शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

हिंदू धर्म

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? हा धर्म कधी स्थापन्न झाला?म्हणजे त्या जू लोकांचा तो मोसेस का कुणी होता क्रीस्चन लोकांचा येशु आणि मुसलमानांचा मोहोम्मद. झालंच तर सिद्धार्थ चा जेव्हा गौतम बुद्ध होतो ते ही आपल्याला ठाऊक आहे , जैन लोकांचा महावीर , शीख लोकांचे धर्म गुरु हे आपल्याला माहित आहेत. 

पण हिंदू धर्म  हा established कधी झाला? तो Pvt. Ltd. कधी झाला हे मला कुणी सांगेल का? का हा धर्म होताच आणि आपल्याला हे माहीतच न्हवत? जेव्हा मुहम्मद घानी / चेंगीझ खान व इतर तत्सम परकीय  लोकांनी हल्ला केला तेव्हा आपल्याला समजलं  कि  ही लोक मुसलमान आणि आपण असे नाही , कालानतराने पोर्तुगीज आले (त्यानी खर तर conversion सुरु केले इंग्रज ह्या भानगडीत नाही पडले म्हणून राज्य करू शकले) आणि  हे ख्रिस्त म्हणजे आपण हे सुधा नाही , म्हणून  आपण हिंदू अस  आहे का? "Its a way of life" हे बरोबर आहे का? मी हिंदू आहे का? कश्यावरून?

आता काही लोक  तोकडे कपडे धर्मा  विरुद्ध आहे अस म्हणतात, पण शिलाई दोन हझार वर्षान पूर्वी होती का? त्या सेरिअल मध्ये दाखवतात तस  फॉल वगेरे लाऊन साडी होती का?ब्लाउज होते का? का साध फडक चोळी म्हणून बांधायचे? का फक्त साडी किव्हा नुस्त अंगाला गुंडाळलेल वस्त्र असायचं ? त्याने बाईची पाठ , पोट, कंबर, पाय दिसायचे का? ते अश्लील होत का? का बाइका कैक हजारो वर्ष डोक्यावर पदर घेऊन फिरायच्या? मुलींनी कमी कपडे घातले म्हणून माणूस भरकटला अस  म्हणणारे लोक हजार वर्षान पूर्वी होते का?माझ्या वाचनात किव्हा  गोष्टीन मधून हे समजलंय कि  इंद्र अप्सरांना पाठवून (देवांचा राजा सुधा काम करत नाही) ऋषी मुनींची तपशचर्या मोडायला लावायचा, मग ते मोहित होयचे(पण कुणी अप्सरेवर बळजबरी केल्याचं वाचण्यात आलेलं नाही), म्हणजे जी लोक बलात्कार करतात ते थोर ऋषी मुनी असतात/आहेत का?आणी ह्या मुलींना इंद्र पाठवतोय का?आणी  आपल्याला ते माहित नाही का?

हिंदूंच्या कोणत्या पुस्तकात मी काय खाइच आणि नाही हे लिहून ठेवलय ? ते पुस्तक कुणी लिहील आहे? देवळात खूप वेळा आरती करतात किती वेळा हे अस कुठे सांगितलंय का? देवाला कांदा लसूण चालत नाही अस देवाने कुणाला खाजगीत सांगितलंय का? कधी? ते इतरांना कस समजल?दहा हजार वर्षान पूर्वी शेती होती का?लोक अन्न शिजवायचे का? तेव्हा प्राणी मारून  खाईचे का? गाय मारायचे का? ती खाईला कधी व कुणी बंदी घातली? रामायणा मध्ये लोकांच जेवण काय होत? तेव्हा लोक लग्न करायची का?किती करू शकायचे? हा एक पत्नी चा नियम रामा मुळे पडला का? कारण महाभारतात तर एका पुरुषाला (पांडवांना सुधा)एका पेक्षा जास्त बाइका  होत्या आणि एका बाईलाच  एका पेक्षा जास्त नवरे होते. आपण आता मागास आहोत का तेव्हा होतो ?













गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

शोभा D(ivte)e

का उगीच त्या बिचाऱ्या बाईला सगळे त्रास देतात, एक तर तिचा आवडता, गोड, गोंडस, गोरा गोमटा, राजकारणी (मोठा विनोद आहे), सध्या बेपत्ता आहे, तिचा लाडका नट सध्या नाशीक कारागृहात, इतकया वेळा पाकिस्तानात जाऊन सुद्धा तिला एकदाही नाही भेटला मुलखात द्यायला (किती वाईट वाटल असेल). म्हणून अस काही बाही बरळते आणी एका स्त्री वर असा हल्ला? अरे अरे अरे …हाच का तुमचा मराठी बाणा? 

