सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

मनोज दादा

माला बहिणी जास्त  आणि भाऊ कमी, नाहीच म्हणा न आणि मोठा भाऊ तर एकच . लहान पणी सगळ्यां मुलांना आपल्याला एक मोठा भाऊ असावा अस वाटत  असत , म्हणजे काय कि वट मारता येते , कुणी आपल्याला दम देऊ शकत नाही, तोच आपला हिरो असतो तसा माझा लहान पणी पासून हा माझा मनोज दादा हिरो होता ......आहे

एक तर लहान पणा पासून त्याची बॉडी सोलिड होती आणी तो खूप हाण्ड्सम होता आता जरा केस पिकले म्हणून पण अजून तो देखणाच आहे.

मी इथे ठाण्याला येउन त्याची साइकल चालवायचो, निळ्या रंगाची होती , माझा पाय नीट पुरत नसे, मग मी  त्या चेन कवर वर पाय् ठेऊन चढायचो , साधारण पणे लोक डावीकडून चढतात मी उजवीकडून चढायचो , खोपडी उलटीच  आधीपासून ...माझी , तर त्या मुळे काय होइच कि ते कवर थोड दाबल जाईच , मनोज दादा ने मला एकदा सांगून पाहिलं पण मला काय ते डावीकडून जमल नाही आणि मी बरेच दिवस त्या चेन कवर वर पाय् ठेऊन चढायचो, पण तरी तो बिचारा मला कधी ओरडला नाही, ही तुमच्या करता खूप लहान गोष्ट असेल , पण  जेव्हा मी स्वतः साइकल घेतली तेव्हा मला जाणवल कि तो मला ओरडला नाही म्हणजे किती ग्रेट आहे ते आपली साइकल लहान पणी  एका मुलाला खूप प्रिय असते  आता कसा तो टयाब आहे तसा .....स्कूटर पण मी  ह्याचीच  शिकलो M 80 होती , मी इथे राहायला आलो कि फिरवत बसायचो, तेव्हा इथे एवढी वाहन न्हवती कि वस्ती  न्हवती , तो कामावर गेला तरी मी फिरवायचो ती  स्कूटर...

कामावरून आठवल कि माला आठवतंय तेव्हा पासून तो काम करायचा म्हणजे घरातल आणि फाक्टारीत जाउन  आज तो पन्नास  चा आहे म्हणजे गेली  पस्तीस एक वर्ष तरी तो कामच  करतोय , का ते मला नाही माहित पण माझ्या  आठवणीत ह्याची नाईट सेकंड किव्हा फस्त होतीच ....घरात त्याला कधी लोळताना मी पहिला नाही फक्त नाईट करून आला कि मात्र  आम्हाला आत्याचा धाक होता झोपलाय त्याला  उठू  नकोस अस सांगायची पण मला तो लहान पणा  पासून इथका आवडतो कि त्याला मी कधीच त्रास दिला नसता 

आमचा मनोज दादा क्रिकेट  खेळायचा , मला आठवत एकदा तो आमच्या कडे राहायला आला होता कारण त्याची दुसर्या दिवशी सकाळी ओवल ला म्याच होती , तो सीझन ने खेळणार ह्या कल्पनेनेच मी खूप खुश झालो मग त्यानी मला असा तोंडावर बोल टाकायला सांगीतला , बौन्सर  कसा खेळायचा ह्याची तय्यारी म्हणून ....


मी त्या  नंतर कित्तेक वर्ष आमच्या इथे सगळ्यांना  सांगायचो कि माझा भाऊ सीझन ने म्याच खेळतो म्हणून .... तसा मी लोकांना हे पण सांगायचो कि माझा भाऊ काय सोलिड स्कूटर चालवतो म्हणून ... तो सोलीडच आहे  त्याने माझ्या समोर कधी सिगारेट नाही ओढली कि कधी तमाबाकू नाही खाल्ला कि कधी काही नाही केल ....हे मला खूप महात्वाच वाटत , कारण तो करेल तस मी केल असत ...कारण तो माझा हिरो होता ...पण तो हिरो सारखच वागला  


तो   कायम हसत असतो कधी कावलेला चिडलेला मी नाही पहिला कुणावर  डाफरला नाही कि शिव्या दिलेला मी तरी पहिला नाही ....एकदा आम्ही म्हणजे मी बीना ताई आणि हा गाडीने बडोद्याला जात होतो  लग्न असेल बहुदा  .....गाडीत चढलो तेव्हा काही लोक  आधीच आमच्या सीट वर बसले होते  ....आणि थोडे  सरकून बसा म्हणाले , आता काय कराच हा प्रश्न पडला त्याना सांगून बघितल तरी ते निर्लज्ज पणे तसेच हसत होते ...मग मला  मनोज दादा म्हणाला कि तू थांब  बघतो आणि त्याना जबर दम दिला आणी उठा नाहीतर बघा  काय करेन ते ....उठले ते आणि आम्ही  बसलो निट  .....आणिक एक हिरो च काम


त्याच्याकडे त्या काळी म्हणजे बघा साधारण पणे तीस एक वर्षा पूर्वी फिलिप्स चा एक मुझिक प्लेयर होता त्या काळी दहा हझाराचा असेल …. मला जाम आवडायचा मोठे स्पीकर आणि amplifier वगेरे होता , एकदम ढासू , म्हणजे तो तुम्हाला आत्ता काटकसर करताना दिसत असेल पण तो खूप हौशी आणि दिलदार आहे …कारण तो एक अर्टिस्त आहे , तो एक उत्तम तबला वादक आहे   … माला आठवत तेव्हा  पासून तो तबला वाजवायचा अगदी कोटन ग्रीन ला असल्या पासून , मग कुणी त्याला म्हणायचं कि अरे मनोज जरा दादरा वाजून दाखव रे ,  मग मी ही एकदा म्हणालो होतो कि आता  बोरीवली वाजून दाखव …. आणि मग सगळे खूप हसले होते …. आता पण त्याला बसवा एकदम सही  वाजवेल …

एके  दिवशी  सगळ्यांना सारख त्याचा लग्न झाल , मानसीने पण त्याला  चांगलीच साथ साथ दिली , पण आत्ता विषय माझ्या मनोज दादा चा आहे… तो नोकरीशी इतका एक निष्ठ आहे म्हणजे बाइको शी तर असणारच

लग्नात तो सफारी सूट घालणार आहे अस मला म्हणाला …. बापरे मी जरा टरकलोच , कारण त्याने सुट  घालावा अस आम्हाला वाटत होत पण तो काही केल ऐकेना , मग दीदी आली आणि तिला मी सांगितल , त्याला काय बोलली ती कुणास ठाऊक पण तो सुट घालायला तय्यार झाला (तस आमच्या कडे  सगळेच दीदीच ऐकतात ) आणि नेहमी पेक्षा लग्नात जास्त देखणा दिसला   …. लग्नात त्याला सफारी का घालायचा होता कुणास ठाऊक?

लग्ना नंतर त्याने अफाट  संकटांना  तोंड दिलय, त्याने ज्या प्रेमाने आणि आस्थेने आपल्या  आई वडिलांची काळजी घेतली … घेतोय तशीच त्याने मानसीच्या आईची आणि वडलांची घेतली …घेतोय , मानसी च्या बहिणीच त्या दोघांनी इतक केल आणि ही गोड निकिता तर त्यांची सक्खी  मुलगी वाटते , मानसी तर तिची मावशीच आहे …. तीच खूप कौतुक आहेच पण नवराच्या पाठीम्ब्या शिवाय ती हे करू शकली असती का? किती प्रेमाने करतो तीच अगदी मांडीत पण घेऊन बसतो तिला , हल्ली जग पाहिलं न कि मग ही लोक (म्हणजे  माझा हिरो आणि त्याची बाइको ) किती मोठी  आहेत ते कळत , पण  हा वारसा त्याला आत्या आणि भाऊन कडून आलाय श्रीराम ला पण आत्या ने खूप  वर्ष सांभाळला त्याच्या भावा करता काय काय पाठवायचे … तेच ह्याने पाहिलं आणि मुख्य म्हणजे आचरणात आणल हे महत्वाच.

गणपती ला अजून दहा दिवस सुट्टी घेतो हा … त्या काळी आम्ही घरीच आरास करायचो … रात्र भर जागून तो थर्माकोल कापून दिवे लाऊन काहीतरी करायचोच … आम्ही म्हणजे मी सोडून …. कलेचा आणि माझा दूर पर्यंत संबंध नाही …. दीदी काही तरी करायची आणि बाकी सगळे तिचे हेल्पर … पण मजा यायची , दीदी, बीनाताई  आणि मनोज दादाने आणलेले दिवे अजून नीट  ठेवेल आहेत त्याने …. ते दिवे आणून आता तीसेक वर्ष झाली असतील :) , तो जशी नाती जपतो तश्या वस्तू सुधा जपतो.   दिवाळीत बहिणीं कडून अगदी रगडून घ्याचा तेल मग सगळ्या बहिणी जोर लगाके हय्या  करायच्या …मजा यायची , तोच काय त्याने आज पर्यंत त्रास दिला असेल बहिणींना

त्याने गेल्या वर्षी गाडी घेतली तेव्हा मी खूप खुश झालो (त्याने मला कळवल न्हव्त गाडी घेतली ते पण असो ) कारण तोच एक राहिला होता …   बाकी सगळ्यान कडे गाडी होती .  त्याला बिचाऱ्याला कष्टातून फुरसत मिळाली तेव्हा त्याने गाडी घेतली .

मानसी ने त्याला साथ दिलीच पण त्याची मुल पण अगदी गुणी आणि हुशार   निघाली, हे फारच छान झाल , शेवटी कर भला तो हो भला …सचीन तेंडूलकर कसा वकार च्या बाउन्सर ला धडाधड फ़ट्कावायचा तसा हा त्याच्या आयुष्यात ला संकटाना फटकावतो …. ते पण अगदी धीराने , आता मी काय त्याने तोंड  दिलेल्या संकटांची उजळणी करत नाइये नाहीतर दोन पान त्यातच जातील … पण त्याच्या एवढ समर्थ्य मला लाभाव अस नेहमी वाटत

पण मला अस वाटत कि त्याने थोड पिचर ला वगेरे वेळ काढून जाव मॉल मध्ये फिरावं  एखादा संगीताचा कार्यक्रम पहावा , खूप कष्ट केले आता थोड दमान घ्याव ….

त्याने जेवढ सोसलं आणि निभावल तोच त्याचा जाणे , मला तर ते अशक्यच होत , त्याच्या पुढल्या आयुष्यात खूप खूप आनंद यावा आणि त्याचे कष्ट संपून जावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना …