गुरुवार, १९ मे, २०१६

झी चे कार्यक्रम....

एरवी कस होयचं न कि एखादीच मालिका बरी असायची, आता इतकी पातळी घसरली आहे न  कि पुसता सोय  नाही. तरीही सगळ्या मालिका  जोरात चालल्या आहेत.  म्हणजे उद्या सूर्य पश्चिमे कडूनउगवताना दाखवतील आणी  लोक चवीने ते पाहतील.

मी फक्त झी पाहतो (तेच लावतात घरी, काय करू?), म्हणून फक्त त्याच वहिनीच्या कार्यक्रमान बद्दल , एक म्हणजे ह्या सगळ्या शो च्या आधी एक disclaimer हवा, की हा कार्यक्रम निर्बुद्ध लोकांनी निर्बुद्ध लोकां  करता खूप पैशे मिळतात म्हणून केला आहे, तर त्या नुसार काय तो बोध घ्यावा.

जय मल्हार 
जय मल्हार नावाचा पहिला कार्यक्रम असतो  सातला,  आता आपण पण त्या  ISIS सारख असल्या  मुळे देवा बद्द्दल मी काय बोलणार? पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून ....एक म्हणजे ही काल्पनिक गोष्ट आहे त्यामुळे उगीच संदर्भ शोधत बसू नका आणि मी फक्त आणि फक्त मालिके बद्दल बोलत आहे, मला शंकरा बद्दल काही एक बोलायचं नाहीये मला सगळे देव आवडतात, ह्याची कृपा करून नोंद घायवी.

आता रामानंद सागर नी रामायणात फॉल  बिडिंग वाली साडी, मशीन ने शिवलेला ब्लाउज , तसेच दागीने  , टिकली वगेरे गोष्टी दाखव्ल्या होत्या त्या मुळे , ह्या गोष्टीन कडे  मी पाहत नाही  आणी  मुळात हा इतिहास  नाहीये त्या मुळे ते काहीही दाखू शकतात. आता लीला च्या मुलाने लीलया लोकांच्या गळ्यात मजनू म्हणून बाजीराव उतरवलाय (दुखः त्याला अवार्ड दिल  ह्याचय ) तर ह्या लोकांनी उद्या काहीही दाखवल तरी मला गैर वाटणार नाही.  सेट वगेरे बरे आहेत, बजेट च्या मानाने उत्तम. फक्त  कधी कधी जे हिमालय किव्हा जेजुरी  गड  दाखवण्याचा फाजील प्रयत्न केलाय तो त्रास दायक आहे हल्ली technically इतक advanced आहे कि हिमालय किव्हा मान सरोवर नीट दाखवण काही जड नाही. अभिनय म्हणाल तर नारद चांगला उभा केलाय , आवाज चांगलाय आणि सुरात गातो  माणूस, लक्ष्मी विष्णू छान  दिसतात , शांत चेहरा हवा तसा आणि तेव्हढाच  अभिनय, बानू न जरा बाळसं धरलय, (वाड्यात आल्या पासून कामाला बाइका  असतील बहुतेक ), म्हाळसा चा पर्सनल काही वाद असेल, ती तो  अभिनयात आणते, सारखच  कावते त्या  मोठ्या  देहावर आणि तो देह केवढा आहे , मल्हार म्हणजे शंकराच रूप (अस दाखवले आहे)  म्हणून तो प्रचंड माणूस घेतलाय, अरे पण मग जर इनर वेर  घालावेत  एवढ शरीर दाखवत हिंडू  नये सारख सारख, बर  दिसता  का ते? मी एक सहा महिन्यात एकदा बघतो, तेच हाव भाव करत तो मल्हारी मार्तानाडाचा आवेश आणून काही बाही करत असतो  (कधी कधी K.N.Singh सारखे चेहरे करतो ), म्हणजे फार कष्ट घेत नसावा अभिनय सुधारण्या  साठी, जेवढे कष्ट शरीर बनवण्यात घालवतोय  त्याच्या   अर्धा वेळ तरी त्याने अभिनय शिकायला द्यायला हरकत नाहीये, पण सांगायचं तात्पर्य म्हणजे गोष्ट इंचदेखील पुढे सरकली नाहीये  गेल्या सहा वर्षात (चार तरी असतीलच). तर सगळ्यांना माहित असलेली स्टोरी आहे, मस्त देव राक्षस मारा मारी  वगेरे  एक दोन चार महिन्याने डोकावून  बघायला ठीके.



