शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

Kota - Students

News are so mundane this days, I mean the print media, same news again and again. The roads in Mumbai or in general  are in bad condition, there is nothing new right? 

A similar news which is a routine is of young students dying by suicide... 27th in Kota that was reported, may be much more (Suicide is still a stigma at places and mental health is still a taboo subject), this cannot be a news any more. The minister said there may be a love angle... that can be a story. This are just the numbers of Kota, calculate the numbers form all over the country.

Share of Students Among Suicide Victims in India Grew 70% Over Past Decade. And the population has increased by you know how much? Just do the maths and you will know what I am talking about. Coming to maths, why are we so much obsessed with Maths? 

Everyone who has a kid knows about Kota (and quota), the place where they churn out entrance examination toppers, it is a big industry estimated to about 6000 crore annually. Take a minute to digest that. People are spending 6000 crores to get their child eligible for IIT or MBBS entrance, about 2.5 lakhs students come to Kota, many of them from middle or lower middle class, taking loans or borrowing from relatives, selling off assets. Now just imagine a kid from a village or small town who is extremely intelligent but has no interest in becoming an engineer or a doctor, but since it was thrust upon him that all the "bright" students are suppose to go to IIT and since good tuitions are available in a place outside of his village 1000 of kilometres away from his family and he is packed off there... A 17 year old in an unknown place where people may not speak his language he may not get his food and people who are able to do maths faster than him. With no emotional support the kid in an unknown place and  all lost, what do you think will become of the kid?

Is it not high time that we stop glorifying academically bright students? Why have posters showing top rankers from different institutes for whom coaching is a business (none of my business) which is ok, since everyone earns money and wants to earn more and more and more. Education should be focussed on learning rather than earning.

For the parents it is ok if the kid is not in IIT, let the child do what it wants. It is more of a peer pressure from the parents' friends than the kids liking that forces people to go for Kota. 

There are students who really want to become an engineer have an ambition to become a doctor give them the best you can, but let the child decide.

Couple of examples a child being brilliant and still not in IIT is Sachin Tendulkar, M S Dhoni you can add Kohli to the list too for his super dedication. Are this people not brilliant? Look at all the young actors, singers artists all are brilliant. The rich and famous, D Mart founder, he is not from IIT. The new age chefs, Ranveer, Vikas Khanna all are brilliant. Singing , playing, running a business all requires brains.

In olden times when people had to rely on a job and specific lines of education it was mandatory for a few of them to get in to the IIT, but times have changed now, entrepreneurs are growing all over, artists who show their skills on you tube or insta still make huge money...

Do you ever remember the name of the person who stood first in the 10th or 12th standard? But you surely remember the name of the famous actor cricketeer born in the same year as you have.

Education is must, a basic degree is must, but to push a kid beyond his limit is not fair... seer salamat to pagdi hazaar is the famous quote, बच्चा बचा तो डिग्रिया हज़ार should be the new quote.

Learn from the kids, what we have learnt is of little use in this new world, kids are smarter wiser, don't teach them, just help them.

It is a big world many avenues to build innumerable seas to cross and much mountains to climb... The world is much beyond the college, let them learn unlearn climb and fall... 

Let them explore and find the beauty... they will be alive for long after we are gone...

 Sagar Kulkarni

रविवार, १६ एप्रिल, २०२३

आमने सामने

आमने  सामने :

बरेच दिवस  (महिने,वर्ष.. ) माझ्या बकेट लिस्ट मध्ये आमने  सामने होतं, पण योग काही येत न्हवता एक म्हणजे ठाण्यात फार प्रयोग न्हवते लागत आणि लागला कि एका दिवसात पहिला दहा रांगा गेल्याच म्हणून समजा पण शेवटी नाटक पाहायचा योग्य आलाच. 

एक अतिशय नाजूक विषय थोडा बंड खोरीचा अगदी contemporary. एवढं असून सुद्धा अप्रतिम सादरीकरण साधा सेट सगळं साधं पण अप्रतिममांडणी . उत्कृष्ट अभिनय (आमच्या बोरिवलीच्या लीना भागवत नि सगळ्यात बेस्ट केलंय हे सांगायला नकोच) आणि खूप छान फ्लो. कुठेही भडक नाही melodrama नाही अचूक भावना टिपणारा आणि विषयाला धरून ठेवण्याची अचूक सांगड. हे सगळं जमून आलेलं नाटक म्हणजे  आमने  सामने

जुनं नवीन वाईट चांगलं ह्याचा खूप सुंदर मेळ घातला आहे , अमुक एक रूढी म्हणजे बरोबर अमुक म्हणजे चूक हे कसं चूक आहे हे फार छान दाखवणारी एक उत्तम कलाकृती. मला खूप मोह होतोय स्टोरी सांगायचा पण तो मी टाळतोय. 

हे नाटक तरुण मुला मुलींनी माध्यम वयीन मुला मुलींनी आणि ज्यांना तरुण मुलं मुली आहेत त्यांनी आवर्जून आणि एकूण सगळ्यांनी स्टोरी दिगदर्शन आणि अभिनय ह्या करता नक्की पाहावं.  

सगळ्या टीम चं खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 


शुक्रवार, २४ मार्च, २०२३

भूषण शिंदे - कप्तानजी

२४ मार्च २०२३

काल दुपारी नेहमी सारखं ऑफिसचा  कॉल कॉल खेळत असताना, माझ्या एका मित्राचा (चुकीच्या इंग्रजीत) मेसेज आला कि भूषण सकाळी हार्ट अटॅक नि गेला, मी कॉल ताबोडतोब बंद करून फोन केला म्हणलं कोण भूषण ...शिंदे म्हणाला, विश्वास बसला नाहीच म्हणून अजून दोघांना फोन केला कन्फर्म झालं  ... मी पाच मिंट थंड पडलो , काहीच सुचेना मला. गुढी पाडव्याला आमच्या जुन्या ऑफिसच्या ग्रुप वर त्याचाच मेसेज होता शेवटचा (त्याच ग्रुप मीच तो गेल्याचा मेसेज टाकला त्याच्या मेसेजच्या खाली).  रिक्षा करून लागलीच त्याच्या घरी निघालो.. 

भूषण ला मी २००७ साला पासून ओळखतो , तेव्हा मिशी होती त्याला, नंतर काढली ४ एक वर्षाने, बायको ला चेंज नको का मला म्हणाला, त्याच्या इतका हजर जवाबी आणि त्याच्या इतका sense of humour असणारा माणूस  मी तरी पहिला नाही . situational आणि spontaneously विनोद करण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही (आता तर नुसता हात सुद्धा धरण्याच्या पल्याड गेलाय). सगळ्यांशी चांगले सम्बंध ठेऊन असणारा, म्हणजे बॉस असो कि अगदी नवोदित, हा एक मित्रा सारखाच होता. मी त्याला पॉलिटिक्स करताना पण नाही पाहिलं कधी, पण तो चतुर आणि सतर्क होता म्हणून इतका निर्मळ मनाचा असून आज इतक्या वरच्या position ला होता. त्याच्या कडून मी खूप सल्लेघ्यायचो , संमजवण्याची पद्धत पण अफाट होती त्याची, आमच्या पेक्षा वयाने लहान असून टीम चा कॅप्टन होता (half century तरी पूर्ण करायची कप्तानजी). एकदम रॉयल माणूस आणि अगदी complete family man. 

पाच वर्ष झाली मला कम्पनी सोडून, कधी घरी जायचा योग् नाही आला आणि आला तो असा. आई वडील दोन  बहिणी बायको (खूप कौतुक होतं त्याला आणि तो बोलून दाखवायचा पण नेहमी)एक मुलगी एक लहान मुलगा आणि आमच्या सारखा मोठा असा मित्र परिवार होता काल त्याच्या घरी. 

मी मध्यन्तरी स्पिती ला गेलो होतो हिमाचल ला, तेव्हा ते डोंगर बघून अबब झालं होतं मला , मी सह्याद्री वर पोसलेला आणि तेच डोंगर मोठ्याले वाटणारा , पहिल्यांदाच हिमालयन मौनटन रेंजेस पहिले आणि डोंगर किती मोठे असू शकतो ह्याचा प्रत्यय आला ...जाऊन बघा म्हणजे कळेल मी काय म्हणतो ते, काल भूषणच्या  घरी जाऊन आलो तेव्हा मला तसा दुःखाचा डोंगर दिसला , आपण लोणावळा घाट  पण किती मोठा म्हणतो, मग हे काय म्हणणार. सडे दहा ला कॉल संपवून, जरा अस्वस्थ वाटतंय म्हणाला आणि कोलॅप्स होऊन गेला ... ह्याला काय अर्थ आहे , थोडा टाइम तरी द्यायचा ना , एरवी बोलण्यात अचुक टाईमिंग साधणारा इथे नियतीच्या टाईमिंग पुढे विकेट गमावून बसला आमचा कॅप्टन. चुकलास  मित्रा. एरवी तोंड उघडलं कि आम्हाला हसवणारा आज शांत झोपला असताना आमच्या डोळ्यात अश्रू देऊन गेला. प्रचंड चटका लावून गेला... 

आमच्या  मधला असा हा पहिलाच गेला , बाकी ओळखीचे असे खूप गेलेत. डिसेम्बर ला त्याचा वाढदिवस होता, मी नेहमी सारखं  कुणीतरी happy birthday केलं म्हणून मम केलं, एकदा बसू ,  भेटू असं नुसतं बोलणं झालं खूपदा. (साला जाम गिल्ट येते ), आपण नुसतं म्हणतो आपल्याला काहीहि होणार त्यांना झालं, झालं कि कळतं.  पण मी एक ठरवलं कि नुसतं मम न करता फोन करायचा दोन मिंट का होईना? वर्षातून एकदाच का होईना बोलायचं थोडं तरी , पन्नाशी आल्यावर आली अक्कल. आणि आता फार हेवे दावे नाही उरले फार कुठे पोचायचं ध्येय फार मोठी ambitiion . पण नाही आता, नाती जपा असं झालंय आमचं. तुम्हाला कुणी फोन केला तर नक्की उत्तर द्या मीटिंग मध्ये असाल तर दहा सेकंड घ्या आणि कळवा करतो म्हणून नन्तर (आणि करा), ऊगाच कपाळावर आठ्या नका आणू . क्षण भंगुर बोलायला सोपं असतं. अनुभव आला कि कळतं आणि तो कुणावरच येऊ नये हि ईश्वर चरणी प्रार्थना.  

आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर. अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर - बहिणा बाई 


रविवार, १९ मार्च, २०२३

वणी - सप्तशृंगी

वणी - सप्तशृंगी  

वणीच्या सप्तशृंगी  ला दर वर्षी मी जातोच , कोविड मुळे काय ती दोन वर्ष राहून गेलं. आमची कुलदेवी त्या मुळे नियम म्हणून आणि अपार श्रद्धा असल्या मुळे,  नाही गेलं कि चुकल्या चुकल्या सारखं होतं . आधी आम्ही सगळा डोंगर - गड चढून जायचो, म्हणजे मी लहान असताना त्या बायका असायच्या, ज्या लहान मुलांना कडेवर घेऊन जायच्या तेव्हा पासून . ते झालं कि मग ५०० हुन अधिक पायऱ्या चढायच्या आणि मग कुठं दर्शन व्हायचं. पण एकदा देवळात गेलं कि सगळं विसरायला व्ह्याचं आपोआप हात जोडले जायचे डोळे पाणवायचे सगळा थकवा पळून जायचा. 

मग रस्ता झाला , फक्त ST जाईची मग थोडा बरा केला, आम्ही गाडी घेतली ती नेऊ लागलो , फक्त पायऱ्या होत्या अनेक वर्ष म्हणजे अगदी ३ वर्षां पूर्वी त्यांनी रोप वे केला, खूप बरं झालं , गर्दी वाढली ..बघता बघता खूप बदल झाले छान सोइ केल्या, स्वछ बाथरूम वगैरे पण आहेत पार्किंग आहे छान.... पण बदल करता करता आता देवीचं रूपच बदललं ... एकदम मॉर्डेन,  सडपातळ डोळे एकदम खाली झुकलेले काही तरी विचित्र हो. काहीतरी शेंदूर काढलाय म्हणे ... अरे पण असं रूप बदलायचं ??? 

आमच्या मनात एक प्रतिमा होती - आहे ती तुम्ही बदलता? म्हणजे उद्या माहेरपणाला एक मुलगी घरी आली आणि आईचा चेहराच बदलला तर? चालेल? नाही हो  नाही,  असं का सारखं बदलायचं आहे? आणि शेंदूर काढला म्हणून डोळे असे पेंगलेले? आधी कसं रूप होतं? काय भिशात पंगा घ्यायची? महिशासुर मर्दिनी वाटायला नको?

घोर निराशा झाली आधी दर्शन करताना भक्ती ने पाणी यायचं डोळयात आता वाईट वाटून आलं ... 

गुरुवार, १६ मार्च, २०२३

Vibrations

Have you ever felt that there are vibrations all around? the sound and visuals we see are also vibrations but the nature is full of vibrations, sound waves are what we feel but don't see. When you are alive there are vibrations from us , the soul vibrates the body,  if it matches with other person we feel good or positive and if it completely mismatches, we feel uncomfortable,  uneasy. Love is when the vibrations are in sync and create a new vibration altogether 

Vibrations heal, hurt, they comfort. Feel the vibrations, close your eyes and feel, when you exerices or run or work or cook or meditate , it is all different vibrations. Can we change the way we vibrate? Yes, observe your body and mind closely, feel the vibrations and try to keep the vibrations the same we feel when we are at peace. Get the rhythm in the vibrations. 

The sun rays the moon light are all vibrations of a different kind, the rain drops are the visible vibrations, when you chant any mantra or just say Om, you will feel the vibration more than anything else. 

I think the heart vibrates rather than beats, the brain is vibrating all the time bouncing off vibrations.

Think of all the activities and see if you can feel the vibrations.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

तुटकी नाती

एखादं नातं असतं ना? ते लगेच तुटलं कि चांगलं कि हळू हळू संपत गेलेलं बरं? म्हणजे बघा एखादा माणूस हार्ट अटॅक येऊन फटकन जातो, चांगला असतो धड धाकट, एकदम शॉकिंग ... जवळच्यांना त्रास होतो खूप, आठवण तर कायम राहते काही राहिल्याची सल मात्र बोचत राहते आयुष्य भर ... पण ना,  त्रास नाही झाला  जास्त हा एक दिलासा असतो 

कधी कधी माणूस आजारी पडतो आणि मग जातो कधी कधी चिवट आजार होतो कॅन्सर सारखा, मग काही अवयव कापून छाटून,  अजून तग धरतो , कधी बरा होतो पुन्हा,  छान नव्याने अगदी पूर्वी सारखा होतो, कधी कधी ,  बरा होता होता जातो आणि कधी जाता जाता बरा होतो, पण एकूण अवधी, म्हणजे जायच्या किव्हा तारायच्या आधीची  त्रास दायकअसते , म्हणजे काय करायचं हे कळत नाही हो , आणि आपलाच माणूस मरू दे असं नाही म्हणता येत ना?

तसच काही नात्यांचं होत असतं , सुटत नाही, तुटत नाही, जात नाही, चिवट असतं ... कुणाला तरी वाटत असतं जगू दे, कुणी ते संपण्याची आशा करत असतो, कुणी ते असंच मोडकं ठिगळ लावलेलं पुढे ढकलत असतो, कुणी दुसरा ह्या आशेवर असतो कि होईल बरं, एवढे कष्ट काढले ... 

"आशा" नात्यातली किव्हा माणसाच्या आयुष्याची,  त्याला जिवंत ठेवते  ... hope म्हणतात, सगळ्यांना दिसत असलं तरी जगण्याची आणि नातं टिकवण्याची आस जो वर संपत नाही तो वर तसंच असतं .  

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

"एकदा काय झालं"

जयवंत दळवींचं पुरुष नावाचं नाटक होतं , नाना करायचा काम , खूप असं अंगावर येत नाटक ते, म्हणजे तेव्हा यायचं, माझ्या नशिबाने (आणि वया मुळे) मी नाना आणि चंद्रकांत गोखले करायचे, ते version पाहिलं आहे. , पहिला अंक संपताना तो पुढारी म्हणजे नाना त्या मास्तरच्या मुलीवर बलात्कार करतो (म्हणजे नुसतं create केलं ते वातावरण ) आणि ओरडतो त्याच्या नोकरावर  "कोंब तीच गांधी टोपी तिच्या तोंडात "..... एक तर नाना चा आवाज, अंधार, ती मुलगी ओरडते ... असं खूप सुन्न करणारं सगळं असतं आणि पडदा पडतो , एक दोन मिंट सीट वरून कुणीच उठत नाही, म्हणजे तो impact तेवढा होता .  त्या नाटका संदर्भात एक किस्सा माझ्या मित्राने मला सांगितला होता, तो म्हणाला कि असा पडदा पडला आणि मी absolute stunned होऊन एक टक पडद्याकडे बघत होतो आणि शेजारचा माणूस, माला जरा जाऊदे म्हंटला आणि बायको कडे (स्वतःच्या) बघत म्हणाला काय आणू चोको बार का बटर स्कॉच ? 

अरे काय?  सगळा  तो impact घालवून टाकला, तुम्ही icecream खायला येता काय इथे? एक ठेऊन देणार होतो .  (त्या काळी थोडं theatre वगैरे चं वेड  होतं आम्हाला ). नशीब त्या माणसाला लगावली नाही ते (मित्र जरा violent होता). 

कट, टू पर्वा २०२२ ऑगस्ट - मी विवियाना मॉल मध्ये "एकदा काय झालं" पाहायला गेलो होतो (एकटाच) आणिशो VIP स्क्रीन मध्ये होता , छान खुर्च्या शेजारी टेबल  (महाग होतं तिकीट पण तरी बऱ्या पैकी भरलं होतं) ते VIP स्क्रीन म्हणून तुम्हाला अगदी मेनू कार्ड देऊन सीट वर आणून देतात ती लोक, ऑर्डर घेत फिरत असतात  . इंटर्वल ला त्या हिरो ला कॅन्सर आहे हे कळतं तो वर अगदी गोड छान असतं सगळं आणि मग ते लाईट लागले (पडदा काही पडला नाही ), तेव्हढ्यात तिथली बाई (म्हणजे ती serve करते ती ) पुढे आली आणि  म्हणाली would like to order some milk shake ? म्हंटलो मेले, मी शेक झालोय तो हिरो मरणार आता एका तासात आणि तुला मिल्क शेक सुचतोय होय? 

असं मी मनात म्हंटलो आणि गप गुमान बाहेर गेलो... तसं काही फार बदललं नाहीये हो. 


सागर कुलकर्णी