मंगळवार, ७ जून, २०१६

माननीय मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, विषय : वाढते अपघात



प्रती,                                                                                                                      07-जून-2016

माननीय मुख्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य,

            विषय : वाढते अपघात  

माननीय श्री देवेंद्र फडणवीस स न वी वी ,

पत्र लिहिण्यास कारण  हल्ली होत असलेले अपघात (सध्या वाहनान विषयी). ह्याच आठवड्यात मुंबई - पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामुळे परत एकदा खूप मोठ्या संखेत जीवित हानी झाली आणी त्यात ताहने जीव गेले ह्याच अतिशय दुखः झाल. पण ह्याचा कारण माझ्या मते अती वेग किव्हा दारू किव्हा निष्काळजी पणा नसून बेशिस्ती हे आहे.

मी गेली 25 वर्ष गाडी आणी स्कूटर  चालवतो आहे आणी अलीकडे मुंबईत होणारी बेशिस्त बघून प्रचंड राग येतो. आधी मुंबईच नाव शिस्तीशी जोडलं जाइच, लोक  सिग्नल ला थांबायची वेडी वाकडी गाडी चालवायचे नाहीत. पण हल्ली लोक सर्रास  सिग्नल मोडतात, उलटे रस्त्या वर येतात, बिनदिक्कत मधेच गाडी उभी करतात. पार्किंग तर विचारू नका. मी ठाकूर संकुलात राहतो आणी 90 फीट  रस्त्यावर वेड्या वाकड्या  गाड्या उभ्या असतात त्यांना हात न लावता कोपर्यात उभी असलेली दुचाकी उचलली जाते.

माझ्या  मते लोकांना मुंबईत शिस्त लावली  तर लोक आपोआप  महामार्गावर गाडी नीट  चालवतील आणि अपघात  टाळता  येतील. तुम्ही महामार्गावर काय ते नियम लावाच पण त्या हि पेक्षा लोकांना मुंबईतच शिस्त लावा म्हणजे, आपण घरीच नीट  वळण लावल कि मुल बाहेर गेल तरी नीटच वागणार नुस्त पाहुणे आले कि  डोळे वटारून काय उपयोग? लोकांना सीट बेल्ट आणी   हेल्मेट ची सक्ती करू शकल न शासन? मग हे  पण  जमेल आणि ह्यात तर इतर लोकांचे जीव वाचतील. 

ह्या करता एक जालीम  उपाय म्हणजे मोठा  दंड, सिग्नल  मोडला कि किमान 5000/-  त्यातले 1800/-  रुपये  एक पोलीसान साठीच्या फंडात  टाका, त्यांच्या "welfare" साठी  वापरा  200/ रुपये त्या पोलिसाला द्या म्हणजे लाच द्यायचा प्रश्न येणार नाही (त्यांना ही फायदा/प्रोत्साहन) सरकार ला 3000/- .   हळू हळू लोकांनाआपो आप सवय होईल आणि  मग शिस्त लागेल.

कृपा करून लवकरात लवकर काहीतरी करा ही नम्र विनंती. एक नागरिक  म्हणून मी काही  मदत करू शकलो तर मला जरूर कळवा .

आपला कृपाभिलाषी ,

सागर कुलकर्णी
मुंबई