नांदा सौख्य भरे:

कायद्याने जर बंदी आणता  आली असती तर मी कोर्टात गेलो असतो , म्हणजे संपदा जोगळेकर मला बरी सुद्न्य वाटली होती, साफच गेलीय, इतका टुकार लेखन, म्हणजे तमाम प्रेक्षक हे  मंद आहेत किव्हा ठार मूर्ख आहेत (असतील म्हणा)    अस गृहीत धरून लिहायला घेतलेली मालिका, बांदेकर च ठीके त्यांना पैशे कमवायचे आहेत (तरी भौजींना सामाजिक जवाबदारी हवी ) चार दिवस सासूचे  नावाची होती अशी  अघोरी मालिका संपता संपे ना शेवटी ई च्यानेल बंद पडलं  पण मालिका  नाही पडली बंद आता झी पडेल बंद पण ही मालिका काही बंद होणे नाही. आहो म्हणजे काहीतरी पटेल अस दाखवा उद्या अम्पायारला स्टंप च्या मागे दाखवाल आणि विकेट कीपर ला पुढे  आणि मग अपील करणार अम्पायर आणी निर्णय घेणार विकेट कीपर, पटल? हरकत काय आहे? अरे उगीच कारण नसताना दुष्ट पणा  करायचा आणि तोंडावर पाटी  लाऊन ठेवायची आणी ही पाटी मुलगा आणि सून सोडून सगळ्यांना दिसते आणि ते पण हवी तेव्हा. काम सासू करत नाही पैशे कमवत नाही आणि शेखचिली पणा मुलाला देशोधडीला लावायचं आणि काम करणाऱ्या, पैसे अणाऱ्या  सुनेला त्रास देऊन हाकलून लावायचं  का? तर तिला सत्ता आणि पैशे हवेत. अगदी नशिबाने ह्यांनाच वाईट लोक भेटतात ती हुशार असतात चांगली लोक मंद असतात.  लोक पण रोज चवीने तेच कस  पाहू शकतात? टिपरे होती प्रभावलकारांचीछान होती डोक्याला त्रास नाही, कधी तरी कंटाळा यायचा पण उगाच क्रूर पणा नाही, एखाद दिवस मी जाउन सैराट पाहीन रोज मुडदे पाडताना कशाला पाहीन? पण लोक बघतात, चवीने बघतात. अगदी भारी नको पण फील गुड नको का?    माणूस TV का पाहतो विरंगुळा म्हणून न? अरे पण मग हे अस? आता काही बायका भाजी निवडताना बघतात काही बाईका डोक्याच भज करून घ्यायला मालिका बघतात, म्हणजे सगळ फक्त पैशे कमवायलाच करतात न चानेल वाले ? मग डान्स बार का बंद ती लोक आम्ही पैशे कमवायला हे करतो, creativity दाखवायला वगेरे करतो अशी सोंग तरी आणत नाही.    म्हणजे एकीकडे मराठी सिनेमा इतका  पुढे गेलाय आणि मालिकांची अधोगती का? आणि झी वर? त्यांचेच आहेत न हल्लीचे सगळे चित्रपट ? निखिल साने ना   आणा इथे, हुशार आहे माणूस . 

म्हणजे न लोक काहीही बघतात  TV वर,  कारण फुकट असत ते आणी स्टार कडे बघता फार काही competetion नाही सध्या तरी, पण काही सांगू शकत नाही जर स्टार  चे दिवस उजळले तर त्रास होईल झी ला. थोडी जवाबदारी दाखवायला हरकत नाही.
पण स्टोरी नाही काही खास एक कजाक  सासू जी तोंडावरून हडळ दिसते आणि विचित्र चेहरे करते पण तरी काही मूर्ख लोकांना (मुलगा, सून ) ती देव वाटत्ते, मग ती कारस्थान करते आणि झिन्क्ते आणि सगळे दुखी होतात आणि त्या  चांगल्या मुलीला त्रास देतात सगळ वाईट होत मग खूप वाईट होत आणि ती खूप वाईट वागते आणि खूप वाईट हस्ते (आपण डोक्याला हात मारतो).  जेव्हा नवीन मालिका यायची असेल तेव्हा दोन एपिसोड सगळ नीटहोताना दाखवतील , तो पर्यंत दुष्काळात तेरावा  महिना ......



पसंत आहे मुलगी 

मला ती मुलगी खूप आवडते , गोड आहे आणि एकदम confident, मुंबईची नाहीये, भाषा छान  आहे आणि smart आहे, खूप देखणी वगेरे काही नाही पण पटकन आवडण्या सारखी आहे. हिरो पण चांगलाय, मला सुनील बर्वे टाईप वाटतो, शुद्ध बोलतो म्हणजे मठ वाले शोभतो . तर हा मुलगा एका कर्मठ घरचा,  प्रेमात पडतो आणि घरच्या परवानगी शिवाय  लग्न करतो आणि त्याच  लग्न ठरल असताना.
 सगळ्यांच्या reactions perfect दाखवल्या आहेत, त्यात नंदिनी सध्या वाईट दाखवली आहे पण एकदम freud ला आवडेल अस, तिची आई लहान पाणी गेलीये वडील वारले आहेत लग्न मोडलेल म्हणून ती तिच स्थान किव्हा security करता सगळा डाव टाकतेय उद्यानीट झाल तर चांगली पण वागेल (अस काही दाखवणार नाहीत ते ), situational आहे, ती खविस आत्या एकदमसही उभी केली आहे उज्वला  जोग ने , तिला फक्त त्या  मुली पासून सुटका , म्हणजे जवाबदारी पासून, मोठी सून, तिला काहीच स्थान नाही , थोडी लोभी,  अशी वाईट नाही, पण एकदम narrow  minded,  लांबचा विचारच नाही, दागिन्यांची हौस ऐपत नाही नवरा विरक्त,  त्यामुळे अमिषाला बळी पडणारी, दादा एकदम कर्मठ, परंपरा,  देव हे नुस्त आंधळ्या पणे  पाळत जायचं, विचार नाही. माई प्रेमळ, नवरा हेच सर्वस्व पण नवीन विचार पण पटणारी, रूढी आहेत त्या बदलता येत नाही हे जाणवणारी.  त्या उर्मी चा बाप एकदम तत्व वादि, छान  मोकळ वातावरण असणार घर आणि जिथे मोकळ्या पणाने  विचार मांडता येतात अस वातावरण म्हणेज बाबा ला ए  बाबा म्हणणारी, सुस्वभावी ,   तिथून एकदम कर्मठ घरातलं वातावरण, concept चांगलाय आता त्याला रंगवणार का चिखल करणार हे बघायचं .

ह्यात ती देव देव करणारी मुलगी सरास खोटी शपथ घेते आणि देव न मानणारी मुलगी खर बोलते, तिला लपायला लपवायला देवाचा आधार नाही लागत.... ह्या लोकांनी balance अजून तरी ठेवलाय पण जर लोकांना मठः समजून जर पुढे नेणार असले तर संपलच ....          

थोडं थोड पाहायला हरकत नाहीये, पण रोज अर्धा तास नको वाटेल  
       



सौभ्ग्यावती 


एक म्हणजे वैभव मांग्लेचा उत्तम अभिनय , बस संपल बाकी सगळ भंपक . ठीके अजून थोड, अभिनय सगळ्यानीच उत्तम केलाय,  पक्याची कॉमेडी किव्हा वैभव ची बाइको सासरे आई वडील सासू मित्र सगळेच सही आहेत. पण मुळात स्टोरीत दमच  नाही म्हणजे फार तर दोन अंकी नाटक  किव्हा सिनेमा पण मालिका?दोन वर्ष (कमीत कमी ) चालणारी?  जरा  जड जाइल, म्हणजे आपल्याला त्यांना काही नाही जड. म्हणजे एक माणूस स्त्री वेशात जातो हे  ठीके, पण हिरोईन म्हणून काम करतो? अरे दिसतो रे तो पुरुष  अस  नका करू, वाटल्यास पटकन नाही समजणार पण रोज दिवस रात्र एकत्र काम करताना स्पर्श करताना एका पुरुषाला ...पुरुष  आणि बाई ह्यातला फरक नको कळायला? हे म्हणेज अगदीच लोकांना येड समजल्या सारख, म्हणजे artist lok तंद्रीअसतील पण एवढे मंद? रमेश भाटकर ला लंपट दाखवलाय (फार अभिनय कौशल्य नसेल लागल तसाच आहे चेहरा ) त्याला नको कळायला? एका झटक्यात समजेल आणि एक दोन दिवस ठीके पण महिनोन महिने? आणि प्रेक्षक? ते पण येडे काय?  अगदी नका रे अस करू? ते बालगंधर्व बिचारे बेचैन असतील स्वर्गात.

