रविवार, १९ मार्च, २०२३

वणी - सप्तशृंगी

वणी - सप्तशृंगी  

वणीच्या सप्तशृंगी  ला दर वर्षी मी जातोच , कोविड मुळे काय ती दोन वर्ष राहून गेलं. आमची कुलदेवी त्या मुळे नियम म्हणून आणि अपार श्रद्धा असल्या मुळे,  नाही गेलं कि चुकल्या चुकल्या सारखं होतं . आधी आम्ही सगळा डोंगर - गड चढून जायचो, म्हणजे मी लहान असताना त्या बायका असायच्या, ज्या लहान मुलांना कडेवर घेऊन जायच्या तेव्हा पासून . ते झालं कि मग ५०० हुन अधिक पायऱ्या चढायच्या आणि मग कुठं दर्शन व्हायचं. पण एकदा देवळात गेलं कि सगळं विसरायला व्ह्याचं आपोआप हात जोडले जायचे डोळे पाणवायचे सगळा थकवा पळून जायचा. 

मग रस्ता झाला , फक्त ST जाईची मग थोडा बरा केला, आम्ही गाडी घेतली ती नेऊ लागलो , फक्त पायऱ्या होत्या अनेक वर्ष म्हणजे अगदी ३ वर्षां पूर्वी त्यांनी रोप वे केला, खूप बरं झालं , गर्दी वाढली ..बघता बघता खूप बदल झाले छान सोइ केल्या, स्वछ बाथरूम वगैरे पण आहेत पार्किंग आहे छान.... पण बदल करता करता आता देवीचं रूपच बदललं ... एकदम मॉर्डेन,  सडपातळ डोळे एकदम खाली झुकलेले काही तरी विचित्र हो. काहीतरी शेंदूर काढलाय म्हणे ... अरे पण असं रूप बदलायचं ??? 

आमच्या मनात एक प्रतिमा होती - आहे ती तुम्ही बदलता? म्हणजे उद्या माहेरपणाला एक मुलगी घरी आली आणि आईचा चेहराच बदलला तर? चालेल? नाही हो  नाही,  असं का सारखं बदलायचं आहे? आणि शेंदूर काढला म्हणून डोळे असे पेंगलेले? आधी कसं रूप होतं? काय भिशात पंगा घ्यायची? महिशासुर मर्दिनी वाटायला नको?

घोर निराशा झाली आधी दर्शन करताना भक्ती ने पाणी यायचं डोळयात आता वाईट वाटून आलं ... 

गुरुवार, १६ मार्च, २०२३

Vibrations

Have you ever felt that there are vibrations all around? the sound and visuals we see are also vibrations but the nature is full of vibrations, sound waves are what we feel but don't see. When you are alive there are vibrations from us , the soul vibrates the body,  if it matches with other person we feel good or positive and if it completely mismatches, we feel uncomfortable,  uneasy. Love is when the vibrations are in sync and create a new vibration altogether 

Vibrations heal, hurt, they comfort. Feel the vibrations, close your eyes and feel, when you exerices or run or work or cook or meditate , it is all different vibrations. Can we change the way we vibrate? Yes, observe your body and mind closely, feel the vibrations and try to keep the vibrations the same we feel when we are at peace. Get the rhythm in the vibrations. 

The sun rays the moon light are all vibrations of a different kind, the rain drops are the visible vibrations, when you chant any mantra or just say Om, you will feel the vibration more than anything else. 

I think the heart vibrates rather than beats, the brain is vibrating all the time bouncing off vibrations.