खर तर मला तीच लेखन कळत नाही, उच्च कोटीच लिहिते , तिची पुस्तक वाचण्या पेक्षा मी "सविता भाभी" वाचेन , सरळ, सोप, लगेच कळत. तेच लिहायचं मग उगाच आढे वेढे कशाला? तीच बिचारिचा काही उद्देश मराठी माणसाला दुखवायचं न्हवता यार, तिला "माझं  नाव शोभा " एवढंच काय ते मराठी येत असेल, ती कशाला मारायला मराठी सिनेमे पाहील ? कारण एकदा तरी तिच्या स्तंभातून (articles) एका तरी सिनेमाचा (चांगला) उल्लेख झाला असता. त्या बापडी करता मराठी खाणं  म्हणजे मीसळ आणि वडा  ह्याच पुरत सीमित आहे, म्हणून ते लिहिलं, उगा त्रास  नका देऊ तिला. बंगाली खाणं, continental, oriental अस सांगा लिहायला, बघा शंभर पान लिहील …  

जाउद्या हो फडणवीस दुर्लक्ष करा De madam कडे , लोकांना नाना फडणवीस नाही उमगले तर तुम्ही कशे कळणार?  त्यांना घरी बोलवा चांगला वांगी भात, ठेचा वगेरे बेत घाला…. 

(शोभा madam  ना कुणी तरी सांगा कि नाना फडणवीस हे देवेन्द्रचे आजोबा नाहीत)


शीकवण

 आज सकाळी (स्कूटर वरून) ऑफिस ला येताना , एका सिग्नल पाशी  (लाल होता म्हणून ) मी थांबलो. पाठून हॉर्न , मी लक्ष दिल नाही, सवय झाली आहे. परत होर्न , पाठच्या गाडीत एक माणूस (चांगला जन्टेल म्यान होता) आपल्या मुलीला गाडी शिकवत होता, मोठा L चा बोर्ड , मला खुणावतो जा , मी सिग्नल कडे बोट दाखवल , तरी परत हाताने जा म्हणाला, मी म्हंटल जा बाजूने , त्या माणसाने आपल्या मुलीला गाडी बाजूनी घेऊन जाईला सांगून मोडला सिग्नल, सुरेख शिकवण :). उद्या तिला सवय होणार आणि एक दिवस अन्दाज चुकला कि धडकणार आणि जीवाच  बर वाईट झाल  कुणाच्या (ही गाडीत हिला काय होणार?), तर हा माणूस जवाबदार असणार ती मुलगी नाही.  

त्याच्या मागून चार पाच गाड्या (सिग्नल तोडून ) गेल्या आणि माझ्या कडे "काय वेडा माणूस आहे " अस बघत गेल्या.  आंधळ्यांना कसा दिसणार दिवा? म्हणून त्यांची कीव करत  हसलो. 

रविवार, ५ एप्रिल, २०१५

राहुल देशपांडे / शंकर महादेवन

मगाशी झी वर एक कार्यक्रम पहिला त्यात महेश एलकुंचवार याचं भाषण आणि राहुल देशपांडे / शंकर महादेवन ह्याचं गाण अप्रतिम झाल.

गाण्याने "नशा" ह्यांची परिसीमा ओलांडली. एखाद्या संध्याकाळी सुर्य मावळत असतो ढगांना खेळायची हुक्की येते , आकाशात रंगांची उधळण होते , पक्षी हि त्यात सामील असतात वारा हळूच आपल्याल्या खुणावतो, आपण नुस्त त्या सूर्याकडे पाहत असतो ती दहा मिंट कशी जातात कळतच नाही, तों खेळ एकट्या सूर्याचा नास्तो अखं निसर्ग अस्त  त्यात सामावलेलं, आज शंकर आणि राहुल अशे काही गायले कि मेथ, गांजा, अफू झक  मारतील ह्या नशे पुढे … कुणाच्या friend  list वर ही दोघ असतील तर त्यांना माझा साष्टांग दंडवत सांगा … आज  वसंतराव नाहीत , मी काय त्यांना गाताना पहिले नाही, पण आज राहुल ने त्यांची उणीव भरून  काढली… शब्द अपुरे पडण ह्याची खंत आज प्रकर्षाने जाणवली…