बुधवार, २२ जानेवारी, २०२०

त्रास

कधी कधी मी खूप बेचैन होतो..   सध्या जे चाललं  आहे त्यांनी म्हणा पण त्रास फार होतो...

धर्म किव्हा संस्था किव्हा एखादा गुरु (धर्मगुरु)  ह्यांच्या कडून शिकून आलेली,  किव्हा खूप पैसे देऊन शांती आणि ज्ञान प्राप्त करून आलेल्या लोकांच्या वागणुकीचा असेल ... पण त्रास फार होतो ...... 

आधी कशाबद्दल व्यक्त होऊ कळत नाहीये, हल्ली व्यक्त होईला हि भीती वाटत्ते आणि मी संघा मध्ये गेलो होतो त्या मुळे, मी काही भेकड धमक्यांना घाबरणारा नाही आणि समाजवादी वगैरे अजिबात नाही (समाजवाद वगैरे काही नसतो स्वार्थ वाद वगैरे असतो) . पण हल्ली सोशल मीडिया वर विकृत लोक जास्त जागरूक आहेत, आधी हि होती, पण आता त्यांना वाचा फुटली आहे कारण ते घोळक्या मागे लपतात..  भेकड आहेत पण मी अजून तरी स्थितप्रज्ञ नाहीये, मी आता कैक लोकांना unfollow केलय, पण तरीही त्रास होतो. 

आधी ह्या निर्बुद्ध कलाकार आणि समाजवादी लोकांना ऐकून मी पुन्हा निराश झालो, म्हणजे फरहान अख्तर तर बरे काढतो पिक्चर, पण आज कळलं कि त्यालाच काही ठाऊक नाहीये .. म्हणून त्रास 

पण खरा त्रास होतोना तो धर्माच्या नावाची अफूची गोळी घेतात त्या लोकांचा, पण कस आहे ना कि देवाचं करतोय, दारू तर पीत नाही ना? मग ठीक.. मग ठीक? मग ठीक? अहो सकाळी दारू उतरते तरी, माणूस एकदा चुकून सोडली तरी म्हणेल, पण ही गोळी रंगच धरते .. सकाळी आणिक चढते , लोक आणि चढवतात.. परवाच कुणी माझ्या ओळखीचं असच एका शिबिराला जाऊन आलं, जिथे श्रीमंत लोक खूप सारे पैसे देऊन मन शांती वगैरे मिळवतात, माझा अजिबात आक्षेप नाहीये, मी हि जाईन एक दिवस नक्की आणि पैसे घेतात त्या बद्दल हि वाद नाही हल्ली कांदा १२० रुपये आहेत (तिथे सात्विक असत, म्हणजे कांदा नाही ) ते तरी काय करणार नुसतं देव देव करून पैसा मिळत नाही हे त्यांना समजत , असो. तर त्यात जाऊन काय छान शिकतात म्हणजे मला खरंच आवडलं ऐकून, खूप छान सोपं आहे, पण हि जी माणसं जातात ना? त्यांचा एक अजेन्डा असतो , तीन दिवस मस्त त्याग वगैरे आणि बाहेर आल कि संपलं ... 

म्हणजे स्वामीजी कसे त्यागी असा म्हणताना  स्वतः ac गाडी शिवाय हलत नाहीत (स्वामी सुद्धा आणि परदेशी फास्ट क्लास नी विमानातून प्रवास) , स्वतःला सगळे मोह, पाश, माया (ही लागतेच), लालच , चैन लागत पण म्हणताना मात्र .... मी अमुक एक स्वामी चा (किव्हा ची) भक्त आहे आमचे स्वामी म्हणजे सगळं त्यागलं (हाविनोद ), मी पण तेच करणारे , फक्त एक फॉरेन ट्रिप आणि आवडीची गाडी, लग्न झालं नसेल तर, एक छान बायको (गुणी, सुंदर, नोकरी असणारी मन मिळाऊ .... ), दोन मुलं  हे झालं कि दोन तास नक्की. हे सगळं ऐकलं कि मला पु ल किती जास्त ग्रेट आहेत ते पुन्हा एकदा जाणवलं ... असा मी असा मी मध्ये असाच तो इंग्ग्रजी बोलणारा आणि पांढरे कपडे घालणारा स्वामी आणि सगळे उच्चभ्रू सेवक ... किती रास्त मांडलंय.तर मला ह्याचा त्रास होतो

त्रास होतो हिंदू नास्तिकांचा, मी हिंदू आहे आणि हिंदू धर्म मानत नाही म्हणून तो वाईट आणि त्या विरुद्ध मी बोलणार, गाय खाणार जा, मला इतर धर्माचं काही माहित नाही म्हणून मी त्यांना का विरोध करू? ते बिचारे चांगलेच असणार ...

मला त्रास होतो तो सैफ अली खान च्या तैमूर ला उदो करण्याचा (नावात काय असत तर मुलाचं नाव टॉमी का नाही ठेवलं ), फरहान अख्तर च्या खोटारडे पण चा नासीर सारख्या उत्तम नटाचा आणि माझ्या अवती भवती उंच कपडे आणि उत्तम गाडी घेऊन फिरणाऱ्या, फॉरेनच्या कंपनीत काम करणाऱ्या आणि तरीही निर्लज्ज पणे कॅपिटॅलिसम च्या विरोधात बोलून JNU चा फुकटे पणा आणि कॉम्युनिझम चे गुणगान गाणाऱ्या लोकांचा ....होतो त्रास होतो ....

असो उद्या नोकरी आहे, ट्राफिक वाढलाय आणि कांदा पण सवाशे आहे, मला त्रास करून चिडून निदर्शन करून चालणार नाही, मी अमेरिकन कंपनीत नोकरी करून ४ प्रत्येक्ष आणि १० अप्रतेक्ष लोकांना संभाळतो ....

तरीही जय हिंद!

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

मार साले को मार

बोरिवलीला,  दत्तपाड्यात , आत्ता जिथे फ्लाय ओव्हर आहे तिथे आधी एक मैदान होत,  मोठं . आम्ही तिथे फक्त मॅच बघायला किव्हा मॅच  खेळायला जायचो, एरवी तिकडे तिथलीच पोर खेळायची राजेंद्र नगर मधली, तिथे त्या हौसिंग बोर्डाच्या बिल्डिंग असतात ना तश्या खूप साऱ्या बिल्डिंग होत्या त्यातली मुलं तिथे खेळायचे आणि मुंबईत एका मैदानात खूप लोक एकदम मॅचेस खेळतात. मी आठवी का नववीत होतो तेव्हाची गोष्ट असेल, एकदा संध्याकाळी त्या  मैदानात मी आणि अतुल असेच गेलो होतो आणि तिथली मुलं नॉर्मल क्रिकेट खेळत होती आणि नेहमी प्रमाणे दोन मुलानं मध्ये तू आउट म्हणून थोडी भांडा भांडी झाली, त्यातला एक सरदारजी होता आणि असा पण जाम गरम डोक्याचा होता, त्याला एका मुलाने मारला आणि मग बाकीच्यांनी त्याला सोडवला, तर तो चिडून देख लुंगा मार दूंगा वगैरे म्हणून निघून गेला. पाच मिनिटाने तो मुलगा धावत येत होता आणि हातात चाकू ..मार दूंगा असा मोठयाने ओरडत होता, आवाज  कुठून येतो आहे  म्हणून आम्ही दचकून बघितल आणि तो दुसरा मुलगा पळत सुटला, त्याच्या मागे तो सरदार, तेवढ्यात त्या सरदारची आई आली धावत , आंम्हाला  वाटलं बर झालं  आई आली ते , जवळ आल्यावर कळलं कि ती हातवारे करून आपल्या मुलाला सांगत होती, मार साले को मार .... बापरे आमहाला काहीच कळत न्हवत.(त्या काळी विळी होती त्या मुळे भाजी चिरायला पण माझी  आई चाकू वापरत नव्हती) नशिबाने तिथल्या मोठया मुलांनी त्या सरदारला धरला आणि हातातला चाकू काढून घेतला, चल जा पळ म्हणून हाकलवला, तरी त्याची आई पीर पीर करतच होती, मेरे बच्चे को झूट आउट किया और मारा ... त्या नंतर आम्ही तिथे परत काही गेलो नाही आणि तो मुलगा पण क्रिकेट खेळताना दिसला नाही, सरदार ला कुणीच खेळायला घेतलं नाही नंतर .. 

पुढे कैक वर्षाने तो दुसरा मुलगा वडलांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये गर्क झाला आणि बरीच वाढवली त्याला एक छोटा भाऊ पण होता, सरदार पोरगा ... जे होयच तेच झालं, सिगारेट पिताना उभा असायचा केस कापून टाकले , दारू पिताना आणि टवाळक्या करताना दिसायचा ....आई आणि तो दोघंच  राहायचे .. आता माहित नाही काय करतात ती दोन मुलं ... झाली त्या गोष्टीला आता ३५/३६ वर्ष . पुढे खूप मारामाऱ्या जवळून पहिल्या अशी चिडकी भडक माथ्याची पोर पण बरीच दिसली .... पण ती सरदारीण "मार साले को मार" कायम लक्षात राहिली ... आईच वळण आपल्या अंग वळणी पडत ना? 

सध्या जे काही घडतंय जी मुलं कॉलेजात जाऊन म्हणा किव्हा रस्त्यावर धांगड धिंगा घालतात, खूप विकृत सोशल मीडिया वर पोस्ट करतात किव्हा  शेर करतात, मोठ्यांना उर्मट उत्तर देतात, विचार पटले नाही कि अंगावर धावून जातात, मीच बरोबर तू चूक अस म्हणतात ...  सारखी हातात तलवार (ही कैक वेळा प्रतीकात्मक असते). हे सगळं बघितलं कि का कुणास ठाऊक मला तो हातात चाकू घेऊन धावणारा मुलगा आणि त्याच्या पाठी येणारी त्याची आई दिसते.... मार साले को मार ....