Think of all the activities and see if you can feel the vibrations.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

तुटकी नाती

एखादं नातं असतं ना? ते लगेच तुटलं कि चांगलं कि हळू हळू संपत गेलेलं बरं? म्हणजे बघा एखादा माणूस हार्ट अटॅक येऊन फटकन जातो, चांगला असतो धड धाकट, एकदम शॉकिंग ... जवळच्यांना त्रास होतो खूप, आठवण तर कायम राहते काही राहिल्याची सल मात्र बोचत राहते आयुष्य भर ... पण ना,  त्रास नाही झाला  जास्त हा एक दिलासा असतो 

कधी कधी माणूस आजारी पडतो आणि मग जातो कधी कधी चिवट आजार होतो कॅन्सर सारखा, मग काही अवयव कापून छाटून,  अजून तग धरतो , कधी बरा होतो पुन्हा,  छान नव्याने अगदी पूर्वी सारखा होतो, कधी कधी ,  बरा होता होता जातो आणि कधी जाता जाता बरा होतो, पण एकूण अवधी, म्हणजे जायच्या किव्हा तारायच्या आधीची  त्रास दायकअसते , म्हणजे काय करायचं हे कळत नाही हो , आणि आपलाच माणूस मरू दे असं नाही म्हणता येत ना?

तसच काही नात्यांचं होत असतं , सुटत नाही, तुटत नाही, जात नाही, चिवट असतं ... कुणाला तरी वाटत असतं जगू दे, कुणी ते संपण्याची आशा करत असतो, कुणी ते असंच मोडकं ठिगळ लावलेलं पुढे ढकलत असतो, कुणी दुसरा ह्या आशेवर असतो कि होईल बरं, एवढे कष्ट काढले ... 

"आशा" नात्यातली किव्हा माणसाच्या आयुष्याची,  त्याला जिवंत ठेवते  ... hope म्हणतात, सगळ्यांना दिसत असलं तरी जगण्याची आणि नातं टिकवण्याची आस जो वर संपत नाही तो वर तसंच असतं .  

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

"एकदा काय झालं"

जयवंत दळवींचं पुरुष नावाचं नाटक होतं , नाना करायचा काम , खूप असं अंगावर येत नाटक ते, म्हणजे तेव्हा यायचं, माझ्या नशिबाने (आणि वया मुळे) मी नाना आणि चंद्रकांत गोखले करायचे, ते version पाहिलं आहे. , पहिला अंक संपताना तो पुढारी म्हणजे नाना त्या मास्तरच्या मुलीवर बलात्कार करतो (म्हणजे नुसतं create केलं ते वातावरण ) आणि ओरडतो त्याच्या नोकरावर  "कोंब तीच गांधी टोपी तिच्या तोंडात "..... एक तर नाना चा आवाज, अंधार, ती मुलगी ओरडते ... असं खूप सुन्न करणारं सगळं असतं आणि पडदा पडतो , एक दोन मिंट सीट वरून कुणीच उठत नाही, म्हणजे तो impact तेवढा होता .  त्या नाटका संदर्भात एक किस्सा माझ्या मित्राने मला सांगितला होता, तो म्हणाला कि असा पडदा पडला आणि मी absolute stunned होऊन एक टक पडद्याकडे बघत होतो आणि शेजारचा माणूस, माला जरा जाऊदे म्हंटला आणि बायको कडे (स्वतःच्या) बघत म्हणाला काय आणू चोको बार का बटर स्कॉच ? 

अरे काय?  सगळा  तो impact घालवून टाकला, तुम्ही icecream खायला येता काय इथे? एक ठेऊन देणार होतो .  (त्या काळी थोडं theatre वगैरे चं वेड  होतं आम्हाला ). नशीब त्या माणसाला लगावली नाही ते (मित्र जरा violent होता). 

कट, टू पर्वा २०२२ ऑगस्ट - मी विवियाना मॉल मध्ये "एकदा काय झालं" पाहायला गेलो होतो (एकटाच) आणिशो VIP स्क्रीन मध्ये होता , छान खुर्च्या शेजारी टेबल  (महाग होतं तिकीट पण तरी बऱ्या पैकी भरलं होतं) ते VIP स्क्रीन म्हणून तुम्हाला अगदी मेनू कार्ड देऊन सीट वर आणून देतात ती लोक, ऑर्डर घेत फिरत असतात  . इंटर्वल ला त्या हिरो ला कॅन्सर आहे हे कळतं तो वर अगदी गोड छान असतं सगळं आणि मग ते लाईट लागले (पडदा काही पडला नाही ), तेव्हढ्यात तिथली बाई (म्हणजे ती serve करते ती ) पुढे आली आणि  म्हणाली would like to order some milk shake ? म्हंटलो मेले, मी शेक झालोय तो हिरो मरणार आता एका तासात आणि तुला मिल्क शेक सुचतोय होय? 

असं मी मनात म्हंटलो आणि गप गुमान बाहेर गेलो... तसं काही फार बदललं नाहीये हो. 


सागर कुलकर्णी 

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

आज ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल  परी धावली, तुमच्या सारखं मी सुद्धा दुर्लक्ष केलं, (लाल परी म्हणजे ST सांगावं लागतं). 

पण काय झालं न, मी हल्लीच (२५ डिसेंबर च्या आस पास )संजय बरोबर  एक छोटी कोकण ट्रिप केली त्याच्या गाडीतून , मुंबई कोल्हापूर रत्नागिरी, गणपती पुळे, मग गुहागर, दाभोळ , दापोली हे बोटीतून आणि मग मंडणगड गोरेगाव , रोहा ,  पनवेल .... पण हि गोष्ट त्या निसर्गरम्य रोड ट्रिप ची नाही (त्यावर नक्की नन्तर ). 

गुहागर ला जेऊन आम्ही (काय जेवण सांगतो तुम्हाला.. )बोटीमार्गे ( बोटीत गाडी टाकून ) दाभोळ आणि दापोली जाणार होतो, (म्हणजे गेलो तसेच) जाताना रस्त्यात (किती वाईट रस्ता असावा?) उन्हात एक कोळीण टोपली घेऊन जात होती आणि तिने आमहाला हात दाखवला , एक ५ सेकंद विचार करून आम्ही तिला lift दिली, एक अडीच किलो मीटर अंतरावर बोट होती आणि भर उन्हात ती बाई चालत होती म्हणून तिला सोडू म्हणलं. संजय कोकणातलाच (त्याला सगळे रस्ते तोंड पाठ अगदी रायगड जिल्हा ते थेट गोवा , सलाम आहे त्याला) म्हणून त्याने विचारलं "कुठे जाते विकायला मासे?" गुहागर म्हंटली ती, तरी ३ एक किलोमीटर म्हणजे एकूण ५ (वन वे ), मी अंदाज बांधला , सकाळची जाते आणि आता घरी .. जाताना अशीच आणि येताना पन टोपली घेऊन ईक्ले मासे तर लवकर न्हाई तर उशीर .. मी (निरागस पणे) विचारलं वाहन नाही  का मिळत चालत जातेस का ? ती ST बंद आहे ना, करायचं काय आम्ही? तुमच्या सारखी देव माणसं रोज भेटो रे देवा तुम्हाला खूप आविष (आयुष्य ) मिळो ... असं म्हणून उतरली ... साधं सोपं सरळ ... मला म्ह्णून कोकण फार आवडतं .. 

साला आम्ही AC गाडीत , मला शेवटचा ST मध्ये कधी बसल्लो हे आठवत सुद्धा नाही... हि बाई गेले ६४ दिवस रोज १०  एक किलोमीटर माश्याची टोपली घेऊन (भर उन्हात )चालते... आणि आम्हाला मनोभावे खूप आयुष्य मिळो देवा कडे प्रार्थना करते ... किती वाईट आहे हे ... 

एक तर मी अनाडी आहे (आहेसच) किव्हा राजा आंधळा आहे ... आता राजा नाही राहिला हे विसरतो म्हणा ...   

आज अचानक ती बातमी ऐकली, ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल  परी धावली..  आणि सगळं एकदम उफाळून आलं, त्या जोकोविच चं आपल्याला माहितीये पण इथे आपली माणसं वण वण करतायेत ते नाही माहित म्हणून आज सांगावं वाटलं .. 



शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

मारहाण

 काल माझ्या घरात घुसून १० लोकांनी माला मारायचा प्रयत्न केला , हे वाक्य  ऐकून  वाईट  वाटतं थोडी भीतीही वाटते, पण जेव्हा आपल्याच सोसायटीतली २० ते २५ ह्या वयोगटातली सुशिक्षित आणि "सुसंस्कृत " घरातली मुलं एका पन्नाशीच्या माणसाला शारीरिक इजा व्हावी ह्या उद्देशाने घरात घुसून मारतात तेव्हा समाज म्हणून आपण हादरलो पाहिजे. 

हा प्रसंग नावररात्रीत माझ्या बरोबर घडला, थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या कडे दर वर्षी गोंगाटात अतिशय कर्कश अश्या आवाजात (अगदी १२० डेसिबल पर्यंत) खूप लोकं (काही आतली काही बाहेरची ) चांगले कपडे घालून नाचतात आणि त्याला "नवरात्र" असं धर्माचं लेबल लावतात (किती छान! सोजवळ आणि सोईस्कर न ?), मग तुम्हाला ते आवडो का न आवडो तुमचं वय ९० वर्ष असो का ९० दिवस, तुम्ही  आजारी असो का परीक्षा असो अगदी निमूट पणे ते सहन करावं लागतं कारण मग त्याला धर्माचा रंग चढतो (मग तो हिरवा असो वा भगवा तुम्ही त्याला बोट दाखवू शकत नाही) आणि तुम्हाला सगळा त्रास, नऊ दिवस (नऊहि  दिन है ना ? क्या प्रॉब्लेम है? असं हि लोकं मला म्हणाली आहेत) सहनच "चं"  करावा लागतो , दरवर्षी प्रमाणे यंदाही , (कायद्या मध्ये बसत नसतानाहि ) आमच्या घराखाली गरबा खेळण्यात आला. 

त्या दिवशी मी एका माणसाला फोन वर शिव्या घातल्या , तो खाली निवेदन करत  होता म्हणून त्याला, त्यानेही दिल्या आणि मग २० माणसं घेऊन माझ्या घरी आला आणि मला ओढून खाली घेऊन जाऊ लागला माझ्या हातातला फोन ती पोरं घेऊ लागली मी आरडा ओरडा केला तेव्हा आतल्या खोलीतून माझे ८९ वर्षांचे वडील आले , तेव्हा माझ्या नशिबाने ती लोक शांत झाली आणि खाली गेली. 

मुद्दा हा नाहीये कि लोकं गरबा खेळतात आवाज करतात मी शिव्या दिल्या त्याने दिल्या, मुद्दा हा आहे कि शिवी दिली म्हणून एकाच complex मध्ये २० वर्ष एकत्र राहणारी माणसं एवढी हिंस्त्र होतात? हि सगळी मध्यम वर्गीय सुशिक्षित लोकं, मला ओळखणारी माणसं हेही कबूल करतील कि कुणाच्या अंगावर धावून जाणे शिव्या देणे हे माझ्या मूळ स्वभावात नाही, तरीही एखाद्या माणसाला २० लोकांनी मारावं हा इतका मोठा गुनाह होता?

मदतीला एकही माणूस आला नाही, उलट काही ओळखीची माणसं त्यांना प्रोत्साहन देत होती हे जास्त क्लेशकारी होतं.  आपण नुसता देवाचा "धर्म" पाळताना, माणूस धर्म, शेजार, धर्म वैगेरे साफ विसरलोय का? का मुद्दाम अडगळीत टाकलेत? मग तालिबान ला का नावं ठेवा ? ती लोकं तर अशिक्षित आहे (मला मारायला आलेला माणूस एका IT कम्पनी मध्ये VP आहे, म्हणजे "सुशिक्षित" असणारच) तालिबानकडे बंदुका आहेत, मला मारायला येताना मुलं साधे pvc पाईप घेऊन आले होते हाच फरक , शेट्टी म्हणून एक आमच्या इथे एक माणूस राहतो, त्याचं समर्थन आहे ह्या सगळ्याला,   म्हणाला "वोह पाईप नही लगता", त्याला काय सांगू? जखम फक्त शारीरिक नसते. 

कांदिवली पूर्व जिथे मी राहतो तिथे सगळे मध्यम वर्गीय आहेत, पण मोजून चार लोकांनी मला पाठिंबा दिला,  एकाही कमिटी मधल्या माणसाने माझी विचारपूस सुद्धा केली नाही (त्यातलाएक तर त्यांचं समर्थन करतो , बाप को गाली दिया फिर घुस्सा आयेगा ना ? मग तू काय आयुष्य भर मारामारी करत फिरणार का?) ह्यांना काय म्हणायचं? ह्याच माणसाने शेजारचा १७ वर्षाचा मुलगा गिटार वाजतो म्हणून पोलीस ला बोलावून दम भरला होता, आवाजाचा त्रास होतो म्हणून. त्या वेळी त्या मुलाचा बाबा डेंगू नि हॉस्पिटल मध्ये होता. 

 माणुसकी म्हणून तरी विचारा, उद्या तुम्हाला हि मदत लागू शकतेच ना? बाकीच्यांना वाटतंय कि माझ्या घरी तर नाही नं आलं कुणी आणि सागर तर नेहमी त्या देवाच्या कार्यक्रमाला विरोध करतो,  असच पाहिजे. पण त्यांना हे कळत नाही कि हि प्रवृत्ती फार भयानक आहे ती लोकं आज माझ्या घरी आलीत उद्या त्यांच्या कडेजातील , जर एक सुशिक्षित (आणि सुंस्कृत असं म्हणणार होतो, पण आवरलं) माणूस हे करू शकतो तर बाकीचे काय करतील?

हि वृत्त्ती मुळा पासून नको का काढायला? आणि आत्ताच जर सगळ्यांनी मिळून ह्या प्रवृत्ती ला उखडून नाही फेकलं तर उद्या आपली मुंबई राहील का सुरक्षित? अजून पर्यंत माझ्या घरी नाही ना? मग राहूदे,  हे किती दिवस चालणार? उद्या हीच मुलं खाली दंगा करतील, किव्हा दारू पिऊन मुलींना छेडतील आणि कुणी काही बोललं तर ते घरी येऊन मारतील. 

खूप लोकं करतात म्हणून बरोबर आणि कुणी ह्याला विरोध केला तर त्याला मारा, धडा शिकवा,  हे जे सगळं चाललंय ना ते फार भीती दायक आहे. वाईट माणसं जशी कळपात असतात नं? तशी चांगली माणसं हि एकेकटी असतात पण वेळे प्रसंगी ह्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी म्हणतो तेच बरोबर आणि चांगलं म्हणा, किती भयाव्य आहे सगळं कधी जागे होणार आपण? 

आपण आपल्या मुलांनां काय धडे देतोय? त्या माणसा बरोबर त्याचा १८ वर्षांचा मुलगा आणि त्याचे मित्र होते, मोठे पणी तो मुलगा हेच करेल का?


गुरुवार, ७ मे, २०२०

आता मात्र फार झालं ....

आता मात्र फार झालं .... 

दहा बारा वर्षान पूर्वीची गोष्ट असेल, आम्ही कोकणातून  कोल्हापूर मार्गे येत होतो गाडीने, तेव्हा माझी लेक ५  का ६ वरशाची असेल आणि गाडी पण लहान होती,  (अगदी गुणी होती अजिबात कटकट नाही रड नाही हट्ट नाही) आधी दोन चार तास छान गेले, तिनी थोडी झोप काढली मग बाबा कधी येणार घर? हा प्रश्न म्हटलं खूप लागेल आठ दहा तास तरी लागतील, मग तिला मी ते बोर्ड दाखवले मुंबई अमुक एक किलोमीटर चे आणि त्याने अंदाज बांधायला सांगितला , पण का  कुणास ठाऊक ट्राफिक लागत गेलं आम्हाला, पण तिने बिचारीने हू का चू नाही केलं, जीव रमवायला तिने स्वतःला गोष्टी सांगितल्या , गाडीतल्या फडक्याने आतून गाडी साफ करते म्हणाली, ते झालं तरी मुंबई काही येई ना, मग आम्ही ब्रेक घेतला, एक्सप्रेस वे वरून पटकन आलो आणि मुंबईत परत ट्रॅफिक आणि मग कस झाल कि मुंबई आली आणि ते किलोमीटर पण कमी  झाले, पण घर काही येई ना, बाबा ... बाबा ... किती वेळ? मी हि खेकसलो, मग तिचा चेहरा आणिक छोटा झाला, मग मलाच माझा राग आला, मग बाहेरच्या वर ओरडलो, (ती विसरली मी नाही विसरलो) अस मजल दर मजल करत अगदी घरा पाशी आलो, तिलाही आता रस्ता ओळखीचा होता आणि घर अगदी एक किलोमीटर होत म्हणजे आपण आता आलोच हे लक्षात आल होत आणि परत, हे ट्रॅफिक लागलं , एकदम माझी मुलगी मला म्हणाली आता बस बाबा, हे खूप होतंय खूप त्रास दिला ह्या  लोकांनी आता आपण जाऊया चालत .... आता मात्र बस्स ... इतका हसलो ना .. नशिबाने ते ट्रॅफिक लगेच सुटलं म्हणा आणि पाचव्या मिनिटाला आम्ही बिल्डिंग मध्ये, तिच्या चिडून बोलण्या मुळे फरक पडला का कोण जाणे ? सध्या मला हे असं झालं आहे , आम्ही गप गुमान निमूट पणे सगळं सहन केलंय ना? आता बस्स ... 

हा जंतू काही जात नाही इथून अजून थोडे दिवस, महिने वर्ष, आपण आता काळजी घेतोय .हो ना? आता थोडं बाहेर पडूद्या कामाला तरी. ... १७ ला उघडणार म्हणताय, मग परत लोक गर्दी करणार, मग परत तुम्ही बंद करणार .. त्या पेक्षा हळू हळू थोड्या थोड्या लोकांना बाहेर येऊ द्या... आमच्या गरजा पण सरकार ठरवतंय (हे लै होतंय), म्हणून पंखे आणि ac विकण्याचं दुकान बंदच , पण दारू चालू केली..(काय लॉजिक असेल?)  लोकांना थंड वाटावं आणि सरकारी तिजोरी गरम व्हावी म्हणून, एक तर दारू बंदीला माझा विरोध आहे (आणि पंखे विक्री बंद केली त्याला पण) अरे स्टेशनरी पण बंद? का लोक काय गर्दी करून पेन घेणार? आहो गरजेला पेन लागत, मुलं घरी आहेत पुस्तक, वह्या, कागद, टेप, गम, स्टेपलर, रबर, खोड रबर, पिना (मारायला नाही) फोल्डर, फाईल, अनेक गोष्टी लागतात ...आणि हे लागतं हो ..रोज नाही लागल तरी गरजेची वस्तू आहे.  आता  पंखा बंद पडला तर माणूस उकाड्याने मरेल, पण कुणी तरी ठरवत कि जेवण फक्त गरजेचं उन्हाळ्यात पंखा नसला तरी चालेल, आता पंखा विक्री चालू केली तर काय लोक तो गळफास लावायला वापरतील हि भीती आहे का सरकारला? मार्च सरला, एप्रिल एकदाचा रखडत खरडत पार पडला मे आला आता जीव जातोय उकडून त्यात ट्यूब गेली आहे खूप जणांची, तरी अंधार चालेल, जेवायला मिळतंय ना? अरे? काय चाललंय काय? रोटी कपडा मकान हा प्रश्न खूप साऱ्या लोकांनी सोडवलाय, चार दिवस नाही मिळाली भाजी तरी वरण भट उसळ पोळी पिठलं भाकरी (किती भारी मेनू बघा भाजी वीणा ) किव्हा पोहे खाऊन सुद्धा जगतील लोक पण पंखा एक मिंट बंद करून बघा ... तर पंखा फक्त प्रतीकात्मक आहे.  अश्या खूप गोष्टी आहेत .. काही लोक फक्त अती श्रीमंत आणि अती गरीब लोकांचे प्रॉब्लेम्स बघतात .. मध्यम वर्ग ? त्याला गृहीत धरलाय ...  आता बस्स ... 

माझे दोन चार प्रश्न वजा सल्ले आहेत (हे आपले मलाच), एक तर होम डिलिव्हरी फक्त जेवण (काय जेवण जेवण चाललंय कोणास ठाऊक )बाकीचं काही नाही  का? आता तोच माणूस भाजीची डिलिव्हरी करणार आणि तोच कागद आणि  पेन, पण नाही (आम्ही pain सहन करायचा पण पेन नाही मिळणार) .. आता माझी बहीण चित्रकार आहे तिला रंग हवेत, पण नाही ते विविध रंगाची भाजी खा म्हणतात (बळी राजाचा बळी जाईल... ) पण रंग नाही देणार , (नाही म्हणजे नाही ..) आता ती काय फावल्या वेळेत राज्यकारण्यांच्या पोस्टर ला काळं फासणारे (इच्छा असो वा नसो)? आता हॉटेल बंद, बर डिलेव्हरी चालू करा तर ती स्वीगी आणि झोमॅटो ... बार आहेत त्यांना डिलेव्हरी का नाही करुदेत? ती पोर नुसती बसलीयेत त्यांना काम मिळेल empty mind is a devil's workshop . दारू दुकान बंद होती ती उघडली तर झुम्बड .. ती होणारच , (अमेरिकेत पण गर्दी असते) त्या पेक्षा त्यांना पण डिलेव्हरी चालू करू देत , फार तर बाहेर एक डबा ठेवा लोक त्यात आपली ऑर्डर लिहून टाकतील, फोन नंबर लिहितील , तो माणूस देईल घरी आणून, फक्त फोन वर ऑर्डर घ्या, रिक्षा ठेवा डेलिव्हेरी ला, ५० रुपये जास्त घ्या, लोक देतील, रिक्षावाल्यांना पण काम मिळेल, ती लोक भिकारी नाहीयेत, खूप दिवस लोकांच्या दयेवर नाही जगू शकणार, त्यांचा कॉन्फिडन्स नका घालवू काम करू द्या.   गर्दी करायला भाग पाडता आणि परत ढुंगणावर फटके मारता , जी लोक ह्यांना (दारू च्या रांगेत उभे राहणाऱ्यांना )हिणवतात तीच लोक, वाण्या कडे गर्दी करून सामान (एक्सट्रा)स्टॉक करत होती ......

सरकारला प्रॉब्लेम्स आहेतच,  मी असं म्हणत नाहीये कि सगळं मोकळं करा , तुम्ही हवी ती,  हवी तेवढी काळजी घ्याच, पण घरात सगळं उपलब्ध करून द्या... अत्यावश्यक म्हणजे फक्त जेवण नाही.   

१७ ला एकदम उघडलं तर लोक सगळी एकदम बाहेर सांडतील (मग दांडे कमी पडतील पण.. )त्या पेक्षा थोडं थोडं लोकांना बाहेर सोडा कारण १७ लाच फक्त केलत तर परत मोठा प्रॉब्लेम, शाळे मध्ये कस करतात? एक-  एक वर्ग सोडतात, शाळा सुटल्यावर, नाहीतर चेंगरा चेंगरी होईल ना? तस करा शनिवार पासून दुकान उघडा (पंखा , AC , ट्यूब ) रविवारी थोडं हॉटेल ला सूट द्या, सोमवारी एरिया प्रमाणे रिक्षा चालू द्या ओला उबर चालू करा, त्यांना नियमात बांधता येत, घरी जाऊन लोकांना रिपेर ची काम करू द्या , घरातल्या लोकांना सांगा तशी दक्षता घ्यायला , आता सवय झाली आम्हाला काळजी घ्यायची आणि करायची. आता वेड्या सारखं खरंच नाही वागणार .. 

power corrupts and absolute power corrupts absolutely .. आता तर काय झालंय ना कि बिल्डिंगच्या सेक्रेटरी ला पण पावर आली आहे, एरवी शिव्या खाणारा माणूस तो बिचारा आता तो म्हणेल तस , दरवाजा बंद कोई नाही आयेगा कोई नही जायेगा.... असं पावर काही लोकांना दिलंय त्या मुळे काय झालय कि, काही लोक त्या मुळे त्याचा गैर वापर करू लागली आहेत ... (साला पंखा दुकान बंद?). 

आता हा व्हायरस राहणार आहे, त्याच्या बरोबर जगायला शिकायला हवं, नुसतं किती वर्ष घरी बसणार. अजून? लस यायला ८ महिने लागतील किमान, तो पर्यंत काय? एक वाक्य आठवलं  "इतना भी मत डराव कि साला  डर का डर हि खतम हो जाये" लोक शांत आहेत कारण ती अजून तरी गुणी आहेत, लोकांचा फार अंत नका बघू. आम्ही शहाण्या सारखं वागलोय ना आता सरकारनी पण शहाण्या सारखं वागायला हवं ... (हसू नका.. मी सिरिअसली बोलतोय). 

आम्ही आता घर साफ केलं आहे, सगळ्यांशी गप्पा मारल्या आहेत (मी पोळ्या सुद्धा शिकलोय), नवीन छंद ट्राय करून पाहिलाय, वाचन केलंय, झोप काढलीये, मदत सुद्धा केली आहे (गरिबा पर्यंत पोचली असेल अशी अपेक्षा करतोय)आणि घरा पासून ३०० मीटर च्या आत फक्त फिरलोय, ते पण सामान आणायलाच, मित्रां बरोबर पार्ट्या सुद्धा नाही केल्या (बिल्डिंग मधल्या पण) , म्हणून विचारतो .. कधी जाऊ आम्ही बाहेर?

डॉक्टर , बाकी मेडिकल पॅरा मेडिकल , सफाई कामगार, पोलीस , वाणी वाले , भाजी वाले ट्र्क ड्राइव्हर आमचे वॉचमन दूधवाले पेपर वाले ...आणि अशी बरीच लोक ...  ह्यांना मोठा सलाम ... खूप स्तुत्य आहे सगळंच मानलं त्यांना  .. 

पण आम जनतेचं पण कौतुक आहे (लहान मुलांचं तर फारच),  गरीब कामगार , कष्टकरी वर्ग ह्यांना पण सलाम १३० करोड लोक आहेत, त्यातली ०. १ टक्का लोकं पण नियम मोडत नाहीयेत म्हणजे किती कौतुक बघा , आत्ता पर्यंत आम्ही सरकारच ऐकलं , उभे राहा- उभे राहिलो , दिवा लावला - दिवा लावला , घरात बसा..  बसलो टाळ्या  पिटा ... पिटल्या आता आमच जरा ऐका .. कुणी ऐकतय का?

सागर कुलकर्णी 

ता.क   

ते जरा पंखा आणि AC च तेवढं बघा जमतंय का ?
सागर