शुक्रवार, १७ जुलै, २०१५

किल्ला

किल्ला

दिगदर्शक हा मुळचा कॅमेरा मन आहे हे पिक्चर च्या पाचव्या मिनटाला कळत  तो नक्की चित्रकार सुद्धा अश्णार. एक तर कोकणच  फार सुंदर आहे, पण ते  चित्रकाराच्या डोळ्यातून पाहीची संधी किल्ला ह्या चित्रपटा मुळे आपल्याला मिळते .

सांगण्यासारखी गोष्टी  अशी काही नाही, म्हणजे एक 20 एक पानी कथा होईल फार तर, पण एक तर मांडणी आणि अभिनय, म्हणजे ती मुल तिथलीच शाळेतली वाटतात तेच त्यांच घर, शाळा, परिसर मित्र मंडळी  सगळी तिथलीच वाटतात इतका सहज सुंदर अभिनय.

एक तर सगळ्याच गोष्टी सांगितल्या नाहीत त्या तुमच्या तुम्ही  उलगडून घ्याच्या, म्हणजे त्या चिन्मय च्या आई ची घुसमट, एकाकी पणा, तिचा लढा वर वर प्रसंगातून दाखवलाय. एक तर खूप समंजस, पण लढाऊ  बाई दाखवली आहे आणि अमृता सुभाष ला सगळा पिक्चर शांत ठेवणं खूप अवघड अश्णार आणि melodramatic दाखवणं सहज सोप असताना आणी खपून जाइल अस असताना बांधून ठेवण म्हणजे खरच  कौतुक (संदीपला ला पण नाही जमलं श्वास मध्ये). त्या मुलाच्या आतल वादळ, लहान वयात, अस  कठीण प्रसंगाला सामोरा जाव लागण,  त्यात नवीन मित्र अगदीच वेगळे, गावणढल, काय म्हणतात त्याला इंग्रजीत? "Raw ,unpolished " खेळ वेगळे, वागण वेगळ, पण  त्यातून तो कसा वाट  काढतो, वादळात आपली  नाव कशी मार्गी लावतो, हे सगळ नुस्त  प्रतीकात्मक. त्या मुलाने तर अप्रतिम अभिनय  करून हे सगळ वागण्यात दाखवलाय, अगदी मीत  भाषी, पण आपल्या हालचालीन वरून म्हणा किव्हा चेहेऱ्यावरून म्हणा खूप बोलून जातो.

त्याचा तो मित्र त्यालाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय अमीताभ  बरोबर काम केलय  त्याने, तो त्याला आपल्या आई वडील  कशे मेले हे सांगताना अगदी matter of factly सांगतो  कि बस ड्रायवर झोपला आणि दरीत बस  कोसळली,  अंगावर एक झखम न होता गेले  .... मग त्याच वागण आपल्या पटायला लागत  अगदी बालपणी आई वडील गेले काका कडे राहत असलेला थोडा दुर्लक्षित म्हणून वांड, मोठ्या मुलाशी मैत्री करून लहान  मुलांना ओरडणारा दम दाटी करणारा कारण  घरात तेच असणार, हकनाक कुणाला तरी पिडायचं   हा उद्योग, पण चेहरा निष्पाप आणि वेळेला मित्रांना मदत करणारा, जो मूळ  स्वभाव किव्हा बाल सुलभ .  पण लहान मुल तशीच असतात, आधी तरी होती .

आई मुलाचे संवाद पण छान आहेत ती  अजिबात  मोठ्याने ओरडून आपली बाजू मांडत नाही, त्यालाच आपो आप कळत आणि नंतर आई ला मिठी मारतो, बस  तेवढच  काय ते नंतर परत नॉर्मल  उगा अश्रू उधळ नाही. छान उलगडणारा नात 

समुद्रात होडीतला आणि किल्ला मधला प्रसंग ज्याने त्याच आयुष्य बदलत  घडत ते अगदी पिक्चर चे high points.   सगळ्यांनी एकदा तरी निश्चित ही काल्कृती पहावी ...