पण कधी पण पहा आणि कुठून पण पहा स्टोरी पुढे  सरकत नाही प्रेक्षक वर्ग  हा मूर्ख आहे हे गृहीत धरूनच सगळ्या मालिका केलेल्या आहेत

काहे दिया परदेस 


म्हणजे आता पर प्रांतीय मराठी मालिकेत  घुसायला लागले आहेत  आणी ते सुद्धा direct हिरो म्हणून, काही खर नाहीये . तो नट चांगलाय, नटीला अजून जमायचं आहे, पण मोहन जोशी ने बापच बाप केलंय म्हणजे अगदी चपखल बसलाय त्या भूमिकेत, बाकीचे कलाकार सुद्धा उत्तम आहेत. एक परदेसी परदेसी मुलगा शेजारी  येतो आणि मग ते सगळ normal love story सारख, ती सून उगीच चेटकीण आणि भांडखोर लोभी दाखवली आहे, म्हणजे असतील  अश्या बाईका, पण नीट सालस दाखवायला काही हरकत नाही . एक अतिशय भामटा मुलगा दाखवायला आहे तो पण मराठी आणि तो पण कपाळावर चोर  आहे अशी पाटी  फिरलाय  फसतात. आता नेहमी सारख ती मुलगी आणि तो मुलगा भांडतील आणि प्रेमात वगेरे पडतील  मग ती  पण जाइल बनारस ला बघू घडतंय ......

रोज बघायची गरज नाही आठवड्यातून एकदा दहा मिंट चालेल त्यात मोहन जोशी असण गरजेच आहे.    


चला हवा येऊ द्या 

सध्या चालू असलेल्या मालिकेन मधली सगळ्यात बेष्ट, कधी कधी पकवतात, पण इतके गुणी आहेत सगळे कलाकार कि सगळच तारून नेतात. म्हणजे साबळे उत्तमच लिहितो पण कधी कधी लूस असेल स्क्रिप्ट तरी  सुधा कलाकार तरतात एके काळी पेपर वर अझर  सगळ्यात उत्तम कर्णधार होता (एकटाच असेल जो थर्ड म्यान ला फिल्डिंग  करायचा), त्याचा कारण म्हणजे सचिन, सौरभ, द्रविड, लक्ष्मण , श्रीनाथ कुंबळे सगळेच त्याच्या कडे , प्रयत्न  करावे लागले हरायला, इथे साबळे ला हरायचा काहीच कारण नाही त्या मुळे तो छानच लिहितो आणि हे छानच करतात, कधीतरी लोकांना  थोडा बोलू द्यायला हरकत नाहीये, कारण हीच लोक धिंगाणा घालतात, जरा ही बाब पहिली तर सोने पे सुहागा.

सगळेच अशेच असतील कार्यक्रम तर प्रेक्षक पण खुश होईल हो . कधी पण पहा रोज पण पहा नुसता फार्स  आहे नो टेनशन  

अस्मिता        

तीन वर्ष झाली म्हणे,  मी तीनदा पण नसेल पहिला, त्या मुळे  लिहिण गैर ठरेल.

 रात्रीस खेळ चाले    

मुलगी लहान असल्या मुळे अशे कार्यक्रमान बंदी आहेआमच्याकडे कडे (सुटलो, नाहीतर माझी जाम फाटते)


बुधवार, १८ मे, २०१६

www.rapidels.com

नात्यातला गोडवा वाढवेल rapidel  ….

सकाळी वडलांच्या वाढदिवसाला त्यांना फोन केला, त्यांना म्हंटल Greeting Card पाठवल आहे मिळाल का? नाही म्हणाले आणी आता कार्ड पेक्षा मला आज हव होत काही तरी गोड. पुरण पोळी केली पटकन पण  पाठवणार कशी?  मी राहते ठाण्याला आणी  वडील बोरीवली ते कार्ड सुद्धा एका दिवसानंतर सुद्धा  नाही पोचत, Rapidel ला विचारल, कराल का पुरण पोळी पोस्त? काय कमाल जेवायला वडलांच्या ताटात मी केलेली पोळी पोहोचली ……… नुसत्या पोळ्या नाहीत त्यांनी माझ्या भावना सुद्धा पोहोचवल्या. 

नुस्त कार्ड नाही तर बरच काही …. Rapidel  फक्त चार तासात pick up  and delivery   

शतशः धन्यवाद
http://www.rapidels.com/