मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सॉक्रेटिस आणि आपण

सॉक्रेटिस म्हणतो 

"When a bunch of known corrupt people unite against one man and spare no effort to ridicule him blackmail him and attempt to assassinate his character, blindly follow that man". 

सॉक्रेटिस च नाव घेऊन सुरवात केली ह्याची दोन कारण आहेत, एक म्हणजे सॉक्रेटिस ने म्हटलंय अस लिहिलं कि लोक लगेच पुढे वाचतात, कारण आपल्या कडे काय बोललय ह्या पेक्षा कुणी बोललंय हे महत्वाचं आहे, दुसरं म्हणजे सध्या जे काही चाललंय त्या साठी हे वरच वाक्य अगदी चपखल बसत. 

मला हल्लीच्या पत्रकारानं बद्दल फार आदर राहिला नाहीये, त्यात केतकर आता राज्य सभेत काँग्रेस च्याच तिकीटा वर गेले (गेलाच म्हंटल पाहिजे, पण मी काही पत्रकार नाही ना पुढारी, मला संस्कार आहेत ) आता  तर अजूनच घाण बोलतील.  वागळे, कुबेर लवकरच तिथे जातीलच, अर्णब ला वेळ आहे अजून बराच . गडकरी गेले आणि लोकसत्ताची ची (वैचारिक)अधोगती व्हायला सुरवात झाली होती , केतकर तर काँग्रेसच्या पगारा वर होतेच, म्हणून त्यांनी आपल्यासारख्याच माणसाला गादि  सोपवली. 

माझा मुद्दा असा कि वैचारिक मतभेद असतील, न्हवे असावेत, पण व्यक्तीनिष्ठा ? तुम्हाला मुद्दे पटत नाही भांडा , जरूर भांडा (मला खर तर, चर्चा म्हणायचं होत, पण त्याने TRP मिळत नाही हल्ली ) पण हा माणूस कसा चांगला आणि कसा वाईट असच. लालू ला तर कोर्टाने शिक्षा दिली आहे आणि हे खूप आधी पासूनच चाललंय, म्हणून राबडी ला पद दिल आणि स्वतः रेल्वेची मारली, तरीही लोक, लोक म्हणजे पुढारी, पत्रकार , बुद्धी जीवी , त्याच्यावर अन्याय झाला आहे वगैरे म्हणतात. इतका प्रखर मोदी विरोध? तुम्ही आज कोणत्याही बिहारी माणसाला विचारा, तो हेच सांगेल कि लालू ने कशी वाट लावली. आता परत जेव्हा आला सत्तेवर (गेला म्हणावं आता) , तेव्हा ऑफिसातली   एक बिहारी मुलगी म्हणाली कि "अब खतम" आधी शाळा बंद, मग बसेस बंद आणि गुन्डा गर्दी चालू . माझे ओळखीचे विद्वान असे गृहसथ आहेत, ते म्हणतात लालू चालेल पण मोदी नको, त्यांचा ठीके ते पुण्यात राहतात खूप पैसे आहेत आणि विदेशी आहेत (म्हणजे जन्म इथला पण citizenship बाहेरची) त्या मुळे ते काय कधी बिहारात जाणार नाहीत, फार त्रास झालाच तर तिकीट काढून फारेन, म्हणजे त्यांच्या मायदेशी, लालू येवो नाहीतर पप्पू, त्यांचा काय अडतंय?  

तर सॉक्रेटिस म्हणतो त्या प्रमाणे जर कुणी एकाच माणसा विरुद्ध इतकी माणसं हात धुवून मागे लागले असतील  ज्यांना कोर्टाने गुन्हेगार म्हण्टलंय ती सगळीच जर मोदी विरोधात असतील तर मगमोदी नक्कीच काही तरी करत असतील ज्याने टी माणसं धोक्यात येण्याची शक्यता असेल, देश प्रेम वगैरे काही नाही त्यांना. ही गोष्ट अनपढ गवार लोकांना कळत नाही हे ठीके, पण सुज्ञ लोकांना कळू नये? आता दलित क्रांती परत सुरु झाली आहे ते ह्या मुळेच असेल. दलितां वर प्रेम असत तर एव्हाना ती लोक वर आली असती, पैसा देऊन मारामारी करणे, नुकसान करणे हे अगदी रोजच काम, ती सगळी रस्त्यात उतरलेली दलित होती? एवढा वेळ आहे? नवल आहे , ह्या सगळ्याने एकत्र येऊन काम केलं तर जास्त भलं होईल.... त्यांचं पुढाऱ्यांचे नाही.       

आपण जो एक माध्यम वर्गीयसमाज आहे तो नेहमीच गप्प सहन करत असतो , नाही म्हणायला आता social media आहे जिथे तो मत व्यक्त करता येत, पण ते तेवढंच . भारत बंद झालं कि सुट्टी टाकून घरी, ओला/उबर चा  संप,रिक्षा टॅक्सी करा, गाड्या बंद पाडल्या त्रास करून ऑफिसात जा. आपण बहुतेक सगळे न भांडता टोल देतो, टॅक्स भरतो , विना तक्रार बँकेत सुद्धा सगळे पुरावे देऊन घर गहाण ठेऊन housing loan घेतो , स्व खर्चाने सुट्टीत फिरतो , तरीही आपणच सगळा त्रास का सहन करायचा? बंद च्या दिवशी काहींच्या गाड्या फोडल्या त्या लोकांनी काय केल असणार? गपचूप रिपेअर केल्या असणार आणि मिळेल तेवढाच इन्शुरन्स घेतला असणार. दलित अन्याय मुस्लिम अन्याय ह्याव अन्याय एक ना दोन , असं म्ह्णून तोडफोड होते नुकसान होत हे सगळ भोगतो आपणच, पण आपण बंड का नाही करू शकत? एकत्र नाही येऊ शकत? आता २०१९ च इलेक्शन जवळ येत चाललंय म्हणून आपली ताकद दाखवायला हवीये, ज्या सरकारला मी निवडून दिल होत हळू हळू ते मतान साठी वेगळंच बोलायला लागले आहेत, दलित आता भारत बंद करायला लागल्या मुळे लगेच ह्यांचा सूर बदलला , म्हणजे शेवटी माध्यम वर्ग उपेक्षित राहणार का? चांगला माणूस म्हणता म्हणता आपण निष्क्रिय असल्या मुळे बदलणार का सगळं?

एवढी हुशार लोक आहेत तरी काही सोलुशन नाही? मारामारी सोडा त्याने काही प्रश्न सुटत नाहीत पण असा काही मार्ग आहे का? ज्याने ह्या लोकांना,  सरकार ला जाणीव होईल झळ बसेल? आपण एक दिवस संप नाही का करू शकत? एक दिवस टोल नाहीच भरायचा , कुणीच नाही भरायचा, किव्हा टोल रस्त्याने जायचंच नाही, जी लोक दंगलीत भाग घेतात त्यांना आपण वाळीत नाही का टाकू शकत? आपण एक मेकांना तरी साथ देऊ शकतो का? स्टेशन वर चार रिक्षावाले दादागिरी करतात , तिथून त्या वेळी जाणारी माणसं ४ हजार त्या पैकी एक टक्का लोक जरी एकत्र आली तरी सुद्धा ते गूंड घाबरतील . फेरीवाल्यानं कडून दोन दिवस नका घेऊ, आपलाच रस्ता आहे आपण त्याचा tax भरतो, तरीही आपल्याला चालायला जागा नाही गाड्या पार्क करायला जागा नाही तो सगळं फुकट घेतोय, हे आपल्या लक्षात येतय का?

आपण एकदा तरी असं करून पाहायला हवं बदल होईल आपण घडवून आणू .... आपलं मत महत्वाचं आहे हे कळायला हवं         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: