेल त्यात मोहन जोशी असण गरजेच आहे.    


चला हवा येऊ द्या 

सध्या चालू असलेल्या मालिकेन मधली सगळ्यात बेष्ट, कधी कधी पकवतात, पण इतके गुणी आहेत सगळे कलाकार कि सगळच तारून नेतात. म्हणजे साबळे उत्तमच लिहितो पण कधी कधी लूस असेल स्क्रिप्ट तरी  सुधा कलाकार तरतात एके काळी पेपर वर अझर  सगळ्यात उत्तम कर्णधार होता (एकटाच असेल जो थर्ड म्यान ला फिल्डिंग  करायचा), त्याचा कारण म्हणजे सचिन, सौरभ, द्रविड, लक्ष्मण , श्रीनाथ कुंबळे सगळेच त्याच्या कडे , प्रयत्न  करावे लागले हरायला, इथे साबळे ला हरायचा काहीच कारण नाही त्या मुळे तो छानच लिहितो आणि हे छानच करतात, कधीतरी लोकांना  थोडा बोलू द्यायला हरकत नाहीये, कारण हीच लोक धिंगाणा घालतात, जरा ही बाब पहिली तर सोने पे सुहागा.

सगळेच अशेच असतील कार्यक्रम तर प्रेक्षक पण खुश होईल हो . कधी पण पहा रोज पण पहा नुसता फार्स  आहे नो टेनशन  

अस्मिता        

तीन वर्ष झाली म्हणे,  मी तीनदा पण नसेल पहिला, त्या मुळे  लिहिण गैर ठरेल.

 रात्रीस खेळ चाले    

मुलगी लहान असल्या मुळे अशे कार्यक्रमान बंदी आहेआमच्याकडे कडे (सुटलो, नाहीतर माझी जाम फाटते)


बुधवार, १८ मे, २०१६

www.rapidels.com

नात्यातला गोडवा वाढवेल rapidel  ….

सकाळी वडलांच्या वाढदिवसाला त्यांना फोन केला, त्यांना म्हंटल Greeting Card पाठवल आहे मिळाल का? नाही म्हणाले आणी आता कार्ड पेक्षा मला आज हव होत काही तरी गोड. पुरण पोळी केली पटकन पण  पाठवणार कशी?  मी राहते ठाण्याला आणी  वडील बोरीवली ते कार्ड सुद्धा एका दिवसानंतर सुद्धा  नाही पोचत, Rapidel ला विचारल, कराल का पुरण पोळी पोस्त? काय कमाल जेवायला वडलांच्या ताटात मी केलेली पोळी पोहोचली ……… नुसत्या पोळ्या नाहीत त्यांनी माझ्या भावना सुद्धा पोहोचवल्या. 

नुस्त कार्ड नाही तर बरच काही …. Rapidel  फक्त चार तासात pick up  and delivery   

शतशः धन्यवाद
http://www.rapidels.com/

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

मला पडलेले दोन चार प्रश्न

JNU

मला पडलेले  दोन चार प्रश्न:

  • त्या कन्हैया लालच वय 28 आहे, मग तो कॉलेजात अजून का शिकतोय? त्याची आई एकटी कमवणारी आणी वडील आजारी असतात म्हणे, आई वडलान पेक्षा अफझल गुरु ह्याला जवळचा का वाटतो?
  • आता मेलेल्या माणसान बद्दल  बोलू नये पण तो रोहित पण PHD करायला कॉलेजात का राहत होता ? तो सुधा गरीब घरचा होता आणि पंचविशी च्या पुढला होता,
  • आपण ह्यांच शिक्षण का पोसायच? (JNU ला grant आहे) 
  • भारत कि बरबादी काश्मीर कि आझादी अस  म्हंटल तरी त्यांना हटकायच  नाही का? पण मग त्या Herald प्रकरणी legal notice दिली ते राष्ट्रा विरुद्ध कस ? (निरुपम भैय्या ने  मोर्चा काढला होता, गांधीन ना  notice पाठवली म्हणून )
  • हल्लीची पिढी इतकी देशद्रोही आहे का? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का? मग उद्या कुणी रस्त्यात  मुलीला थांबून तुझे कपडे काढायची इच्छा आहे अस म्हंटल तरी  लहान म्हणून सोडून द्यायचं का?  त्याला जर पोलिसांनी डांबल तर पोलिस चुकीचे का?

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

If you flaunt a yacht while in debt, it shows you don't care


I just came across this lines from an interview of our RBI governor, it was very obviously pointing to a certain flamboyant CEO of a beleaguered group. I cannot agree  more, the same  attitude brought down the golden egg laying Beer business and the air line too, this was in some way predicted  by Mr. Gopinath who sold (?) Deccan airways to the KF group in an  interview he gave when the first crack appeared pointing to the obvious which an astute business man could see but unfortunately the bank did not or had no option by then.

But this is usually the case  with most of the rich business men that are in public life or other wise, probably with some exceptions like  Mr. Tata or Mr.Premji, Mr.Murty and his ilks, but then this are exceptions, usually people  with lot of money tend to throw their weight (pun not intended)around and this is also true for common people like us who are a  little better off who can afford a vehicle and a home than the majority Janta. Drive on  the road and you will understand, Rickshawallas can be  expected to break the signals, but when  you come across  a well dressed person driving a high end car and  still breaking the law nonchalantly it hurts more, since  they are aware that the law  is  being broken and know they can get away with it  and this is very worrying. Once in a while Rs.500/- is peanuts for them and they are bound to haggle and argue. 

I have a neighbor who is in the US of A for most part of the year, visits the homeland once in 3  months (and no he is not a  Software   engineer) has a  car and  a rented house there. During a conversation when he was asked about the traffic rules in foreign land, he explained that the fine ranges from 500  to 5000 dollars so no question of breaking the law and  the  police  is always round the corner with cameras  everywhere, so it is very expensive to break a signal and you are  bound to get caught plus the license will be terminated after certain offences so you will not be able to drive, does he follow the signal here?  He said no, am I mad? why should I if there is no police? When probed further, he confessed that he only follows the law for the fear of law and does not think it's a responsibility as a citizen.

And that my friends is the majority opinion,   it will be difficult to change the thinking, even though he is seeing and enjoying the benefits of following the law in the USA. The basic's are all wrong here and Rajan has  hit the nail on the head. The onus is on us to follow  the laws that benefit the society as a  whole.

There are 16 deaths in India every hour on Indian roads,