गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

Prince Tiwari - teresatheoceanofhumanityfoundation

लोक बहुदा देवळात देव शोधतात, पण काही भिकाऱ्यांना देवळाच्या बाहेरच देवाने सावरलं. कालच वाचनात एका २१ वर्षाच्या मुलाच हे कामआल . देवळात त्याला लहान मुल भिक  मागताना दिसली ( आपल्याला सुद्धा  हीच जास्त दिसतात) त्याने तो बेचेन झाला आणी  कुठे जातात ती मुल, म्हणून त्यांच्या पाठी गेला. कांदिवली fly over  खाली जी कुटुंब राहतात तिथली मुल होती ,  शिक्षणाच काय? हा पप्रश्न  पडला, मुन्सिपालटी शाळेत जातात, शीकले  काहीच नाहीत, फक्त जेवायला मिळत म्हणून जातात हे कळल, वह्या कोऱ्या. ह्या मुलाने (तेव्हा वय १७ -  १८  असेल)त्यांना शिकवायचं  ठरवल आणी  लागला    न कामाला , दोन वर्षा नंतर २५ मुलांना इंग्रजी medium शाळेत घातल आणी हे करत असताना स्वतः CA झाला ……स्थानिक "नेत्यांनी" त्याला illegal काम करतोस fly over खाली म्हणून दम दिला, ह्या मुलाने त्यांनाच सांगीतल कि मला एक जागा द्या ह्या मुलांना शिकवायला, तसे ते ह्याला टाळायला लागले. शिकवायला विरोध हा घरच्यान कडून सुद्धा   होताच तो ही त्याने दूर केला 

आता तो १०० मुलांना शिकवतो, एक खोली घेतली  आहे आता एक बस घेतोय, मुलांना शाळेत सोडायला. मी त्याला भेटायचा प्रयत्न करतोय भेटलो कि  आणीक माहिती देइनच. वाचून खूप  कवतुक वाटल त्यातला एक मुलगा जरी भिखारीहोण्या पासून वाचला तरी सुद्धा खूप आहे,  पण इथे तर आत्ताच १०० आहेत.  माझा खारीचा वाटा असेलच त्याच्या अशिक्षित ते शिक्षणा कडे  नेणाऱ्या  सेतू मध्ये, जमल तर आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करूया ……  त्या मुलाच  नाव Prince Tiwari :) आहे google केल तर एखादा लेख सापडेल. 

नवीन वर्षात ह्याला मदत करण्याचा निर्धार मी केलाय, एक तर माझ्या घरा जवळच आहे आणि दुसर म्हणजे शिक्षणातूनच प्रगती होईल अस वाटत 

सगळ्यांना Happy New  Year 

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

रफी

काल मी रफीच्या जयंती बद्दल लिहील म्हणून अजून थोड :)

किशोर च्या उगवत्या काळात रफी चा confidence एवढा गेला कि कुणीही त्याला  काहीही बोलायला लागला,  नौशाध एकदा मुद्दामून रेकॉर्डिंग studio मध्ये गेला  आणी  अस पाहिलं कि ऐरे गैरे रफीला बोलायचे , नौशाध ने रफी ला झापला जाम आणी खड्सावला, कि तू ग्रेट आहेस आणी हे कोण तुला शिकवणारे? ह्यावर न थांबता एक भैरवी मधल एक गाण करून घेतल, मला खर तर भैरव आणी भैरवितला फरक कळत नाही (खर तर केदार आणि भैरव मधला पण कळत नाही ) पण अस   वाचल आहे. त्याच वर्षी "तेरी गालीयो मे  न रखेंगे कदम" ला film fare मिळाला आणी रफीचा confidence  परत आला. 
confidence जायचं कारण कि, आराधना करताना बर्मन दा आजारी पडले म्हणून पंचम  ने धुरा  सांभाळला, म्हणून "बागो मे बहार हय"  हे रफी आणी  मग "रूप तेरा मस्ताना" किशोर , त्या नंतर म्हणतात तस , rest is  history. पण ज्या माणसाने एके काळी सगळ्या सुपर हिट्स पिक्चर च्या  हिरो ला आवाज  दिला तो असा होऊ शकतो? पंचम रफी चा चाहता न्हवता, तस अनील  बिस्वास आणि सी  रामचंद्र ही रफी विरोधक होतेच आणि थोड्या प्रमाणात  सलील  चौधरी सुद्धा, बघा न बहुतेक गाणी मुकेश, तलत किव्हा मन्ना डे  आहेत सलील  चौधरी साठी गायलेले . "धीरे धीरे चल" मध्ये पण लता बाई चिडल्या होत्या म्हणे  आणी सलीलदा ने  बाजू तिचीच घेतली.  पण सांगायचा मुद्दा असा कि आला परत confidence, niche skill  होत आवाज सुमधुर, आणी तालमीतला  आवाज … 
पण ह्या वरून एकच  कि, तुम्ही  किती वर गेलात, तरी कुणी तरी तुमच्या पेक्षा सरस येऊ शकतो आणी  एका प्रसंगा मुळे  आपण परत वर येऊ शकतो …   
हे वरच सगळ राजू भारतनच्या एका लेखातून आणी थोडस माझ्या बुद्धीतून … 
Happy  New Year!!!!  


गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

थंडी

हल्ली जरा थंडी पडायला लागली आहे, पण अजून तेल नाही गोठल आणि तोंडातून धूर पण नाही येत, सकाळी, म्हणजे थंडी मुळे धूर नाही येत. शाळेत जाताना आम्ही वर बघून हां हा अस केल कि एखाद महिना तरी यायचा धूर , national park मधेच येतो हल्ली. तर सांगायचं म्हणजे आज मी  स्कूटर न आणता  हाफिसात गाडी आणली (थंडी आहे न फार, मी गारठतो मी काय तेल नाही ) आणी रेडियो वर "तुमसा नाही देखा "  आणी  लगेचच "मै झीन्दगी का साथ निभाता चला गया " लागल , म्हंटल  सकाळीच लॉटरी  .... मग समजल कि आज रफी दि ग्रेट ची 91st जयंती. मस्त वाटल बाहेर थंडी आणि आत काचा बंद करून रफी, साहीर आणी  जयदेव  ....
तुम्हा सगळ्यांना थंडीच्या आणी रफी च्या जयंतीच्या शुभेछा 

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

(b)AAP रे बाप

गेले  कित्तेक दिवस ह्या विषया वर लिहीन म्हणतोय, पण टाळत होतो. काल AAP ने जो तमाशा मांडला त्यावरून वाटल लिहूनच टाकाव. एक तर AAP चा विशेष  राग आहे कारण त्यानी सरळ सरळ फसवलंय, म्हणजे दारू बंदी चा मोर्चा काढणारयाने, दारू पियुनच तो काढला तर? अस आहे ह्याचं, एक तर त्या केजरीवाल ला कुणी तरी सांगा हो की अरे बाबा तूच आहेस देल्हीचा शिल्पकार, आता तू काही मोर्चा काढणारा आणि रस्त्यावर आडवा पडणारा नाही राहिलास, तुझीच सत्ता आहे  आणि सारख हमरी तुमरीवर नाही चालत. पण त्याला तो तरी काय करणार? दिल्लीत सगळेच हमरी तुमरी वर येतात.


एक तर मुख्य मंत्र्याला  साधारण पणे  एक  पोच ठेवायला हवा आणी  भाषा जरा जपून वापरावी, प्रधान मंत्रीला काहीही बोलायच्या आधी लक्षात ठेवायला हवय कि तो तुझ्या बापाचा माल नाही (अरेरे काय हि भाषा ?) अख्या भारताने निवडून दिलेला तो एक आपलाच प्रतिनिधी आहे, त्याला शिव्या म्हणजे आपल्या सगळ्यांना शिव्या आहेत त्या. भाषेवरून लायकी कळते , म्हणजे तुम्ही जसा चार लोकात आणि चार लोकांशी बोलता त्या  वरून , भाषा म्हणजे हिंदी मराठी नाही. लहान पोर खेळताना भांडण झाल कि कशी बरळतात  तसा बरळतोय, रोज काहीतरी आठवून शिवराळ पणा.  इथे अण्णा  हजार्यांशी संबंध चांगले दाखऊन लालू ला मिठ्या  मारायच्या आणी हे सगळ AAP च्या कार्यकर्त्यांना चालत?

हल्ली RSS बद्दल वाईट बोलण्याची फ्याशन आहे, कुणीही उठत आणि RSS वाईट अस म्हणत काही लोक तर ISIS सारखेच आहे हो,  हे अस म्हणतात . एका माझ्या ओळखीच्या अतिशय सुज्ञ आणी आदरणीय माणसाने मला बोलण्याच्या ओघात  अस सांगीतल कि मोदी पेक्षा लालू बरा, माझ्या करता हे खूप धक्कादायक आहे.  मी स्वतः शाकेत जायचो कितेक वर्ष, अगदी शाखा घेऊन अनेक ठिकाणी जायचो, बर्याच संघातल्या (RSS च्या शाखा होत्या आमच्या लहान पणी ) लोकांना मी चांगल्या पणे  ओळखतो , चांगले सुशीक्षित, संसारी आणि संस्कारी लोक  आहेत, माझ्या देखत कुणीही बंदूक काढून खून केलेला मी पहिला नाही, किंबहुना ती लोक त्यातली नाहीच, मी करेन का अस काही? मग ही लोक ISIS सारखी कशी? लालू ने 12 हजार करोड खालले आणी बिहार ला पार मागे नेल, त्या  मनान गुजरातच बर चालला आहे अस दिसतंय, तरी लालू बरा? दीड वर्षात देशातले विरोधक सोडले तर फार काही वाईट लोक बोलत नाहीत आणी काहीतरी होताना दिसतंय.  भारता बाहेरच्या नेत्यांच मत सुधा चांगलच आहे (तरी लालू बरा?) आणि परदेश दौरा म्हणजे काही ITमध्ये onsite जाण्या सारखा नाही, गुंतवणूक दिसते आहेच न? सगळ्यांना instant noodles हवेत, लग्न  केल असत मोदीने  तरी अरे अजून गरोदरच बायको? दहा मुल होतील अस वचन  दिल होत, वर्ष झाल तरी अजून काही नाही? अस  म्हणणारी लोक कमी नाहीत (तरी लालू कसा बरा, त्याने पण एका वर्षात नाही काढली 9 मुल ?).

भीती  ह्याची वाटते कि आज लालू आला (खूप भीती दायक आहे, बिहारी माणसाला विचारा ), उद्या पप्पू येईल,बुद्धी जीवी खुश होतील (पैसा खाऊ द्या हो, गाय खायला विरोध नाही न?) मध्यम वर्गीय परत वैतागणार, मतच नाही देणार (लालू वाले नक्की  देतील), बाहेर  (परदेशात)जायचा प्रयत्न करणार, हे आताच नाहीये आधी सुद्धा लोकांना बाहेरचा  (बिहारचा नाही ) मोह होताच  तो राहणार. हिंदून  बद्दल बोललात  कि तुम्ही जातीयवादी. मला त्या दिवशी दोघ हा ब्राह्मण आहे अस म्हणाले(म्हणजे सहजच) , कॉलेजात हा भट आहे अस ही मुल बोलायची (मला काही त्याच सोयर सुटक नाही म्हणा), पण उद्या मी जर  कुणाला जाती वरून हाक मारली तर मला तो कोर्टात  नेऊ शकतो. म्हणजे ती तुमची असहीश्रुन्ता subjective आहे काही लोकांनी केली तरच एरवी OK अस्त. 

मी आज का लहिल? कारण एक तर  फार लोक फार  काही बोलतायेत आणि generally वाईटच  बोलतायेत, पण एक चांगल म्हणजे लोकांना आता बोलावसं वाटतंय कारण कुणी तरी ऐकेल अस होतंय ही चांगलीच बाब आहे   .....पण तरी लालू कसा बरा? हे उत्तर नाही मिळाल आणी  ह्या काळात परत हिटलर होईल हे अशक्य आहे ...


जाता जाता एकच ....त्या अमृता ला प्लीज कुणीतरी सांगा हो, कि तू फक्त घरी गात जा, मुखमंत्री बरा असला  आणी आम्ही  कितीही साहिश्र्णु असलो म्हणून काय झाल?  फार अंत नाही  पाहू ग लोकांचा